शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

इलेक्ट्रीक वाहनांसाठी कोणीही चार्जिग स्टेशन उभारू शकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 19:52 IST

केंद्रासमोर सध्या चार्जिंग पॉईंट उभारण्याचे मोठे आव्हान आहे.

नवी दिल्ली : देशात हवा आणि ध्वनी प्रदुषणाच्या वाढत्या प्रमाणामुळे केंद्र सरकार लवकरच इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्री वाढीसाठी नवीन धोरण आखणार आहे. केंद्रासमोर सध्या चार्जिंग पॉईंट उभारण्याचे मोठे आव्हान आहे. कारण सध्याच्या तंत्रज्ञानानुसार 120 किमी पर्यंतच धावू शकणाऱ्या कार भारतात उपलब्ध आहेत. 

एका चार्जिंमध्ये कमी अंतर कापणाऱ्या कार आणि वीजेच्या उपलब्धतेची वानवा यामुळे सध्यातरी वाहनचालक डिझेल, पेट्रोलच्या कारना पसंती देत आहेत. भारतातील बरेचशे गावपाडे विजेविना अंधारात आहेत. ग्रामीण भागात भारनियमन केले जाते. शेतीला पाणी देण्यासाठी वीज दिली जात नाही. कोळशाअभावी विजनिर्मिती संच बंद असतात. अशा वेळी विजेवर चालणाऱ्या कार कितपत यशस्वी ठरतीय हा देखील प्रश्नच आहे. 

मात्र, विजेवर चालणाऱ्या गाड्या प्रदुषण कमी करणार असल्याने सरकार याकडे गांभिर्याने पाहत आहे. चार्जिंग स्टेशनचे जाळे उभे करण्यासाठी नवीन धोरणानुसार कोणीही चार्जिंग स्टेशन उभारू शकणार आहे. यामुळे उत्पन्नाचा नवा स्त्रोतही मिळणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारच्य़ा परवान्याची गरज भासणार नाही. 

वीज निर्मितीसाठी सौर उर्जा, पवन उर्जेपासून 100 आणि 60 गिगावॅट वीज उपलब्ध केली जाणार आहे. तसेच पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन देण्यासाठी पेट्रोलिअम मंत्रालयाशी चर्चा सुरु असल्याचे केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते.

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनElectric Carइलेक्ट्रिक कार