शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

"काँग्रेसला कुणीही माय-बाप उरला नाही, ती देशाला भविष्य देऊ शकत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 22:05 IST

कॉंग्रेस पूर्णपणे कोसळत आहे. मग मत काँग्रेसला द्या अथवा भाजपला, सरकार भाजपचेच बनते. कारण...

ठळक मुद्देकाँग्रेसमधील अनेक नेत्यांनी, आपल्याच पक्षाप्रति नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षांत काँग्रेसमधील अनेक नेते काँग्रेसची साथ सोडून भाजपत गेले आहेत.नुकतेच मध्य प्रदेशातही आमदारांनी राम-राम ठोकल्यानंतर काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. 

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या घसरगुंडीनंतर काँग्रेसला सातत्याने आरोपांचा सामना करावा लागत आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी घरचा आहेर दिल्यानंतर, आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला आहे. "काँग्रेस देशाला भविष्य देऊ शकत नाही. काँग्रेसचा कुणीही माय-बाप उरला नाही. जनतेने काँग्रेस अथवा भाजप कुणालाही मत दिले, तरी सरकार भाजपचेच बनते. काँग्रेसचे आमदार नंतर वेगळे होऊन भाजपमध्ये जातात," असा टोला केजरीवाल यांनी लगावला आहे. 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हिन्दुस्तान टाइम्स लिडरशिप समिट 2020मध्ये बोलत होते, ''कॉंग्रेस पूर्णपणे कोसळत आहे. मग मत काँग्रेसला द्या अथवा भाजपला, सरकार भाजपचेच बनते. काँग्रेसचे आमदार नंतर भाजपमध्ये जातात. काँग्रेस देशाचे भविष्य होऊ शकत नाही,'' असे केजरीवाल म्हणाले. 

देश पातळीवरील राजकारणात आम आदमी पार्टीच्या भूमिकेसंदर्भात विचारले असता केजरीवाल म्हणाले, ''आमची भूमिका कशी असेल, हे वेळच ठरवेल. आम आदमी पार्टी एक छोटा पक्ष आहे. संघटनात्मक दृष्ट्या आमचा फारसा विस्तार नाही. मात्र, दिल्लीतील कामांमुळे संपूर्ण देश आम आदमी पार्टीकडे आदराने पाहतो. मला आशा आहे, की देशातील लोक नक्कीच पर्याय देतील.''

केजरीवालांच्या या वक्तव्यापूर्वी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी, आपल्याच पक्षाप्रति नाराजी व्यक्त केली आहे. नुकत्याच बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरात आदी. ठिकाणी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि पोट निवडणुकीत काँग्रेसची पार घसरगुंडी उडाली. गेल्या काही वर्षांत काँग्रेसमधील अनेक नेते काँग्रेसची साथ सोडून भाजपत गेले आहेत. नुकतेच मध्य प्रदेशातही आमदारांनी राम-राम ठोकल्यानंतर काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीAam Admi partyआम आदमी पार्टी