शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 17:22 IST

सुप्रीम कोर्टाने दिल्लीचे मुख्ममंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलेल्या दिलाशाचा वेळ संपत आला आहे. दुसरीकडे आता केजरीवालांच्या याचिकेवर ईडीने प्रत्युत्तर दिले आहे.

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता पुन्हा कोर्टात धाव घेत दिलासा मागितला आहे. अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिल्लीच्या ट्रायल कोर्टात कथित मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात नियमित जामीन मागितला आहे. यासोबत केजरीवाल यांनी वैद्यकीय कारणास्तव सात दिवसांच्या अंतरिम जामीनासाठीही याचिका कोर्टात दाखल केली. सुप्रीम कोर्टाने तात्काळ सुनावणीस नकार दिल्याने केजरीवाल यांनी राऊस एव्हेन्यू येथील ट्रायल कोर्टात या याचिका दाखल केल्या होत्या. दुसऱ्या याचिकेत त्यांनी प्रकृतीचे कारण देत सात दिवसांचा अंतरिम जामीन मागितला आहे. दुसरीकडे  विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी नोटीस जारी करून दोन्ही याचिकांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून उत्तर मागितले आहे.

राऊस एव्हेन्यू कोर्टाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी नोटीशीद्वारे  केजरीवाल यांनी नियमित जामीन तसेच अंतरिम जामीनासाठी दाखल केलेल्या याचिकेवर अंमलबजावणी संचालनालयचे उत्तर मागितले होते.  ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी याचिकांवर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला आहे. ईडीची मागणी मान्य करत कोर्टाने याप्रकरणाची पुढील सुनावणी १ जून रोजी ठेवली. केजरीवाल यांना ट्रायल कोर्टातून दिलासा न मिळाल्यास त्यांना २ जून रोजी आत्मसमर्पण करून तुरुंगात जावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांना निवडणूक प्रचारात भाग घेण्यासाठी २१ दिवसांचा दिलासा दिला आहे. त्यानंतर केजरीवाल यांनी तब्येत बिघडल्याचे सांगून केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवण्याची मागणी केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिला. यानंतर केजरीवाल यांनी ट्रायल कोर्टात धाव घेतली आहे होती.

या याचिकेला ईडीने विरोध करताना प्रचार करताना केजरीवाल यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्याचे म्हटलं आहे. तसेच या प्रकरणात अनेक पद्धतीने दडपशाही होत आहे जी आम्ही रेकॉर्डवर आणू इच्छित आहेत, असेही ईडीने म्हटलं आहे. “ते सध्या कोठडीत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. ते आज पंजाबमध्ये प्रचार करत आहेत. त्यांची तब्येत त्यांना प्रचारापासून थांबवत नाहीये. आम्हाला फार कमी वेळ मिळावा म्हणून ते शेवटच्या क्षणी जामिनासाठी आले आहेत. त्यांचे आजचे वर्तन कोणत्याही न्यायास पात्र नाही,” असे एसव्ही राजू यांनी म्हटलं.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी वजन अचानक कमी होऊ लागल्याने किडनी खराब होणे, गंभीर हृदयरोग आणि कर्करोगासारखी लक्षण असल्याचे म्हणत पीईटी सीटी स्कॅनसह इतर वैद्यकीय चाचण्यांसाठी सात दिवसांसाठी अंतरिम जामीन वाढवून मागितला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने त्यावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यानंतर केजरीवाल यांनी दिल्ली ट्रायल कोर्टात धाव घेतली. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयdelhiदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय