शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
2
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
3
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
4
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
5
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
6
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
7
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का
8
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
9
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
10
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
11
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
12
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
13
Paytm, Gpay, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
14
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
15
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
16
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
17
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
18
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
19
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
20
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह

VIDEO: "राहुल जी शून्य तपासून घ्या"; भाजप खासदाराने वाचून दाखवला काँग्रेसच्या अपयशाचा पाढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 21:08 IST

माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

Anurag Thakur On Rahul Gandhi: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी हे भाजपच्या निशाण्यावर आहेत. संसदेतही अर्थसंकल्पीय अधिवेशनावरील चर्चेदरम्यानही भाजप खासदारांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. माजी मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधी यांचा उल्लेख करत अनुराग ठाकूर यांनी एक पोस्टर दाखवलं. पोस्टर दाखवत अनुराग ठाकूर यांनी राहुलजींनी शून्य तपासावे, असं म्हटलं. यावेळी अनुराग ठाकूर यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाचाही उल्लेख केला. अनुराग ठाकूर यांच्या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे हिमाचल प्रदेशचे खासदार अनुराग ठाकूर यांनी सोमवारी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान सरकारच्या कामगिरीची लेखाजोगा मांडत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. जेव्हा पंतप्रधान मोदींनी मध्यमवर्गीयांना दिलासा दिला, तेव्हा विरोधकांच्या पोटात दुखू लागले. त्यांना वाटले की आता आपली मते हिसकावून घेतली जातील, असं अनुराग ठाकूर म्हणाले. त्यानंतर ठाकूर यांनी एक पोस्टर काढले. त्यावर १२००००० रुपये करमुक्त असल्याचा उल्लेख होता. अनुराग ठाकूर यांनी हे दाखवून राहुल जी शून्य तपासून घ्या, असं म्हटलं.  यावर भाजपचे सर्व खासदार जोरात हसले.

यानंतर या शून्यामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला आहे, असं अनुराग ठाकूर म्हणाले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी बोलण्याचा प्रयत्न करता अनुराग ठाकूर यांनी. तुम्हाला हे आवडत नसेल तर आम्ही सोडून देतो. मात्र हे कोट्यवधी मध्यमवर्गीयांना आनंद देणारे आहे. देशाच्या विकासात हातभार लावणार आहे. पण अजून एक शून्य आहे, असं म्हटलं.

यानंतर अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसच्या अपयशाचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. "२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने काँग्रेसला किती जागा दिल्या, भाजप खासदार म्हणाले शून्य. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने काँग्रेसला किती जागा दिल्या शून्य, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला किती जागा दिल्या शून्य, २०२० च्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने काँग्रेसला किती जागा दिल्या शून्य. २०२४ च्या लोकसभेत किती जागा दिल्या तर शून्य आणि आता २०२५ च्या विधानसभेत किती जागा दिल्या शून्य. विक्रमी शून्य मिळण्याचे काम जर कोणी केले असेल तर तो राहुल गांधींचा पक्ष काँग्रेस आहे," असं अनुराग ठाकूर म्हणाले.

दरम्यान, यावेळी अनुराग ठाकूर यांनी अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षावरही निशाणा साधला. "दिल्ली निवडणुकीच्या निकालाने दिल्लीतील जनतेने दिल्ली आपत्तीमुक्त केल्याचे दिसून आले आहे. ही केवळ घोषणा नाही पंतप्रधान मोदी दिल्लीच्या हृदयात राहतात. दिल्लीतील जनतेला आपदाच्या लूटीतून मुक्तता मिळाली आहे. दिल्लीच्या जनतेने १० वर्षांच्या कुशासन आणि प्रदूषणातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला आहे," असं ठाकूर म्हणाले.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Anurag Thakurअनुराग ठाकुरRahul Gandhiराहुल गांधीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल