शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

जगभर : एका ‘टिकली’चं महाभारत! संसारच तुटण्याची आली होती वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 08:40 IST

उत्तर प्रदेशातील आग्रा इथे अशाच एका ‘छोट्या वाटणाऱ्या, खूप मोठ्या कारणानं’ एका नवदाम्पत्याचा संसारच तुटण्याची वेळ आली होती.

बांगड्या, टिकल्या, गळ्यातलं, कानातलं.. या गोष्टी म्हणजे भारतीय महिलांसाठी केवळ साजशृंगार नाही, तर तो एक मोठा सांस्कृतिक, पारंपरिक वारसा आणि ठेवाही आहे. त्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही अतिशय हळवा असतो. विवाहित स्त्रियांसाठी तर अधिकच. त्यामुळेच स्त्रियांना त्याचं अपरंपार कौतुकही असतं. 

उत्तर प्रदेशातील आग्रा इथे अशाच एका ‘छोट्या वाटणाऱ्या, खूप मोठ्या कारणानं’ एका नवदाम्पत्याचा संसारच तुटण्याची वेळ आली होती. काय होतं हे कारण? - तर कपाळावरची टिकली! टिकली ही कोणाला अगदी क्षुल्लक गोष्ट वाटेल, पण त्याचं महत्त्व स्त्रियांसाठी खरोखरच अनन्यसाधारण. 

आग्र्यामध्ये नुकतीच घडलेली ही घटना. नुकतंच एका जोडप्याचं लग्न झालेलं. नववधू सासरी रमत होती. वेगवेगळ्या गोष्टी स्वत:हून समजून घेत होती. सासरी आल्यावर बऱ्याचदा अनेक जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडतात. बऱ्याच महिला ही अतिरिक्त जबाबदारी आनंदानं स्वीकारतात आणि निभावतातही. तसंच ही नववधूही सासरचा स्वभाव, आवड-निवड समजून घेत होती. त्यानुसार स्वत:ला बदलत होती. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं.

काही दिवसांनी मात्र त्या दोघा नवरा-बायकोत खटके उडायला लागले. हे भांडण होतं टिकलीवरून. बायको दिवसातून अनेकदा टिकली बदलते हे काही नवऱ्याला आवडायचं नाही. बायकोला तर टिकल्यांची आवड. कपाळावर टिकली नाही, असं होणंही तिच्या बाबतीत शक्यच नव्हतं. कारण प्रत्येक महिलेसाठी तो सौभाग्यलंकार असतो. 

बायको दिवसातून इतक्या वेळा टिकल्या का बदलते, याचं सुरुवातीला नवऱ्याला आश्चर्य वाटायचं. त्यानंतर त्याला त्याचा राग यायला लागला. आपण सकाळी जेव्हा घरातून निघून कामावर जातो, तेव्हा बायकोच्या कपाळावर एक टिकली असते, तर घरी आल्यावर दुसरीच. दिवसातून अनेकदा ती टिकली बदलते हे त्याला आवडायचं नाही. मग त्यानं बायकोला मोजून टिकल्या द्यायला सुरुवात केली. दिवसाला फक्त एक. आज एक टिकली दिली की मग दुसऱ्या दिवशी दुसरी टिकली. 

बायकोला काही ही गोष्ट रुचली नाही. एवढीशी ती टिकली; पण या टिकल्याही आपला नवरा आपल्याला देत नाही. मोजून मापून देतो. त्याचा हिशेब ठेवतो, यावरून तिलाही सुरुवातीला वाईट वाटलं. हळूहळू तिला या गोष्टीचा राग यायला लागला. नंतर तर तिचा संताप इतका अनावर झाला की ती घर सोडून थेट माहेरी निघून गेली. 

एवढंच नाही, पोलिस ठाण्यात तिनं नवऱ्याविरुद्ध तक्रारही नोंदवली. तीन महिने सासरचं तोंडही तिनं पाहिलं नाही. शेवटी पोलिसांनीच मध्यस्थी केली. दोघांनाही मॅरेज काउन्सिलरकडे पाठवण्यात आलं. तिथे एका महत्त्वाच्या गोष्टीवर प्रकाश पडला. 

नववधू सासरी दिवसभर काही ना काही काम करीत असायची. कामात बऱ्याचदा कपाळावरची टिकली निघून जायची किंवा पडून जायची. कपाळ उघडं कसं ठेवणार? - म्हणून ती लगेच दुसरी टिकली लावायची. दुसरीकडे नवऱ्याला वाटायचं, मी घरी नसताना ही टिकली का बदलते? त्याला ते विचित्र वाटायचं. काऊन्सिलरनं दोघांमधले गैरसमज दूर केल्यावर नवऱ्यालाही आपली चूक कळली. बायको पुन्हा सासरी आली. ‘टिकली पुराण’ संपलं. निदान आतातरी दोघंही सुखानं नांदताहेत.

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीUttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नFamilyपरिवार