शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

कम्प्युटर वॉचचा निर्णय काँग्रेसचाच; मोदी सरकारचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 17:52 IST

कोणाच्याही कम्प्युटर, कॉल आणि इंटरनेट डेटावर नजर ठेवण्यासंदर्भात देशातील महत्त्वाच्या 10 तपास यंत्रणांना सरकारकडून देण्यात आलेल्या अधिकाराच्या निर्णयावरुन वाद निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली - कोणाच्याही कम्प्युटर, कॉल आणि इंटरनेट डेटावर नजर ठेवण्यासंदर्भात देशातील महत्त्वाच्या 10 तपास यंत्रणांना सरकारकडून देण्यात आलेल्या अधिकाराच्या निर्णयावरुन वाद निर्माण झाला आहे. या निर्णयावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेराव घातला आहे. 'अबकी बार निजता पर वार', असे म्हणत काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकार निशाणा साधला आहे. तर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. 'केंद्र सरकार या निर्णयाद्वारे ‘घर-घर मोदी’संदर्भातील आपले वचन पूर्ण करत आहे का?',असा प्रश्न उपस्थित करत ओवेसी यांनी टोला हाणला आहे.   

विरोधकांनी केलेल्या शाब्दिक हल्ल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत यावर स्पष्टीकरण दिले. जेटली म्हणाले की, सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खासगी आयुष्यावर कोणताही परिणाम होणार नाही. 18 वर्षांपूर्वी माहिती तंत्रज्ञान कायदा आला होता. यातील कलम 69 अंतर्गत असं सांगण्यात आले होते की, राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्व आणि ऐक्य यासंबंधी कोणतीही चिंताजनक परिस्थिती उद्भवल्यास सक्षम तपास यंत्रणा याची तपासणी करू शकतात.

(अबकी बार,निजता पर वार!; विरोधकांचा मोदी सरकारवर निशाणा)

(परवानगीशिवाय कम्प्युटरवर सरकारची नजर, 10 तपास यंत्रणा ठेवणार पहारा)दरम्यान, जेटलींनी दिलेल्या उत्तरावर काँग्रेसचे गुलाम नबी आझाद यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आझाद यांनी म्हटलं की, जारी करण्यात आलेल्या आदेशामध्ये राष्ट्रीय सुरक्षेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. यावर जेटली यांनी म्हटलं की, संबंधित नियम 2009 साली जारी करण्यात आला होता. ज्यामध्ये तपासणीसाठी अशा यंत्रणांना अधिकृत अधिकृत केले गेले आहे. या निर्णयात सर्वसामान्य लोकांवर नजर ठेवण्यासारखी कोणतीही गोष्ट नमूद करण्यात आलेली नाही. आयटी अॅक्टच्या कलम 69अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला असून यामध्ये राष्ट्रीय सुरक्षेचा उल्लेख करण्यात आला आहे. अशामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे अधिकार आणि त्यांच्या गोपनीय बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

 

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीITमाहिती तंत्रज्ञान