शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

"काँग्रेसला कुणीही माय-बाप उरला नाही, ती देशाला भविष्य देऊ शकत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 22:05 IST

कॉंग्रेस पूर्णपणे कोसळत आहे. मग मत काँग्रेसला द्या अथवा भाजपला, सरकार भाजपचेच बनते. कारण...

ठळक मुद्देकाँग्रेसमधील अनेक नेत्यांनी, आपल्याच पक्षाप्रति नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षांत काँग्रेसमधील अनेक नेते काँग्रेसची साथ सोडून भाजपत गेले आहेत.नुकतेच मध्य प्रदेशातही आमदारांनी राम-राम ठोकल्यानंतर काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. 

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या घसरगुंडीनंतर काँग्रेसला सातत्याने आरोपांचा सामना करावा लागत आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी घरचा आहेर दिल्यानंतर, आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला आहे. "काँग्रेस देशाला भविष्य देऊ शकत नाही. काँग्रेसचा कुणीही माय-बाप उरला नाही. जनतेने काँग्रेस अथवा भाजप कुणालाही मत दिले, तरी सरकार भाजपचेच बनते. काँग्रेसचे आमदार नंतर वेगळे होऊन भाजपमध्ये जातात," असा टोला केजरीवाल यांनी लगावला आहे. 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हिन्दुस्तान टाइम्स लिडरशिप समिट 2020मध्ये बोलत होते, ''कॉंग्रेस पूर्णपणे कोसळत आहे. मग मत काँग्रेसला द्या अथवा भाजपला, सरकार भाजपचेच बनते. काँग्रेसचे आमदार नंतर भाजपमध्ये जातात. काँग्रेस देशाचे भविष्य होऊ शकत नाही,'' असे केजरीवाल म्हणाले. 

देश पातळीवरील राजकारणात आम आदमी पार्टीच्या भूमिकेसंदर्भात विचारले असता केजरीवाल म्हणाले, ''आमची भूमिका कशी असेल, हे वेळच ठरवेल. आम आदमी पार्टी एक छोटा पक्ष आहे. संघटनात्मक दृष्ट्या आमचा फारसा विस्तार नाही. मात्र, दिल्लीतील कामांमुळे संपूर्ण देश आम आदमी पार्टीकडे आदराने पाहतो. मला आशा आहे, की देशातील लोक नक्कीच पर्याय देतील.''

केजरीवालांच्या या वक्तव्यापूर्वी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी, आपल्याच पक्षाप्रति नाराजी व्यक्त केली आहे. नुकत्याच बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरात आदी. ठिकाणी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि पोट निवडणुकीत काँग्रेसची पार घसरगुंडी उडाली. गेल्या काही वर्षांत काँग्रेसमधील अनेक नेते काँग्रेसची साथ सोडून भाजपत गेले आहेत. नुकतेच मध्य प्रदेशातही आमदारांनी राम-राम ठोकल्यानंतर काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीAam Admi partyआम आदमी पार्टी