नवी दिल्ली - बहुजन समाज पक्षाचे नेते वीरसिंह यांनी न्यायालयीन विभागातील नियुक्तांमध्येही आरक्षण लागू करण्याची मागणी केली आहे. राज्यसभेत बोलताना, केंद्र सरकारकडून सरकारी नोकरीतील आरक्षण रद्दबातल करण्यात येत असल्याचा आरोप वीरसिंह यांनी केला. अर्थसंकल्पातील चर्चासत्रात सहभागी होताना त्यांनी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला.
सरकारने वर्षाला 2 कोटी युवकांना रोजगार देण्याचं वचन दिलं होतं. पण ते पाळलं नाही. बेरोजगारीने गेल्या 40 वर्षांतील सर्वाधिक मोठा आकडा गाठला आहे. देशात महागाई वाढत आहे, तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला चांगला भाव मिळत नाही, असे म्हणत बसप नेते खासदार वीरसिंह यांनी मोदी सरकारवर टीका केली.