शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

झारखंडच्या राजकारणात पुन्हा वादळ: काँग्रेसचे १२ आमदार नाराज, राज्याबाहेर जाण्याच्या विचारात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 18:38 IST

काँग्रेसचे १२ नाराज आमदार अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी जयपूर किंवा बंगळुरू इथं जाऊ शकतात. 

रांची : चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड सरकार अडचणीत सापडलं असून मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराज झालेले काँग्रेस आमदार सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकतात. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ईडी कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर चंपाई सोरेन यांच्याकडे राज्याची सूत्रे आली आहेत. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर सरकार टिकवण्याचं आव्हान चंपाई सोरेन यांच्यासमोर उभं ठाकलं आहे.

झारखंडमधील काँग्रेसचे १७ पैकी १२ आमदारांची आज रांची इथं एक गुप्त बैठक झाली. काँग्रेसला वाट्याला आलेल्या चार मंत्रिपदावरील व्यक्तींना बदललं नाही तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीच आम्ही राज्य सोडून बाहेर जाऊ, अशा इशारा यापूर्वीच काँग्रेसच्या नाराज आमदारांनी दिला आहे. नाराज असलेले काँग्रेस आमदार नवी दिल्ली इथं जाऊन काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची भेट घेण्याचीही शक्यता आहे. त्याआधीच चंपाई सोरेन हे दिल्लीला रवाना झाले असून त्यांच्यासोबत जेएमएमचे वरिष्ठ नेते विनोद कुमार पांडे, सुप्रियो भट्टाचार्य आणि आमदार सदिव्य कुमार सोनू हेदेखील आहेत.

काँग्रेसच्या मंत्र्यांना बदलून त्याऐवजी दुसऱ्या आमदारांना संधी द्यावी, अशी या नाराज आमदारांची मागणी आहे. या मुद्द्यावरून सरकारवर नाराज झालेले काँग्रेसचे १२ आमदार अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी जयपूर किंवा बंगळुरू इथं जाऊ शकतात. 

दरम्यान, काँग्रेस आमदारांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अडचणीतून मुख्यमंत्री चंपाई सोरेन आणि काँग्रेस नेतृत्व कसा मार्ग काढतात, हे पाहणं औत्सक्याचं ठरणार आहे.

 

टॅग्स :JharkhandझारखंडJharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चाcongressकाँग्रेस