शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 16:51 IST

मध्य प्रदेशातील इंदूर-बिलासपूर ट्रेनच्या B3 कोचमधून बेपत्ता झालेली अर्चना तिवारी अखेर १३ दिवसांनी सापडली आहे. मंगळवारी नेपाळ सीमेवरून अर्चना सापडली.

मध्य प्रदेशातील इंदूर-बिलासपूर ट्रेनच्या B3 कोचमधून बेपत्ता झालेली अर्चना तिवारी अखेर १३ दिवसांनी सापडली. मंगळवारी अर्चना नेपाळ सीमेवर सापडली. बुधवारी पोलिसांनी तिला भोपाळला आणले.  तिचा चौकशी केल्यानंतर तिने सर्व घटनाक्रम सांगितला. 

मध्य प्रदेशातील कटनी येथील रहिवासी असलेल्या २९ वर्षीय वकील अर्चना तिवारीचा पोलिसांना शोध घ्यावा लागला, पण ती तिच्या कथित प्रियकरासह हैदराबादहून दिल्ली आणि नेपाळमध्ये फिरत होती. अर्चना ७ ऑगस्ट रोजी नर्मदा एक्सप्रेसने इंदूरहून कटनीला निघाली आणि वाटेतच बेपत्ता झाली.

‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब

या प्रकरणी तिच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चनाच्या कुटुंबाने तिचे लग्न पटवारीशी ठरवले होते. पण तिला तो मुलगा आवडला नव्हता. वकील होण्यासोबतच न्यायाधीश होण्याची तयारी करणाऱ्या अर्चनाला तिचा अभ्यास सुरू ठेवायचा होता. कुटुंबाशी झालेल्या वादानंतर तिने शरण नावाच्या एका मित्र आणि त्याचा साथीदार तेजिंदरसोबत एक प्लान केला. तिघांनी ट्रेनमधून बेपत्ता होण्याचा कट रचला.  जानेवारी २०२५ मध्ये रेल्वे प्रवासादरम्यान ती शरनला भेटली होती. दोघे भेटत होते आणि बोलत होते.  आधी चौकशीत अर्चनाने शरणसोबत प्रेमसंबंध असल्याचे नाकारले.

अर्चनाने मित्रांना सगळेच सांगितले होते

अर्चनाने शरन आणि तेजिंदरला घरच्यांबाबत सांगितले होते. कुटुंबियांनी ठरवलेल्या मुलासोबत लग्न करायचे नाही असे तिने सांगितले. तिला कुटुंबियांपासून दूर रहायचे होते. यासाठी तिघांनी एकत्र बसून बेपत्ता होण्याचा हा प्लान बनवला. वकील असल्याने अर्चनाला माहित होते की बेपत्ता व्यक्तींचे अनेक खटले जीआरपीमध्ये येतात आणि तिला वाटले की बेपत्ता व्यक्तींची तक्रार दाखल केली जाईल आणि कदाचित तिचा इतका शोध घेतला जाणार नाही.

अर्चना ट्रेनमधून अशी गायब झाली

तेजिंदर हा शरनचा मित्र आहे आणि तो टॅक्सी चालवतो. तेजिंदर इटारसी रेल्वे स्टेशनजवळ राहत होता. त्याने सांगितले होते की तो अर्चनाला स्टेशनच्या त्या भागातून बाहेर काढेल जिथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. रक्षाबंधनासाठी ट्रेनमधून निघालेली अर्चना प्लाननुसार गायब झाली. शुजलपूरचा रहिवासी शरन अर्चनासाठी कपडे घेऊन नर्मदापुरमला आला. तेजिंदर नर्मदापुरम येथे ट्रेनमध्ये चढला. त्याने अर्चनाला कपडे दिले. दरम्यान, शरन रस्त्याने इटारसीला आला. येथे अर्चनाने तिचा कोच बदलला आणि नंतर तेजिंदर अर्चनाला इटारसीमध्ये घेऊन जाण्यात यशस्वी झाला. येथे अर्चनाने तिचा मोबाईल फोन आणि घड्याळ तेजिंदरला दिले आणि ते मिडघाट परिसरात फेकण्यास सांगितले.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश