शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Arvind Kejariwal: केजरीवालांचं भाजपला चॅलेंज; महापालिका निवडणूक वेळेत घेऊन, जिंकून दाखवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 14:52 IST

केजरीवाल यांनी केंद्र सरकारला आवाहन केलंय की, हार-जीत होतच राहिल

नवी दिल्ली - दिल्ली नगर निमग म्हणजे दिल्ली महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्याने आम आदमी पक्षाने कोर्टाची पायरी चढली आहे. राज्य निवडणूक आयोगाने केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार निवडणुकांची घोषणा केली नाही, असे आपने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. त्यानंतर, आता आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला चॅलेंज दिलं आहे. लहान पक्षाला भाजप घाबरल्याचं त्यांनी म्हटलंय. 

केजरीवाल यांनी केंद्र सरकारला आवाहन केलंय की, हार-जीत होतच राहिल. आज एखाद्या राज्यात तुम्ही विजयी होत आहात, दुसऱ्या राज्यात आणखी कोणीतरी. मात्र, एका लहानशा महापालिका निवडणुकीतील पराभवापासून वाचण्यासाठी देशासोबत खिलवाड करू नका. शहिदांच्या वीरतेबाबत खिलवाड करू नका, संविधानसोबत छेडछाड करू नका, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

आज तुम्ही म्हणताय की तिन्ही महापालिकांना एकत्र करण्यासाठी निवडणुकांना टाळण्यात येत आहे. मात्र, या कारणासाठी निवडणुका टाळल्या जाऊ शकतात का?. उद्या गुजरातच्या निवडणुका आहेत, तेव्हा केंद्र सरकारला एक पत्र लिहून आम्ही महाराष्ट्र आणि गुजरातला एकत्र करणार आहोत. त्यामुळे, गुजरातमध्ये निवडणुका घेऊ नका, असे म्हणणार का? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला आहे. तसेच, उद्या भाजप आणि आम आदमी पक्ष राहिल किंवा नाही, नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल राहतील किंवा नाही, पण हा देश वाचला पाहिजे. एक लहान निवडणूक जिंकण्यासाठी आपण देशाच्या व्यवस्थेसोबत छेडछेड करू नका, अशी माझी पंतप्रधानांना हात जोडून विनंती आहे, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

काय आहे निवडणूक प्रकरण

राजधानी दिल्लीत मे महिन्यात एमसीडीचा कार्यकाळ पूर्ण होत आहे, त्यामुळे एप्रिल महिन्यातच निवडणुका घेणे बंधनकारक आहे. मात्र, आयोगाच्या सायत्ततेवर केंद्र सरकारने गदा आणल्याचं आपने याचिकेत म्हटले आहे. राज्य निवडणूक आयोग गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकांची तयारी करत होता. विशेष म्हणजे नोटीस प्रकाशित करुन आयोगाने एप्रिल महिन्यात निवडणूक होईल, असे जाहीरही केले होते. 9 मार्च रोजी निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या घोषणेसाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. सायंकाळी 5 वाजता ही पत्रकार परिषद होणार होती. मात्र, आयोगाने काही तासांअगोदर एक नोटीस जारी करुन पत्रकार परिषद रद्द केली. त्या नोटीसीत आयोगाने म्हटले की, उपराज्यपाल यांनी एक पत्र पाठवले आहे. त्यानुसार, केंद्र सरकार दिल्लीतील तिन्ही एमसीडींचे एकत्रीकरण करणार आहे. त्यामुळे, सध्या निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात यावी, असे लिहिले होते. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालMuncipal Corporationनगर पालिकाdelhiदिल्लीElectionनिवडणूकBJPभाजपा