शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

लष्कराने राहुल गांधींना दिले उत्तर? सांगितले शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला किती पैसे मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 10:18 IST

भारतमातेचे रक्षण करताना देशातील पहिला अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते या जवानाला वीरमरण आले.

भारतमातेचे रक्षण करताना देशातील पहिला अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते या जवानाला वीरमरण आले. मागील वर्षी वादग्रस्त ठरलेल्या अग्नीवीर योजनेद्वारे अनेक तरूण सैन्यात भरती झाले. यातील एका अग्निवीर जवानाला देशाचे रक्षण करताना हौतात्म्य आले. लडाखच्या सियाचीन ग्लेशियरमध्ये तैनात असलेले अग्निवीर (ऑपरेटर) अक्षय लक्ष्मण गवते यांना हौतात्म्य आले. विशेष बाब म्हणजे ऑनड्युटी शहीद झालेले अक्षय पहिले अग्निवीर आहेत. अक्षय शहीद झाल्यानंतर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी भारतमातेच्या सुपुत्राला सलाम ठोकला. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अक्षय यांच्या कुटुंबीयांसाठी आवाज उठवला. यावर आता भारतीय सैन्याकडून प्रत्युत्तर आले आहे. 

इस्रायलने केली विशेष दलाची स्थापना! हमासच्या सैनिकांविरोधात उघडणार मोठी मोहिम

सियाचीनमध्ये शहीद झालेल्या अक्षय लक्ष्मण यांना आर्थिक मदत देण्याची तयारी भारतीय लष्कराने पूर्ण केली आहे. रविवारी रात्रीच अग्निवीरच्या कुटुंबीयांना लाखो रुपयांची मदत मिळणार असल्याची माहिती लष्कराने दिली आहे. काल राहुल गांधी यांनी मदतीवरुन आरोप केले होते.

लष्कराने सांगितले की, नियमांनुसार ४८ लाख रुपयांचा नॉन-कंट्रिब्युटरी इन्शुरन्स, ४४ लाख रुपयांचा एक्स-ग्रेशिया, उर्वरित चार वर्षांच्या कार्यकाळासाठी वेतन म्हणजेच १३ लाख रुपयांपेक्षा जास्त, सशस्त्र सेना अपघात निधीतून ८ लाख रुपयांचे योगदान , ३० हजार रुपयांची तात्काळ भरपाई. कुटुंबाला अग्निवीर किंवा सहाय्य आणि सेवा निधीमध्ये योगदान देखील मिळेल. यामध्ये सरकारी योगदान आणि व्याजाचाही समावेश असेल.

'कमांड अक्षय लक्ष्मण यांना सियाचीनमध्ये सेवा बजावताना प्राण गमवावे लागले. या दु:खाच्या प्रसंगी भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबासोबत आहे. आर्थिक सहकार्याबाबत सोशल मीडियावर जारी करण्यात आलेल्या काही संदेशांदरम्यान ही माहिती स्पष्टपणे पोहोचवणे महत्त्वाचे असल्याचे लष्कराने म्हटले आहे. 

काँग्रेस नेते राहुल गांधींनी आरोप केला होता

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अग्निवीर गवते अक्षय लक्ष्मण यांचा फोटो शेअर करत म्हटले की, सियाचीनमध्ये त्यांच्या हौतात्म्याची बातमी अत्यंत दुःखद आहे.'त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनापासून संवेदना.'

पुढं राहुल गांधी यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'अग्नवीर, भारताच्या वीरांचा अपमान करण्याचा डाव आहे!'या वक्तव्यावर भाजपने आक्षेप घेतला होता.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान