शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 11:25 IST

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. "भाजपाने निवडणुकीत विजय मिळवला तर अमित शाह यांना पंतप्रधान केलं जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांच्यासाठी मतं मागत आहेत. भाजपा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दोन महिन्यांत त्यांच्या पदावरून हटवणार आहे" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. 

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत असताना अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, "भाजपाचा संविधान बदलण्याचा मानस आहे, त्यामुळेच 400 जागांचा नारा दिला जात आहे. मात्र, संविधानाचे रक्षण करणारा पक्ष असल्याचं भाजपाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मोदींनी निवडणूक जिंकल्यास ते पाच वर्षे पंतप्रधान राहतील." 

"यूपीच्या मतदारांना इंडिया आघाडीला मतदान करण्याची विनंती करण्यासाठी मी आज लखनौमध्ये आलो आहे. मला येथे चार मुद्द्यांवर बोलायचं आहे. प्रथम या निवडणुकीत पंतप्रधान मोदी अमित शाह यांना पंतप्रधान करतील. दुसरं म्हणजे, भाजपा सत्तेत आल्यास 2-3 महिन्यांत मुख्यमंत्री पदावरून हटवलं जाईल. तिसरं - ते संविधान बदलणार आहेत आणि चौथं म्हणजे ते SC आणि ST चं आरक्षण हटवणार आहेत" असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

केजरीवाल यांनी केली मोदींच्या निवृत्तीची भविष्यवाणी

केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीचीही भविष्यवाणी केली. ते म्हणाले, "पंतप्रधान मोदी 17 सप्टेंबर 2025 रोजी 75 वर्षांचे होतील. मोदींनी 17 सप्टेंबर 2025 रोजी अमित शाह यांना पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेतला आहे. 75 वर्षांनंतर ते निवृत्त होणार नाहीत असं पंतप्रधानांनी अद्याप सांगितलेलं नाही. मोदींनी हा नियम बनवला आहे आणि मला पूर्ण आशा आहे की ते या नियमाचं पालन करतील."

"भाजपाला 220 पेक्षा कमी जागा मिळतील"

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाला किती जागा मिळतील हेही सांगितलं. "भाजपाला 220 पेक्षा कमी जागा मिळतील असं म्हटलं आहे. हरियाणा, दिल्ली, पंजाब, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, यूपी, बिहार, झारखंड आणि राजस्थानमध्ये त्यांच्या जागा कमी होणार आहेत. भाजपा सत्ता स्थापन करणार नाही. इंडिया आघाडी सरकार स्थापन करणार आहे" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAmit Shahअमित शाहyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४