शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

जगभर : एका ‘टिकली’चं महाभारत! संसारच तुटण्याची आली होती वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 08:40 IST

उत्तर प्रदेशातील आग्रा इथे अशाच एका ‘छोट्या वाटणाऱ्या, खूप मोठ्या कारणानं’ एका नवदाम्पत्याचा संसारच तुटण्याची वेळ आली होती.

बांगड्या, टिकल्या, गळ्यातलं, कानातलं.. या गोष्टी म्हणजे भारतीय महिलांसाठी केवळ साजशृंगार नाही, तर तो एक मोठा सांस्कृतिक, पारंपरिक वारसा आणि ठेवाही आहे. त्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही अतिशय हळवा असतो. विवाहित स्त्रियांसाठी तर अधिकच. त्यामुळेच स्त्रियांना त्याचं अपरंपार कौतुकही असतं. 

उत्तर प्रदेशातील आग्रा इथे अशाच एका ‘छोट्या वाटणाऱ्या, खूप मोठ्या कारणानं’ एका नवदाम्पत्याचा संसारच तुटण्याची वेळ आली होती. काय होतं हे कारण? - तर कपाळावरची टिकली! टिकली ही कोणाला अगदी क्षुल्लक गोष्ट वाटेल, पण त्याचं महत्त्व स्त्रियांसाठी खरोखरच अनन्यसाधारण. 

आग्र्यामध्ये नुकतीच घडलेली ही घटना. नुकतंच एका जोडप्याचं लग्न झालेलं. नववधू सासरी रमत होती. वेगवेगळ्या गोष्टी स्वत:हून समजून घेत होती. सासरी आल्यावर बऱ्याचदा अनेक जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडतात. बऱ्याच महिला ही अतिरिक्त जबाबदारी आनंदानं स्वीकारतात आणि निभावतातही. तसंच ही नववधूही सासरचा स्वभाव, आवड-निवड समजून घेत होती. त्यानुसार स्वत:ला बदलत होती. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं.

काही दिवसांनी मात्र त्या दोघा नवरा-बायकोत खटके उडायला लागले. हे भांडण होतं टिकलीवरून. बायको दिवसातून अनेकदा टिकली बदलते हे काही नवऱ्याला आवडायचं नाही. बायकोला तर टिकल्यांची आवड. कपाळावर टिकली नाही, असं होणंही तिच्या बाबतीत शक्यच नव्हतं. कारण प्रत्येक महिलेसाठी तो सौभाग्यलंकार असतो. 

बायको दिवसातून इतक्या वेळा टिकल्या का बदलते, याचं सुरुवातीला नवऱ्याला आश्चर्य वाटायचं. त्यानंतर त्याला त्याचा राग यायला लागला. आपण सकाळी जेव्हा घरातून निघून कामावर जातो, तेव्हा बायकोच्या कपाळावर एक टिकली असते, तर घरी आल्यावर दुसरीच. दिवसातून अनेकदा ती टिकली बदलते हे त्याला आवडायचं नाही. मग त्यानं बायकोला मोजून टिकल्या द्यायला सुरुवात केली. दिवसाला फक्त एक. आज एक टिकली दिली की मग दुसऱ्या दिवशी दुसरी टिकली. 

बायकोला काही ही गोष्ट रुचली नाही. एवढीशी ती टिकली; पण या टिकल्याही आपला नवरा आपल्याला देत नाही. मोजून मापून देतो. त्याचा हिशेब ठेवतो, यावरून तिलाही सुरुवातीला वाईट वाटलं. हळूहळू तिला या गोष्टीचा राग यायला लागला. नंतर तर तिचा संताप इतका अनावर झाला की ती घर सोडून थेट माहेरी निघून गेली. 

एवढंच नाही, पोलिस ठाण्यात तिनं नवऱ्याविरुद्ध तक्रारही नोंदवली. तीन महिने सासरचं तोंडही तिनं पाहिलं नाही. शेवटी पोलिसांनीच मध्यस्थी केली. दोघांनाही मॅरेज काउन्सिलरकडे पाठवण्यात आलं. तिथे एका महत्त्वाच्या गोष्टीवर प्रकाश पडला. 

नववधू सासरी दिवसभर काही ना काही काम करीत असायची. कामात बऱ्याचदा कपाळावरची टिकली निघून जायची किंवा पडून जायची. कपाळ उघडं कसं ठेवणार? - म्हणून ती लगेच दुसरी टिकली लावायची. दुसरीकडे नवऱ्याला वाटायचं, मी घरी नसताना ही टिकली का बदलते? त्याला ते विचित्र वाटायचं. काऊन्सिलरनं दोघांमधले गैरसमज दूर केल्यावर नवऱ्यालाही आपली चूक कळली. बायको पुन्हा सासरी आली. ‘टिकली पुराण’ संपलं. निदान आतातरी दोघंही सुखानं नांदताहेत.

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीUttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नFamilyपरिवार