शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

त्याच्या शरीरावर 70-80 जखमा, शत्रूसुद्धा एवढा रानटी नसतो- अरुण जेटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 15:44 IST

केरळच्या दौ-यावर असलेल्या अरुण जेटलींनी संघाच्या कार्यकर्त्यांची हत्या करणा-या कथित कम्युनिस्टांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

तिरुवनंतपूरम, दि. 6 - केरळच्या दौ-यावर असलेल्या अरुण जेटलींनी संघाच्या कार्यकर्त्यांची हत्या करणा-या कथित कम्युनिस्टांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अशा भ्याड हल्ल्यांमुळे आमचं मनोबल आणखी वाढणार आहे. कोणताही हल्ला हे कोणाची विचाराधारा संपवू शकत नाही, असंही जेटली म्हणाले आहेत. राजेश शरीरावर 70-80 जखमा होत्या, शत्रूसुद्धा एवढा रानटी नसतो, असं म्हणत जेटलींनी हल्लेखोरांवर आगपाखड केली आहे.  गेल्या काही काळापासून आरएसएसच्या कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्येच्या मुद्द्यावर भाजपा स्वतःचे राजकीय विरोधक सीपीएमविरोधात आक्रमक होण्याच्या तयारीत आहे. भाजपानं सर्व वरिष्ठ नेत्यांना केरळच्या रणांगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. या रणनीतीअंतर्गतच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली केरळमध्ये दाखल झाले आहेत. जेटलींनी तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा हत्या करण्यात आलेल्या संघाचे कार्यकर्ते राजेश यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी त्यांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. सीपीएम कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या संघाच्या कार्यकर्त्यांच्या घरालाही अरुण जेटलींनी भेट दिली आहे.केरळ राज्यातील परिस्थिती समजून घेण्यासाठी अरुण जेटलींना मोदींनी पाठवल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक काळापासून सत्ताधारी कम्युनिस्ट आणि आरएसएस व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचार उफाळून येतोय. केंद्र सरकारचा हा निर्णय संघाच्या कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवणार आहे. संघानं राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा हवाला देताना राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर जेटलींच्या दौ-याला महत्त्व प्राप्त झालं आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीसह अनेक राज्यांत सत्ता मिळवल्यानंतर आता त्यांनी स्वतःचं लक्ष्य केरळवर केंद्रित केलं आहे. देशातील अनेक राज्यांत सत्ता हस्तगत केल्यानंतर भाजपानं आता केरळकडे मोर्चा वळवला आहे. उत्तर भारतात हातपाय पसरलेल्या भाजपानं आता दक्षिणेकडे कूच केली आहे.