शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

Arvind Kejariwal: केजरीवालांचं भाजपला चॅलेंज; महापालिका निवडणूक वेळेत घेऊन, जिंकून दाखवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 14:52 IST

केजरीवाल यांनी केंद्र सरकारला आवाहन केलंय की, हार-जीत होतच राहिल

नवी दिल्ली - दिल्ली नगर निमग म्हणजे दिल्ली महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्याने आम आदमी पक्षाने कोर्टाची पायरी चढली आहे. राज्य निवडणूक आयोगाने केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार निवडणुकांची घोषणा केली नाही, असे आपने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. त्यानंतर, आता आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला चॅलेंज दिलं आहे. लहान पक्षाला भाजप घाबरल्याचं त्यांनी म्हटलंय. 

केजरीवाल यांनी केंद्र सरकारला आवाहन केलंय की, हार-जीत होतच राहिल. आज एखाद्या राज्यात तुम्ही विजयी होत आहात, दुसऱ्या राज्यात आणखी कोणीतरी. मात्र, एका लहानशा महापालिका निवडणुकीतील पराभवापासून वाचण्यासाठी देशासोबत खिलवाड करू नका. शहिदांच्या वीरतेबाबत खिलवाड करू नका, संविधानसोबत छेडछाड करू नका, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

आज तुम्ही म्हणताय की तिन्ही महापालिकांना एकत्र करण्यासाठी निवडणुकांना टाळण्यात येत आहे. मात्र, या कारणासाठी निवडणुका टाळल्या जाऊ शकतात का?. उद्या गुजरातच्या निवडणुका आहेत, तेव्हा केंद्र सरकारला एक पत्र लिहून आम्ही महाराष्ट्र आणि गुजरातला एकत्र करणार आहोत. त्यामुळे, गुजरातमध्ये निवडणुका घेऊ नका, असे म्हणणार का? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला आहे. तसेच, उद्या भाजप आणि आम आदमी पक्ष राहिल किंवा नाही, नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल राहतील किंवा नाही, पण हा देश वाचला पाहिजे. एक लहान निवडणूक जिंकण्यासाठी आपण देशाच्या व्यवस्थेसोबत छेडछेड करू नका, अशी माझी पंतप्रधानांना हात जोडून विनंती आहे, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

काय आहे निवडणूक प्रकरण

राजधानी दिल्लीत मे महिन्यात एमसीडीचा कार्यकाळ पूर्ण होत आहे, त्यामुळे एप्रिल महिन्यातच निवडणुका घेणे बंधनकारक आहे. मात्र, आयोगाच्या सायत्ततेवर केंद्र सरकारने गदा आणल्याचं आपने याचिकेत म्हटले आहे. राज्य निवडणूक आयोग गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकांची तयारी करत होता. विशेष म्हणजे नोटीस प्रकाशित करुन आयोगाने एप्रिल महिन्यात निवडणूक होईल, असे जाहीरही केले होते. 9 मार्च रोजी निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या घोषणेसाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. सायंकाळी 5 वाजता ही पत्रकार परिषद होणार होती. मात्र, आयोगाने काही तासांअगोदर एक नोटीस जारी करुन पत्रकार परिषद रद्द केली. त्या नोटीसीत आयोगाने म्हटले की, उपराज्यपाल यांनी एक पत्र पाठवले आहे. त्यानुसार, केंद्र सरकार दिल्लीतील तिन्ही एमसीडींचे एकत्रीकरण करणार आहे. त्यामुळे, सध्या निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात यावी, असे लिहिले होते. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालMuncipal Corporationनगर पालिकाdelhiदिल्लीElectionनिवडणूकBJPभाजपा