शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

जगभर : एका ‘टिकली’चं महाभारत! संसारच तुटण्याची आली होती वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 08:40 IST

उत्तर प्रदेशातील आग्रा इथे अशाच एका ‘छोट्या वाटणाऱ्या, खूप मोठ्या कारणानं’ एका नवदाम्पत्याचा संसारच तुटण्याची वेळ आली होती.

बांगड्या, टिकल्या, गळ्यातलं, कानातलं.. या गोष्टी म्हणजे भारतीय महिलांसाठी केवळ साजशृंगार नाही, तर तो एक मोठा सांस्कृतिक, पारंपरिक वारसा आणि ठेवाही आहे. त्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही अतिशय हळवा असतो. विवाहित स्त्रियांसाठी तर अधिकच. त्यामुळेच स्त्रियांना त्याचं अपरंपार कौतुकही असतं. 

उत्तर प्रदेशातील आग्रा इथे अशाच एका ‘छोट्या वाटणाऱ्या, खूप मोठ्या कारणानं’ एका नवदाम्पत्याचा संसारच तुटण्याची वेळ आली होती. काय होतं हे कारण? - तर कपाळावरची टिकली! टिकली ही कोणाला अगदी क्षुल्लक गोष्ट वाटेल, पण त्याचं महत्त्व स्त्रियांसाठी खरोखरच अनन्यसाधारण. 

आग्र्यामध्ये नुकतीच घडलेली ही घटना. नुकतंच एका जोडप्याचं लग्न झालेलं. नववधू सासरी रमत होती. वेगवेगळ्या गोष्टी स्वत:हून समजून घेत होती. सासरी आल्यावर बऱ्याचदा अनेक जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडतात. बऱ्याच महिला ही अतिरिक्त जबाबदारी आनंदानं स्वीकारतात आणि निभावतातही. तसंच ही नववधूही सासरचा स्वभाव, आवड-निवड समजून घेत होती. त्यानुसार स्वत:ला बदलत होती. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं.

काही दिवसांनी मात्र त्या दोघा नवरा-बायकोत खटके उडायला लागले. हे भांडण होतं टिकलीवरून. बायको दिवसातून अनेकदा टिकली बदलते हे काही नवऱ्याला आवडायचं नाही. बायकोला तर टिकल्यांची आवड. कपाळावर टिकली नाही, असं होणंही तिच्या बाबतीत शक्यच नव्हतं. कारण प्रत्येक महिलेसाठी तो सौभाग्यलंकार असतो. 

बायको दिवसातून इतक्या वेळा टिकल्या का बदलते, याचं सुरुवातीला नवऱ्याला आश्चर्य वाटायचं. त्यानंतर त्याला त्याचा राग यायला लागला. आपण सकाळी जेव्हा घरातून निघून कामावर जातो, तेव्हा बायकोच्या कपाळावर एक टिकली असते, तर घरी आल्यावर दुसरीच. दिवसातून अनेकदा ती टिकली बदलते हे त्याला आवडायचं नाही. मग त्यानं बायकोला मोजून टिकल्या द्यायला सुरुवात केली. दिवसाला फक्त एक. आज एक टिकली दिली की मग दुसऱ्या दिवशी दुसरी टिकली. 

बायकोला काही ही गोष्ट रुचली नाही. एवढीशी ती टिकली; पण या टिकल्याही आपला नवरा आपल्याला देत नाही. मोजून मापून देतो. त्याचा हिशेब ठेवतो, यावरून तिलाही सुरुवातीला वाईट वाटलं. हळूहळू तिला या गोष्टीचा राग यायला लागला. नंतर तर तिचा संताप इतका अनावर झाला की ती घर सोडून थेट माहेरी निघून गेली. 

एवढंच नाही, पोलिस ठाण्यात तिनं नवऱ्याविरुद्ध तक्रारही नोंदवली. तीन महिने सासरचं तोंडही तिनं पाहिलं नाही. शेवटी पोलिसांनीच मध्यस्थी केली. दोघांनाही मॅरेज काउन्सिलरकडे पाठवण्यात आलं. तिथे एका महत्त्वाच्या गोष्टीवर प्रकाश पडला. 

नववधू सासरी दिवसभर काही ना काही काम करीत असायची. कामात बऱ्याचदा कपाळावरची टिकली निघून जायची किंवा पडून जायची. कपाळ उघडं कसं ठेवणार? - म्हणून ती लगेच दुसरी टिकली लावायची. दुसरीकडे नवऱ्याला वाटायचं, मी घरी नसताना ही टिकली का बदलते? त्याला ते विचित्र वाटायचं. काऊन्सिलरनं दोघांमधले गैरसमज दूर केल्यावर नवऱ्यालाही आपली चूक कळली. बायको पुन्हा सासरी आली. ‘टिकली पुराण’ संपलं. निदान आतातरी दोघंही सुखानं नांदताहेत.

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीUttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नFamilyपरिवार