शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

'अटक करायची असेल तर करा, पण मी पश्चिम बंगालला जाणारच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 16:18 IST

भाजपा अध्यक्ष 11 ऑगस्टला पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली: परवानगी मिळो, अथवा न मिळो, मी पश्चिम बंगालला जाणारच, असं भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. अमित शहा 11 ऑगस्टला पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. माझा पश्चिम बंगाल दौरा निश्चित आहे. जर राज्य सरकारला मला अटक करायची असल्यास, त्यांनी ती जरुर करावी, असंही शहा म्हणाले. आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आलं आहे. त्यावरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहांचा पश्चिम बंगाल दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आलं आहे. यामध्ये राज्यातील 40 लाख लोकांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. कागदपत्रं नसली म्हणून काय नागरिकांना देशाबाहेर हाकलणार का?, असा प्रश्न बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी उपस्थित केला आहे. मायावती यांच्यासोबतच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपाला देशात गृहयुद्ध पेटवायचं आहे, असा गंभीर आरोप बॅनर्जी यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी हा मुद्दा लावून धरला असताना दिल्लीत भाजपाचे अध्यक्ष आणि खासदार अमित शहा यांनी राज्यसभेत विरोधकांवर शरसंधान साधलं. राजीव गांधी पंतप्रधान असताना 1985 मध्ये आसाम करार करण्यात आला. मात्र या कराराची अंमलबजावणी करण्याची हिंमत काँग्रेसनं दाखवली नाही. मात्र भाजपानं हे धाडस दाखवलं आणि राजीव गांधींना जे जमलं नाही, ते करुन दाखवलं, असं शहा राज्यसभेत म्हणाले. 40 लाख घुसखोरांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतंय, असा सवाल उपस्थित करत शहांनी काँग्रेसवरदेखील निशाणा साधला होता. यानंतर काँग्रेस खासदारांनी सभागृहात गोंधळ घातला. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज स्थगित करावं लागलं. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाwest bengalपश्चिम बंगालNational Register of CitizensएनआरसीAssamआसामMamata Banerjeeममता बॅनर्जी