शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
3
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
4
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
5
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
6
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
7
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
8
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
9
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
10
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
11
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
12
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
13
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
14
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
15
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
16
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
17
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
18
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
19
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिल संपत आला, मे आणखी ताप देणार! भारतात दुष्काळाचा अंदाज, मान्सूनवरही परिणाम होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 20:18 IST

देशातील ७० टक्के शेती ही मान्सूनवर केली जाते. या पावसावर सर्व शेतकरी अवलंबून असतात. 

दक्षिण आणि पूर्व आशियाई देशांसह भारतात यंदा उष्णतेने कहर मांडला आहे. जर असेच तापमान राहिले तर दुष्काळाचा देखील सामना करावा लागू शकतो अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जागतिक हवामान विज्ञान संघटनेने (WMO) ने या तापमान वाढीला अल नीनो जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यामुळे भारतासाठी चिंतेची बाब ठरण्याची शक्यता आहे. 

उन्हाळा आलाय, ही काळजी घ्या, हे खा... पाणी पाणी करणार नाही...अल नीनोमुळे तापमान वाढल्याने त्याचा परिणाम पावसावरही होणार आहे. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यावर याचा मोठा परिणाम जाणवेल असे या संस्थेने म्हटले आहे. जागतिक हवामान विज्ञान संघटनेनुसार मे महिन्यात अल नीनोचा परिणाम दिसू लागणार आहे. याचा परिणाम मान्सूनवरही दिसेल. देशातील ७० टक्के शेती ही मान्सूनवर केली जाते. या पावसावर सर्व शेतकरी अवलंबून असतात. 

काही दिवसांपूर्वी केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनीही भारतातील उष्णतेवर आपला अहवाल सादर केला आहे. यामध्ये भारताचा ९० टक्के भाग हा उष्णतेच्या धोकादायक झोनमध्ये असल्याचे म्हटले होते. हा अहवाल PLOS Climate मध्ये प्रकाशित झाला होता. 

उष्माघातापासून कसे वाचवाल स्वत:ला, हे आहेत संकेत, लक्षणे...या अहवालानुसार मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा उष्णतेच्या लाटेमध्ये समावेश आहे. या भागात सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस झाला आहे. वाढत्या उष्णतेला रोखण्यासाठी भारतासह संपूर्ण जगाने एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत, असे या अहवालात म्हटले आहे. 

हवामान विभाग काय सांगतो...पुढील 7 दिवसात भारताच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट नसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 25 ते 27 एप्रिल दरम्यान ओडिशात अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तर 25-26 एप्रिल रोजी विदर्भ, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी तर 25 ते 27 एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होऊ शकते. 

उन्हात तापलेली कार आतून लगेचच कशी थंड कराल? एसी वाढवण्याची चूक सारेच करतात... 

टॅग्स :Heat Strokeउष्माघातRainपाऊस