शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा
3
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
4
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
5
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
6
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
7
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
8
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
9
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
10
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
11
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
12
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
13
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
14
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
15
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
16
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
17
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
19
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
20
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
Daily Top 2Weekly Top 5

त्याच्या शरीरावर 70-80 जखमा, शत्रूसुद्धा एवढा रानटी नसतो- अरुण जेटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 15:44 IST

केरळच्या दौ-यावर असलेल्या अरुण जेटलींनी संघाच्या कार्यकर्त्यांची हत्या करणा-या कथित कम्युनिस्टांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

तिरुवनंतपूरम, दि. 6 - केरळच्या दौ-यावर असलेल्या अरुण जेटलींनी संघाच्या कार्यकर्त्यांची हत्या करणा-या कथित कम्युनिस्टांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अशा भ्याड हल्ल्यांमुळे आमचं मनोबल आणखी वाढणार आहे. कोणताही हल्ला हे कोणाची विचाराधारा संपवू शकत नाही, असंही जेटली म्हणाले आहेत. राजेश शरीरावर 70-80 जखमा होत्या, शत्रूसुद्धा एवढा रानटी नसतो, असं म्हणत जेटलींनी हल्लेखोरांवर आगपाखड केली आहे.  गेल्या काही काळापासून आरएसएसच्या कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्येच्या मुद्द्यावर भाजपा स्वतःचे राजकीय विरोधक सीपीएमविरोधात आक्रमक होण्याच्या तयारीत आहे. भाजपानं सर्व वरिष्ठ नेत्यांना केरळच्या रणांगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. या रणनीतीअंतर्गतच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली केरळमध्ये दाखल झाले आहेत. जेटलींनी तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा हत्या करण्यात आलेल्या संघाचे कार्यकर्ते राजेश यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी त्यांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. सीपीएम कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या संघाच्या कार्यकर्त्यांच्या घरालाही अरुण जेटलींनी भेट दिली आहे.केरळ राज्यातील परिस्थिती समजून घेण्यासाठी अरुण जेटलींना मोदींनी पाठवल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक काळापासून सत्ताधारी कम्युनिस्ट आणि आरएसएस व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचार उफाळून येतोय. केंद्र सरकारचा हा निर्णय संघाच्या कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवणार आहे. संघानं राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा हवाला देताना राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर जेटलींच्या दौ-याला महत्त्व प्राप्त झालं आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीसह अनेक राज्यांत सत्ता मिळवल्यानंतर आता त्यांनी स्वतःचं लक्ष्य केरळवर केंद्रित केलं आहे. देशातील अनेक राज्यांत सत्ता हस्तगत केल्यानंतर भाजपानं आता केरळकडे मोर्चा वळवला आहे. उत्तर भारतात हातपाय पसरलेल्या भाजपानं आता दक्षिणेकडे कूच केली आहे.