शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

इलेक्ट्रीक वाहनांसाठी कोणीही चार्जिग स्टेशन उभारू शकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 19:52 IST

केंद्रासमोर सध्या चार्जिंग पॉईंट उभारण्याचे मोठे आव्हान आहे.

नवी दिल्ली : देशात हवा आणि ध्वनी प्रदुषणाच्या वाढत्या प्रमाणामुळे केंद्र सरकार लवकरच इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्री वाढीसाठी नवीन धोरण आखणार आहे. केंद्रासमोर सध्या चार्जिंग पॉईंट उभारण्याचे मोठे आव्हान आहे. कारण सध्याच्या तंत्रज्ञानानुसार 120 किमी पर्यंतच धावू शकणाऱ्या कार भारतात उपलब्ध आहेत. 

एका चार्जिंमध्ये कमी अंतर कापणाऱ्या कार आणि वीजेच्या उपलब्धतेची वानवा यामुळे सध्यातरी वाहनचालक डिझेल, पेट्रोलच्या कारना पसंती देत आहेत. भारतातील बरेचशे गावपाडे विजेविना अंधारात आहेत. ग्रामीण भागात भारनियमन केले जाते. शेतीला पाणी देण्यासाठी वीज दिली जात नाही. कोळशाअभावी विजनिर्मिती संच बंद असतात. अशा वेळी विजेवर चालणाऱ्या कार कितपत यशस्वी ठरतीय हा देखील प्रश्नच आहे. 

मात्र, विजेवर चालणाऱ्या गाड्या प्रदुषण कमी करणार असल्याने सरकार याकडे गांभिर्याने पाहत आहे. चार्जिंग स्टेशनचे जाळे उभे करण्यासाठी नवीन धोरणानुसार कोणीही चार्जिंग स्टेशन उभारू शकणार आहे. यामुळे उत्पन्नाचा नवा स्त्रोतही मिळणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारच्य़ा परवान्याची गरज भासणार नाही. 

वीज निर्मितीसाठी सौर उर्जा, पवन उर्जेपासून 100 आणि 60 गिगावॅट वीज उपलब्ध केली जाणार आहे. तसेच पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन देण्यासाठी पेट्रोलिअम मंत्रालयाशी चर्चा सुरु असल्याचे केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते.

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनElectric Carइलेक्ट्रिक कार