शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

इंदिरा गांधींप्रमाणे मोदी अतिरेक करताहेत, वरच्याची झाडू चालेल, अरविंद केजरीवाल संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 20:37 IST

Arvind Kejriwal : मनीष सिसोदिया यांना अटक केल्यानंतर दिल्लीच्या राजकारणात मोठा राजकीया वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या मुद्द्यावरून भाजपावर घणाघाती टीका केली आहे.

मनीष सिसोदिया यांना अटक केल्यानंतर दिल्लीच्या राजकारणात मोठा राजकीया वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या मुद्द्यावरून भाजपावर घणाघाती टीका केली आहे. त्यांनी मोदींची तुलना इंदिरा गांधी यांच्याशी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या इंदिरा गांधींप्रमाणे अतिरेक करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, माझं हजारो लोकांशी बोलणं झालंय. जनतेमध्ये रोष आहे. भाजपावाले काय करत आहेत, असा सवाल जनता विचारत आहे. वाटेल त्यांना तुरुंगात टाकतात. आम आदमी पक्षाला रोखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जेव्हापासून आम्ही पंजाबमध्ये जिंकलोय. ते यांना सहन होत नाही आहे. आम आदमी पक्ष एक वादळ आहे. ते आता थांबणार नाही. आता आम आदमी पक्षाची वेळ आली आहे. ती आता थांबणारी नाही. आम्ही डोर टू डोर कॅम्पेन चालवणार आहोत. एके काळी इंदिरा गांधी यांनी अति केली होती. आता पंतप्रधान करत आहेत. आता वरचा आपली झाडू चालवणार.

मनीष सिसोदिया यांनी शिक्षण क्षेत्रात उत्तम काम केल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही मंत्र्यांचा देशाला अभिमान आहे. त्यांनी देशामध्ये दिल्लीचं नाव उंचावलं आहे. सत्येंद्र जैन यांनी जगाला आरोग्याचं नवं मॉडेल दिलं. तर सिसोदिया यांनी जगाला शिक्षणाचं मॉडेस दिलं. ज्यांनी नाव उंचावलं, त्यांनाच पंतप्रधानांनी तुरुंगात टाकलं. मद्य धोरण हे केवळ एक निमित्त आहे. हे सगळं बनावट आहे, असा घणाघात केजरीवाल यांनी केला.

चांगलं काम थांबवावं, ही पंतप्रधानांची इच्छा आहे. जे काम आम्ही करतो, ते ते करू शकत नाहीत. त्यांची सरकारं ज्या ज्या ठिकाणी आहेत, तेथील शाळांची स्थिती ते सुधारू शकले नाहीत. एक रुग्णालय दुरुस्त करू शकले नाहीत. त्यामुळेच ते केजरीवालला रोखण्याचं काम करत आहेत. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदी