शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

कम्प्युटर वॉचचा निर्णय काँग्रेसचाच; मोदी सरकारचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 17:52 IST

कोणाच्याही कम्प्युटर, कॉल आणि इंटरनेट डेटावर नजर ठेवण्यासंदर्भात देशातील महत्त्वाच्या 10 तपास यंत्रणांना सरकारकडून देण्यात आलेल्या अधिकाराच्या निर्णयावरुन वाद निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली - कोणाच्याही कम्प्युटर, कॉल आणि इंटरनेट डेटावर नजर ठेवण्यासंदर्भात देशातील महत्त्वाच्या 10 तपास यंत्रणांना सरकारकडून देण्यात आलेल्या अधिकाराच्या निर्णयावरुन वाद निर्माण झाला आहे. या निर्णयावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेराव घातला आहे. 'अबकी बार निजता पर वार', असे म्हणत काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकार निशाणा साधला आहे. तर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. 'केंद्र सरकार या निर्णयाद्वारे ‘घर-घर मोदी’संदर्भातील आपले वचन पूर्ण करत आहे का?',असा प्रश्न उपस्थित करत ओवेसी यांनी टोला हाणला आहे.   

विरोधकांनी केलेल्या शाब्दिक हल्ल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत यावर स्पष्टीकरण दिले. जेटली म्हणाले की, सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खासगी आयुष्यावर कोणताही परिणाम होणार नाही. 18 वर्षांपूर्वी माहिती तंत्रज्ञान कायदा आला होता. यातील कलम 69 अंतर्गत असं सांगण्यात आले होते की, राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्व आणि ऐक्य यासंबंधी कोणतीही चिंताजनक परिस्थिती उद्भवल्यास सक्षम तपास यंत्रणा याची तपासणी करू शकतात.

(अबकी बार,निजता पर वार!; विरोधकांचा मोदी सरकारवर निशाणा)

(परवानगीशिवाय कम्प्युटरवर सरकारची नजर, 10 तपास यंत्रणा ठेवणार पहारा)दरम्यान, जेटलींनी दिलेल्या उत्तरावर काँग्रेसचे गुलाम नबी आझाद यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आझाद यांनी म्हटलं की, जारी करण्यात आलेल्या आदेशामध्ये राष्ट्रीय सुरक्षेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. यावर जेटली यांनी म्हटलं की, संबंधित नियम 2009 साली जारी करण्यात आला होता. ज्यामध्ये तपासणीसाठी अशा यंत्रणांना अधिकृत अधिकृत केले गेले आहे. या निर्णयात सर्वसामान्य लोकांवर नजर ठेवण्यासारखी कोणतीही गोष्ट नमूद करण्यात आलेली नाही. आयटी अॅक्टच्या कलम 69अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला असून यामध्ये राष्ट्रीय सुरक्षेचा उल्लेख करण्यात आला आहे. अशामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे अधिकार आणि त्यांच्या गोपनीय बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

 

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीITमाहिती तंत्रज्ञान