शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Rafale Deal: दिशाभूल करणाऱ्यांना जनताच शिक्षा देईल; भाजपाचं काँग्रेसवर शरसंधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 15:14 IST

कॅगच्या अहवालानंतर भाजपाचा काँग्रेसवर हल्लाबोल

नवी दिल्ली: एनडीए सरकारचं राफेल डील यूपीए सरकारपेक्षा स्वस्त असल्याची माहिती कॅगच्या अहवालातून समोर आल्यानंतर भाजपानंकाँग्रेसवर हल्लाबोल केला. शेवटी सत्याचाच विजय होतो, अशी प्रतिक्रिया यानंतर केंद्रीय मंत्री अरुण जेटलींनी दिली. राफेल डीलबद्दलकाँग्रेसनं सतत चुकीची माहिती पसरवली. कॅगच्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. आता खोटी माहिती पसवणाऱ्यांना देशाची जनताच योग्य शिक्षा देईल, असं म्हणत जेटलींनी काँग्रेसला लक्ष्य केलं. मोदी सरकारनं 36 राफेल विमानांसाठी केलेला करार यूपीए सरकारनं केलेल्या करारापेक्षा 2.86 टक्क्यांनी स्वस्त असल्याची माहिती कॅगच्या अहवालातून समोर आली. हा अहवाल आज संसदेत मांडण्यात आला. त्यामुळे काँग्रेस पक्ष काहीसा बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं.  तर भाजपा नेत्यांनी काँग्रेसवर शाब्दिक हल्ला चढवला. 'कॅगच्या अहवालामुळे खोटे दावे करणाऱ्या काँग्रेसचा पर्दाफाश झाला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सतत खोटी माहिती पसरवत होते. सर्वोच्च न्यायालयानं राफेल डीलबद्दल समाधान व्यक्त केलं होतं. आता कॅगनंदेखील याबद्दल आक्षेप नोंदवलेला नाही. त्यामुळे सरकारच्या हेतूंविषयी शंका घेण्याचं कारण नाही,' असं जेटली म्हणाले. हे प्रकरण इथंच संपायला नको. देशाची दिशाभूल करणाऱ्यांना आता जनतेनंच शिक्षा द्यायला हवी, असंदेखील त्यांनी म्हटलं. काँग्रेसकडून 1989ची पुनरावृत्ती केली जात असल्याचा आरोपही जेटलींनी केला. 1989 मध्ये राजीव गांधींच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यावेळी यावरुन लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी व्ही. पी. सिंह यांच्याविरोधातील सेंट कीट्स प्रकरण चर्चेत आणलं. आता मोदी सरकारची प्रतिमा स्वच्छ असताना काँग्रेसकडून असाच प्रयत्न केला जात असल्याचं जेटली यांनी सांगितलं. संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी राफेल डीलबद्दल आक्षेप नोंदवल्याचं वृत्त 'द हिंदू' या वृत्तपत्रानं दिलं होतं. त्यावरही जेटलींनी भाष्य केलं. 'घटनात्मक प्रक्रियेत प्रत्येक व्यक्तीला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र शेवटचा निर्णय सरकारचा असतो. ज्या मुद्द्यांवर आक्षेप होता, त्या अधिकाऱ्यांनी सहीनिशी मांडल्या होत्या. यानंतर नव्या करारावर त्याच अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली. याचा अर्थ त्यांनी कराराचं समर्थन केलं,' असं जेटली म्हणाले.  

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलArun Jaitleyअरूण जेटलीcongressकाँग्रेसBJPभाजपा