शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

Arun Jaitley: 'कलम ३७०' झालं हद्दपार, अरुण जेटली होते पडद्यामागचे शिलेदार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 18:04 IST

...म्हणूनच जेटलींच्या निधनामुळे भाजपानं आणि मोदींनी 'संकटमोचक' गमावल्याचं म्हटलं जातंय. 

ठळक मुद्देकलम ३७० हटवणारं विधेयक कायदेशीरदृष्ट्या 'शत प्रतिशत' परिपूर्ण करणारे नेते म्हणजे अरुण जेटली.वाजपेयी सरकारमध्ये कायदा मंत्री म्हणून जेटलींनी काम केलं होतं. मोदींच्या अनेक धडाकेबाज कृतींना 'बौद्धिक बॅकिंग' देण्याचं काम अरुण जेटली करत होते.

जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटवण्याचा निर्णय हा संसदेत घेण्यात आलेल्या सर्वात धाडसी आणि ऐतिहासिक निर्णयांपैकी एक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या जोडीनं तब्बल सात दशकांपासून देशवासीयांच्या मनात असलेली इच्छा पूर्ण केली आणि एकच जल्लोष झाला. कलम ३७० मधील वादग्रस्त तरतुदी हटवणारं, ३५ ए रद्द करणारं आणि जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचं विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर सगळेच मोदी सरकारवर अभिनंदनाचा, कौतुकाचा वर्षाव करत होते. पण, हे विधेयक कायदेशीरदृष्ट्या 'शत प्रतिशत' परिपूर्ण करणारा एक नेता त्यावेळी पूर्णपणे पडद्याआड होता. ते निपूण विधिज्ञ म्हणजे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली. म्हणूनच, आज त्यांच्या निधनामुळे भाजपानं आणि मोदींनी 'संकटमोचक' गमावल्याचं म्हटलं जातंय. 

जम्मू-काश्मीरचा स्वायत्त राज्याचा दर्जा काढला, तरच तो खऱ्या अर्थानं भारताशी जोडला जाईल, ही भाजपाची पक्की धारणा होती. अगदी अटल-अडवाणींच्या काळापासून त्यांना कलम ३७० रद्द करायचं होतं. पण, हे पाऊल उचलणं सोपं नव्हतं. परंतु, बहुमताचं गणित जुळल्यानंतर मोदी-शहांनी बाकी सगळं जुळवून आणलं आणि ५ ऑगस्टला राज्यसभेत, तर ६ ऑगस्टला लोकसभेत हे विधेयक बहुमतानं संमत झालं. पडद्यामागे या विधेयकाची तयारी आधीपासूनच सुरू होती. त्यात छोटीशी त्रुटी राहणंही परवडणारं नव्हतं. त्यामुळे मोदी-शहांनी आपल्या विश्वासू आणि भरवशाच्या कायदेपंडित सहकाऱ्याला - अर्थात अरुण जेटलींना सोबत घेतल्याचं निकटवर्तीयांनी सांगितलं. वाजपेयी सरकारमध्ये कायदा मंत्री म्हणून जेटलींनी काम केलं होतं. त्यामुळे या विषयातील बरीच माहिती त्यांना अगदी तोंडपाठच होती. 

वास्तविक, मोदी सरकार-२ मध्ये अरुण जेटली मंत्री नव्हते. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी कुठलीही जबाबदारी स्वीकारली नव्हती. परंतु, भाजपाला आणि सरकारला लागेल ती मदत करण्यासाठी ते सदैव तत्पर होते. त्यामुळे विधेयकाच्या दृष्टीने जेव्हा-जेव्हा काही मुद्दे उपस्थित झाले, तेव्हा अमित शहांनी जेटलींना संपर्क साधला. विधेयक मांडण्याच्या काही दिवस आधी शहांनी जेटलींच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चाही केली होती. 

कलम ३७० आणि ३५ ए हटवल्यानंतर अरुण जेटलींना झालेला आनंद त्यांच्या ट्विट्सवरून सहज लक्षात येऊ शकतो. ५ आणि ६ ऑगस्ट रोजी त्यांनी, हा निर्णय का आवश्यक होता, हे मुद्देसूद पटवून सांगितलं होतं. मोदी आणि शहांबद्दलचा विश्वास त्यातून स्पष्टपणे जाणवत होता. परंतु, अरुण जेटलींच्या मोलाच्या योगदानाशिवाय मोदी-शहांना हे धाडसी पाऊल कदाचित इतकं यशस्वीरित्या टाकता आलं नसतं. 

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे धडाकेबाज नेते म्हणून पाहिलं जातं. परंतु, त्यांच्या अनेक कृतींना 'बौद्धिक बॅकिंग' देण्याचं काम अरुण जेटली कुठलाही दिखावा न करता करत होते. त्यांच्यानंतर आता इतका अनुभवी, निपुण आणि खंदा सहकारी शोधणं मोदींसाठी खूपच कठीण असेल. 

अरुण जेटलींच्या मुलानं मोदींना दिलेला निरोप वाचून त्याचा अभिमान वाटेल!

अरुण जेटलींची कायम आठवण करून देतील 'हे' सहा क्रांतिकारी निर्णय!

जेटलींच्या मनाचा मोठेपणा; ज्या शाळेत स्वत:ची मुलं शिकवली, तेथेच स्वयंपाक्यांच्या मुलांनाही शिकवलं!

'मोदी लाट' सर्वप्रथम ओळखणारा अन् 'वीरू वादळा'चा इशारा देणारा दूरदर्शी नेता! 

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाArticle 35 Aकलम 35-एArticle 370कलम 370