शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

'इंडिया' आघाडीला आणखी एक धक्का! फारूख अब्दुल्ला जम्मू काश्मीरमध्ये 'एकटे' लढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 15:16 IST

इंडिया आघाडीला गेल्या काही दिवसांत अनेक स्थानिक पक्षांनी दणके दिल्याचे चित्र आहे

Farooq Abdullah Jammu Kashmir INDIA Opposition Alliance: उत्तर प्रदेशमध्ये जयंत चौधरी आणि पंजाबमध्ये भगवंत मान यांच्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीला आणखी एक धक्का बसला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमधील लोकसभेच्या पाचही जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. फारुख अब्दुल्ला हे इंडिया आघाडीच्या बैठकांना सुरुवातीपासून हजेरी लावत होते. मात्र अचानक त्यांनी असा निर्णयाने घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी फारूख अब्दुल्ला यांना मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीने समन्स बजावले होते. त्याचाच परिणाम म्हणून अब्दुल्ला यांनी आज असा निर्णय घेतला असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

पश्चिम बंगाल, पंजाब आणि दिल्लीत आप पक्षाने तसेच तृणमूल काँग्रेसने यापूर्वीच इंडिया आघाडीला धक्का दिला आहे. उत्तर प्रदेशातही समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात चर्चा होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत फारुख अब्दुल्ला यांच्या या निर्णयामुळे भारताची आघाडी आणखी कमकुवत होणार आहे.

दिल्लीत काँग्रेसला फक्त एक जागा

आम आदमी पार्टीच्या पीएसीच्या बैठकीनंतर दिल्लीत काँग्रेसला एक जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. आपचे खासदार आणि संघटनेचे सरचिटणीस संदीप पाठक म्हणाले की, आम्ही दिल्लीत काँग्रेसला १ जागा देऊ करत आहोत आणि आम आदमी पार्टी लोकसभेच्या ६ जागांवर निवडणूक लढवणार आहे. इंडिया आघाडीत काँग्रेसच्या जागावाटपाच्या विलंबाबाबत, आप खासदार आणि संघटनेचे सरचिटणीस संदीप पाठक म्हणाले, “आम्ही युतीमध्ये आलो तेव्हा आमच्या स्वतःच्या हिताचा विचार करण्याचा आमचा हेतू नव्हता. आम्ही प्रामाणिकपणा आणि समर्पणाने आघाडीमध्ये आहोत. INDIA चा उद्देश निवडणूक लढवणे आणि देशाला नवा पर्याय देणे हा आहे. उमेदवार वेळेवर जाहीर करणे, प्रचाराची रणनीती ठरवणे हेदेखील यात अपेक्षित आहे."

उत्तर प्रदेश, बंगाल, आसाममध्येही धुसफूस

नुकतेच आम आदमी पक्षाने आसाममधील लोकसभेच्या ३ जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव काँग्रेसला ८० जागांपैकी केवळ ११ जागा देण्याचे बोलत आहेत. पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जी यांनीही एकट्याने निवडणूक लढविण्याची भाषा केली आहे. अशा परिस्थितीत इंडिया आघाडी आता किती प्रभावीपणे भाजपाला विरोध करू शकते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेस