शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
2
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
3
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
4
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
5
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
6
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
7
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
8
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
9
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
10
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
11
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
12
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
13
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
14
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
15
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
16
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
18
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
19
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: "राहुल जी शून्य तपासून घ्या"; भाजप खासदाराने वाचून दाखवला काँग्रेसच्या अपयशाचा पाढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 21:08 IST

माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

Anurag Thakur On Rahul Gandhi: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी हे भाजपच्या निशाण्यावर आहेत. संसदेतही अर्थसंकल्पीय अधिवेशनावरील चर्चेदरम्यानही भाजप खासदारांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. माजी मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधी यांचा उल्लेख करत अनुराग ठाकूर यांनी एक पोस्टर दाखवलं. पोस्टर दाखवत अनुराग ठाकूर यांनी राहुलजींनी शून्य तपासावे, असं म्हटलं. यावेळी अनुराग ठाकूर यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाचाही उल्लेख केला. अनुराग ठाकूर यांच्या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे हिमाचल प्रदेशचे खासदार अनुराग ठाकूर यांनी सोमवारी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान सरकारच्या कामगिरीची लेखाजोगा मांडत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. जेव्हा पंतप्रधान मोदींनी मध्यमवर्गीयांना दिलासा दिला, तेव्हा विरोधकांच्या पोटात दुखू लागले. त्यांना वाटले की आता आपली मते हिसकावून घेतली जातील, असं अनुराग ठाकूर म्हणाले. त्यानंतर ठाकूर यांनी एक पोस्टर काढले. त्यावर १२००००० रुपये करमुक्त असल्याचा उल्लेख होता. अनुराग ठाकूर यांनी हे दाखवून राहुल जी शून्य तपासून घ्या, असं म्हटलं.  यावर भाजपचे सर्व खासदार जोरात हसले.

यानंतर या शून्यामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला आहे, असं अनुराग ठाकूर म्हणाले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी बोलण्याचा प्रयत्न करता अनुराग ठाकूर यांनी. तुम्हाला हे आवडत नसेल तर आम्ही सोडून देतो. मात्र हे कोट्यवधी मध्यमवर्गीयांना आनंद देणारे आहे. देशाच्या विकासात हातभार लावणार आहे. पण अजून एक शून्य आहे, असं म्हटलं.

यानंतर अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसच्या अपयशाचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. "२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने काँग्रेसला किती जागा दिल्या, भाजप खासदार म्हणाले शून्य. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने काँग्रेसला किती जागा दिल्या शून्य, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला किती जागा दिल्या शून्य, २०२० च्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने काँग्रेसला किती जागा दिल्या शून्य. २०२४ च्या लोकसभेत किती जागा दिल्या तर शून्य आणि आता २०२५ च्या विधानसभेत किती जागा दिल्या शून्य. विक्रमी शून्य मिळण्याचे काम जर कोणी केले असेल तर तो राहुल गांधींचा पक्ष काँग्रेस आहे," असं अनुराग ठाकूर म्हणाले.

दरम्यान, यावेळी अनुराग ठाकूर यांनी अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षावरही निशाणा साधला. "दिल्ली निवडणुकीच्या निकालाने दिल्लीतील जनतेने दिल्ली आपत्तीमुक्त केल्याचे दिसून आले आहे. ही केवळ घोषणा नाही पंतप्रधान मोदी दिल्लीच्या हृदयात राहतात. दिल्लीतील जनतेला आपदाच्या लूटीतून मुक्तता मिळाली आहे. दिल्लीच्या जनतेने १० वर्षांच्या कुशासन आणि प्रदूषणातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला आहे," असं ठाकूर म्हणाले.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Anurag Thakurअनुराग ठाकुरRahul Gandhiराहुल गांधीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल