शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

"नवज्योतसिंग सिद्धूंनी कायमचं मौन पाळलं तर काँग्रेसला आणि देशाला शांतता मिळेल"; भाजपाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 12:11 IST

Navjot Singh Sidhu And Anil Vij : लखीमपूर हिंसाचारातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नवज्योतसिंग सिद्धू यांनी मौन व्रत पाळलं होतं. यावरून हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी त्यांना सणसणीत टोला लगावला

नवी दिल्ली - एकीकडे पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी अन्य पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असली, तरी दुसरीकडे काँग्रेस मात्र अंतर्गत वाद मिटवण्यासाठी धडपडताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे न घेण्याबाबत नवज्योत सिंग सिद्धू ठाम आहेत. याच दरम्यान लखीमपूर हिंसाचारातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी मौन व्रत पाळलं होतं. यावरून हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज (Anil Vij) यांनी त्यांना सणसणीत टोला लगावला आहे. "नवज्योतसिंग सिद्धू यांनी जर कायमचं मौन पाळलं तर काँग्रेस आणि देशाला खूप शांतता मिळेल" असं म्हटलं आहे. 

"काँग्रेस हे एक जहाज आहे जे बुडणार आहे" 

"नवज्योतसिंग सिद्धू यांनी मौन व्रत पाळलं आहे. जर त्यांनी हे मौन व्रत कायमचं पाळलं तर काँग्रेसलाही खूप शांतता मिळेल आणि देशालाही" असं म्हणत अनिल विज यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "काँग्रेस हे एक जहाज आहे जे बुडणार आहे" अशी बोचरी टीका देखील केली आहे. "काँग्रेसमध्ये कलह आहेत. जेव्हा एखादं जहाज बुडायला लागतं तेव्हा ते डगमगू लागतं. त्याचप्रमाणे, काँग्रेस देखील पुन्हा पुन्हा डगमगत आहे. याचवरून स्पष्ट होत आहे की, काँग्रेसचं जहाज बुडणार आहे" असं अनिल विज यांनी म्हटलं आहे. 

"राज्यातील शेतकरी खूप हुशार"

हरियाणातील शेतकऱ्यांचं कौतुक करताना अनिल विज यांनी "राज्यातील शेतकरी खूप हुशार आहेत. हरियाणाच्या शेतकऱ्यांना व्यवस्थित ठाऊक आहे की पिकांचे अवशेष जाळल्याने पर्यावरणाचं नुकसान होतं आणि जमिनीची सुपीकता देखील कमी होते. त्यामुळे हरियाणातील शेतकरी या बाबतीत नेहमी सावध असतात आणि शेतकऱ्यांना सरकारकडून वेळोवेळी याबाबत माहितीही दिली जाते" असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"...तसं झालं नाही तर आम्ही तोंड दाखवण्यालायक राहणार नाही"

मध्यंतरी पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी सिद्धू यांना समजवण्याचे प्रयत्न केले, तरी सिद्धू मात्र नियुक्त्या रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसल्याचे दिसत आहेत. यातच नवज्योत सिंग सिद्धू यांनी एक ट्विट करत जर तसे झाले नाही, तर आम्ही कोणाला तोंड दाखवण्यालायक राहणार नाही, असे म्हटले आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी एडव्होकेट जनरल यांच्या नियुक्तीवर आक्षेप नोंदवला होता. तसेच कॅबिनेटमध्ये ज्यापद्धतीने पोर्टफोलियोचे वाटप झाले त्यावर सिद्धू समाधानी नव्हते. नव्या कॅबिनेटमध्ये सुखविंदर सिंग रंधावा यांना गृहमंत्री बनवण्यात आले, मात्र सिद्धू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा याला विरोध होता. यातच आता एक ट्विट करत पुन्हा एकदा नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेसAnil Vijअनिल विजPoliticsराजकारण