शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

इंदिरा गांधींप्रमाणे मोदी अतिरेक करताहेत, वरच्याची झाडू चालेल, अरविंद केजरीवाल संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 20:37 IST

Arvind Kejriwal : मनीष सिसोदिया यांना अटक केल्यानंतर दिल्लीच्या राजकारणात मोठा राजकीया वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या मुद्द्यावरून भाजपावर घणाघाती टीका केली आहे.

मनीष सिसोदिया यांना अटक केल्यानंतर दिल्लीच्या राजकारणात मोठा राजकीया वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या मुद्द्यावरून भाजपावर घणाघाती टीका केली आहे. त्यांनी मोदींची तुलना इंदिरा गांधी यांच्याशी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या इंदिरा गांधींप्रमाणे अतिरेक करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, माझं हजारो लोकांशी बोलणं झालंय. जनतेमध्ये रोष आहे. भाजपावाले काय करत आहेत, असा सवाल जनता विचारत आहे. वाटेल त्यांना तुरुंगात टाकतात. आम आदमी पक्षाला रोखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जेव्हापासून आम्ही पंजाबमध्ये जिंकलोय. ते यांना सहन होत नाही आहे. आम आदमी पक्ष एक वादळ आहे. ते आता थांबणार नाही. आता आम आदमी पक्षाची वेळ आली आहे. ती आता थांबणारी नाही. आम्ही डोर टू डोर कॅम्पेन चालवणार आहोत. एके काळी इंदिरा गांधी यांनी अति केली होती. आता पंतप्रधान करत आहेत. आता वरचा आपली झाडू चालवणार.

मनीष सिसोदिया यांनी शिक्षण क्षेत्रात उत्तम काम केल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही मंत्र्यांचा देशाला अभिमान आहे. त्यांनी देशामध्ये दिल्लीचं नाव उंचावलं आहे. सत्येंद्र जैन यांनी जगाला आरोग्याचं नवं मॉडेल दिलं. तर सिसोदिया यांनी जगाला शिक्षणाचं मॉडेस दिलं. ज्यांनी नाव उंचावलं, त्यांनाच पंतप्रधानांनी तुरुंगात टाकलं. मद्य धोरण हे केवळ एक निमित्त आहे. हे सगळं बनावट आहे, असा घणाघात केजरीवाल यांनी केला.

चांगलं काम थांबवावं, ही पंतप्रधानांची इच्छा आहे. जे काम आम्ही करतो, ते ते करू शकत नाहीत. त्यांची सरकारं ज्या ज्या ठिकाणी आहेत, तेथील शाळांची स्थिती ते सुधारू शकले नाहीत. एक रुग्णालय दुरुस्त करू शकले नाहीत. त्यामुळेच ते केजरीवालला रोखण्याचं काम करत आहेत. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदी