शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

कम्प्युटर वॉचचा निर्णय काँग्रेसचाच; मोदी सरकारचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 17:52 IST

कोणाच्याही कम्प्युटर, कॉल आणि इंटरनेट डेटावर नजर ठेवण्यासंदर्भात देशातील महत्त्वाच्या 10 तपास यंत्रणांना सरकारकडून देण्यात आलेल्या अधिकाराच्या निर्णयावरुन वाद निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली - कोणाच्याही कम्प्युटर, कॉल आणि इंटरनेट डेटावर नजर ठेवण्यासंदर्भात देशातील महत्त्वाच्या 10 तपास यंत्रणांना सरकारकडून देण्यात आलेल्या अधिकाराच्या निर्णयावरुन वाद निर्माण झाला आहे. या निर्णयावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेराव घातला आहे. 'अबकी बार निजता पर वार', असे म्हणत काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकार निशाणा साधला आहे. तर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. 'केंद्र सरकार या निर्णयाद्वारे ‘घर-घर मोदी’संदर्भातील आपले वचन पूर्ण करत आहे का?',असा प्रश्न उपस्थित करत ओवेसी यांनी टोला हाणला आहे.   

विरोधकांनी केलेल्या शाब्दिक हल्ल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत यावर स्पष्टीकरण दिले. जेटली म्हणाले की, सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खासगी आयुष्यावर कोणताही परिणाम होणार नाही. 18 वर्षांपूर्वी माहिती तंत्रज्ञान कायदा आला होता. यातील कलम 69 अंतर्गत असं सांगण्यात आले होते की, राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्व आणि ऐक्य यासंबंधी कोणतीही चिंताजनक परिस्थिती उद्भवल्यास सक्षम तपास यंत्रणा याची तपासणी करू शकतात.

(अबकी बार,निजता पर वार!; विरोधकांचा मोदी सरकारवर निशाणा)

(परवानगीशिवाय कम्प्युटरवर सरकारची नजर, 10 तपास यंत्रणा ठेवणार पहारा)दरम्यान, जेटलींनी दिलेल्या उत्तरावर काँग्रेसचे गुलाम नबी आझाद यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आझाद यांनी म्हटलं की, जारी करण्यात आलेल्या आदेशामध्ये राष्ट्रीय सुरक्षेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. यावर जेटली यांनी म्हटलं की, संबंधित नियम 2009 साली जारी करण्यात आला होता. ज्यामध्ये तपासणीसाठी अशा यंत्रणांना अधिकृत अधिकृत केले गेले आहे. या निर्णयात सर्वसामान्य लोकांवर नजर ठेवण्यासारखी कोणतीही गोष्ट नमूद करण्यात आलेली नाही. आयटी अॅक्टच्या कलम 69अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला असून यामध्ये राष्ट्रीय सुरक्षेचा उल्लेख करण्यात आला आहे. अशामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे अधिकार आणि त्यांच्या गोपनीय बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

 

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीITमाहिती तंत्रज्ञान