शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

आणखी एक हिरे व्यापारी बँकांना बुडवून पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 6:49 AM

नीरव मोदी, मेहुल चोकसी, द्वारकादास सेठ यांच्या घोटाळ्यानंतर आता यात आणखी नवीन नाव जोडले गेले आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : नीरव मोदी, मेहुल चोकसी, द्वारकादास सेठ यांच्या घोटाळ्यानंतर आता यात आणखी नवीन नाव जोडले गेले आहे. हे नाव आहे प्रख्यात हिरे व्यापारी जतीन मेहता यांचे. जतीन मेहता यांच्यावरही बँकांची फसवणूक करून ६,७१२ कोटींचा कथित घोटाळा केल्याचा आरोप आहे. काँग्रेसने केंद्र सरकारकडे याबाबतचा खुलासा मागितला आहे.काँग्रेस नेते शक्तिसिंह गोहिल आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांनी या कथित घोटाळ्यासंबंधी कागदपत्रे जनतेसमोर ठेवली आहेत. यात त्यांनी म्हटले आहे की, फेब्रुवारी २०१४ मध्ये मुंबईतील सीबीआय कार्यालय आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे जतीन मेहता यांच्या विनसम कंपनीविरोधात तक्रार करण्यात आली होती. यात बँकांची मोठी फसवणूक केल्याचा आरोप करीत या संदर्भातील पुरावेही सादर केले होते. परंतु सीबीआय तसेच मोदी सरकारने यावर काहीही कारवाई केली नाही. पुढे साडे तीन वर्षे शांत बसल्यानंतर सीबीआयने ५ एप्रिल २०१७ कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ४ एप्रिल २०१७ रोजी तक्रारकर्त्याने दिलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने ही तत्परता दाखविली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या काळात मोदी सरकार शांत बसले होते, तपास यंत्रणाही डोळे बंद करून बसल्या होत्या, तिकडे जतीन मेहता आणि त्याची पत्नी सहजपणे भारतातून पळून गेले, इतकेच काय त्यांनी भारताचे नागरिकत्वही सोडून दिले.हाती आलेल्या माहितीनुसार जतीन मेहता आणि त्याची पत्नी सध्या टॅक्सचोरीसाठी नंदनवन मानले जाणाºया सेंट किट्समध्ये रहात आहेत. त्यांनी हा देश निवडला कारण भारताने सेंट किट्ससोबत प्रत्यार्पण करार केलेला नाही.नीरव मोदी, मेहुल चोकसी यांच्याप्रमाणे जतीन मेहताही बँकांची फसवणूक करून भारतातून पळून गेला आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. याबाबत पंतप्रधानांनी बाळगलेल्या मौनाबद्दल काँग्रेसने टीका केली आहे. ‘चौकीदार झोपला आहे का, त्याचा आवाज का निघत नाही, तो शांत का बसला आहे’, असा जाब काँग्रेसने विचारला आहे.

काँग्रेसचे मोदींना प्रश्नसीबीआयने तात्काळ गुन्हा का दाखल केला नाही?साडेतीन वर्षांनंतर गुन्हा का दाखल केला?ईडी, ईओडब्ल्यू आणि मंत्रालयाने साडेतीन वर्षे कारवाई का नाही केली?हे सगळे शांत बसण्यामागचे रहस्य काय?

टॅग्स :congressकाँग्रेस