शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

Arvind Kejariwal: केजरीवालांचं भाजपला चॅलेंज; महापालिका निवडणूक वेळेत घेऊन, जिंकून दाखवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 14:52 IST

केजरीवाल यांनी केंद्र सरकारला आवाहन केलंय की, हार-जीत होतच राहिल

नवी दिल्ली - दिल्ली नगर निमग म्हणजे दिल्ली महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्याने आम आदमी पक्षाने कोर्टाची पायरी चढली आहे. राज्य निवडणूक आयोगाने केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार निवडणुकांची घोषणा केली नाही, असे आपने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. त्यानंतर, आता आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला चॅलेंज दिलं आहे. लहान पक्षाला भाजप घाबरल्याचं त्यांनी म्हटलंय. 

केजरीवाल यांनी केंद्र सरकारला आवाहन केलंय की, हार-जीत होतच राहिल. आज एखाद्या राज्यात तुम्ही विजयी होत आहात, दुसऱ्या राज्यात आणखी कोणीतरी. मात्र, एका लहानशा महापालिका निवडणुकीतील पराभवापासून वाचण्यासाठी देशासोबत खिलवाड करू नका. शहिदांच्या वीरतेबाबत खिलवाड करू नका, संविधानसोबत छेडछाड करू नका, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

आज तुम्ही म्हणताय की तिन्ही महापालिकांना एकत्र करण्यासाठी निवडणुकांना टाळण्यात येत आहे. मात्र, या कारणासाठी निवडणुका टाळल्या जाऊ शकतात का?. उद्या गुजरातच्या निवडणुका आहेत, तेव्हा केंद्र सरकारला एक पत्र लिहून आम्ही महाराष्ट्र आणि गुजरातला एकत्र करणार आहोत. त्यामुळे, गुजरातमध्ये निवडणुका घेऊ नका, असे म्हणणार का? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला आहे. तसेच, उद्या भाजप आणि आम आदमी पक्ष राहिल किंवा नाही, नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल राहतील किंवा नाही, पण हा देश वाचला पाहिजे. एक लहान निवडणूक जिंकण्यासाठी आपण देशाच्या व्यवस्थेसोबत छेडछेड करू नका, अशी माझी पंतप्रधानांना हात जोडून विनंती आहे, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

काय आहे निवडणूक प्रकरण

राजधानी दिल्लीत मे महिन्यात एमसीडीचा कार्यकाळ पूर्ण होत आहे, त्यामुळे एप्रिल महिन्यातच निवडणुका घेणे बंधनकारक आहे. मात्र, आयोगाच्या सायत्ततेवर केंद्र सरकारने गदा आणल्याचं आपने याचिकेत म्हटले आहे. राज्य निवडणूक आयोग गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकांची तयारी करत होता. विशेष म्हणजे नोटीस प्रकाशित करुन आयोगाने एप्रिल महिन्यात निवडणूक होईल, असे जाहीरही केले होते. 9 मार्च रोजी निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या घोषणेसाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. सायंकाळी 5 वाजता ही पत्रकार परिषद होणार होती. मात्र, आयोगाने काही तासांअगोदर एक नोटीस जारी करुन पत्रकार परिषद रद्द केली. त्या नोटीसीत आयोगाने म्हटले की, उपराज्यपाल यांनी एक पत्र पाठवले आहे. त्यानुसार, केंद्र सरकार दिल्लीतील तिन्ही एमसीडींचे एकत्रीकरण करणार आहे. त्यामुळे, सध्या निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात यावी, असे लिहिले होते. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालMuncipal Corporationनगर पालिकाdelhiदिल्लीElectionनिवडणूकBJPभाजपा