शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

Arvind Kejariwal: केजरीवालांचं भाजपला चॅलेंज; महापालिका निवडणूक वेळेत घेऊन, जिंकून दाखवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 14:52 IST

केजरीवाल यांनी केंद्र सरकारला आवाहन केलंय की, हार-जीत होतच राहिल

नवी दिल्ली - दिल्ली नगर निमग म्हणजे दिल्ली महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्याने आम आदमी पक्षाने कोर्टाची पायरी चढली आहे. राज्य निवडणूक आयोगाने केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार निवडणुकांची घोषणा केली नाही, असे आपने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. त्यानंतर, आता आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला चॅलेंज दिलं आहे. लहान पक्षाला भाजप घाबरल्याचं त्यांनी म्हटलंय. 

केजरीवाल यांनी केंद्र सरकारला आवाहन केलंय की, हार-जीत होतच राहिल. आज एखाद्या राज्यात तुम्ही विजयी होत आहात, दुसऱ्या राज्यात आणखी कोणीतरी. मात्र, एका लहानशा महापालिका निवडणुकीतील पराभवापासून वाचण्यासाठी देशासोबत खिलवाड करू नका. शहिदांच्या वीरतेबाबत खिलवाड करू नका, संविधानसोबत छेडछाड करू नका, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

आज तुम्ही म्हणताय की तिन्ही महापालिकांना एकत्र करण्यासाठी निवडणुकांना टाळण्यात येत आहे. मात्र, या कारणासाठी निवडणुका टाळल्या जाऊ शकतात का?. उद्या गुजरातच्या निवडणुका आहेत, तेव्हा केंद्र सरकारला एक पत्र लिहून आम्ही महाराष्ट्र आणि गुजरातला एकत्र करणार आहोत. त्यामुळे, गुजरातमध्ये निवडणुका घेऊ नका, असे म्हणणार का? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला आहे. तसेच, उद्या भाजप आणि आम आदमी पक्ष राहिल किंवा नाही, नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल राहतील किंवा नाही, पण हा देश वाचला पाहिजे. एक लहान निवडणूक जिंकण्यासाठी आपण देशाच्या व्यवस्थेसोबत छेडछेड करू नका, अशी माझी पंतप्रधानांना हात जोडून विनंती आहे, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

काय आहे निवडणूक प्रकरण

राजधानी दिल्लीत मे महिन्यात एमसीडीचा कार्यकाळ पूर्ण होत आहे, त्यामुळे एप्रिल महिन्यातच निवडणुका घेणे बंधनकारक आहे. मात्र, आयोगाच्या सायत्ततेवर केंद्र सरकारने गदा आणल्याचं आपने याचिकेत म्हटले आहे. राज्य निवडणूक आयोग गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकांची तयारी करत होता. विशेष म्हणजे नोटीस प्रकाशित करुन आयोगाने एप्रिल महिन्यात निवडणूक होईल, असे जाहीरही केले होते. 9 मार्च रोजी निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या घोषणेसाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. सायंकाळी 5 वाजता ही पत्रकार परिषद होणार होती. मात्र, आयोगाने काही तासांअगोदर एक नोटीस जारी करुन पत्रकार परिषद रद्द केली. त्या नोटीसीत आयोगाने म्हटले की, उपराज्यपाल यांनी एक पत्र पाठवले आहे. त्यानुसार, केंद्र सरकार दिल्लीतील तिन्ही एमसीडींचे एकत्रीकरण करणार आहे. त्यामुळे, सध्या निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात यावी, असे लिहिले होते. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालMuncipal Corporationनगर पालिकाdelhiदिल्लीElectionनिवडणूकBJPभाजपा