शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
4
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
5
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
6
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
7
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
8
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
9
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
10
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
11
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
12
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
13
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
14
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
15
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
16
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
17
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
18
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
19
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
20
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?

लग्नात नेलं नाही म्हणून नाराज पत्नीनं संपवलं जीवन, दु:खात पतीनेही उचललं टोचाचं पाऊल, दोन मुलं झाली अनाथ    

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 14:34 IST

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे  कौटुंबिक वादातून पती पत्नीने जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. पतीने पत्नीला नातेवाईकाच्या लग्नामध्ये न नेल्याने नाराज झालेल्या पत्नी संतापाच्या भरात जीवन संपवलं.

उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे  कौटुंबिक वादातून पती पत्नीने जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. पतीने पत्नीला नातेवाईकाच्या लग्नामध्ये न नेल्याने नाराज झालेल्या पत्नी संतापाच्या भरात जीवन संपवलं. त्यानंतर पत्नीचा मृत्यू झाल्याने दु:खी झालेल्या पतीने भरधाव ट्रेनसमोर उडी मारून आपल्याची जीवनाचा शेवट केला. मात्र पती पत्नीने अगदी किरकोळ वादातून उचलेल्या या टोकाच्या पावलामुळे त्यांची दोन मुलं अनाथ झाली आहेत.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार चांदपूर क्षेत्रातील ककराला गावातील रोहित कुमार याच्या मामाच्या मुलाचं लग्न होतं. संपूर्ण कुटुंब लग्नाला गेलं होतं. तसेच रोहितची पत्नीही लग्नाला जाण्याची तयारी करत होती. मात्र रोहित मद्यपान करून घरी आला तेव्हा त्याने लग्नाला जाण्यास नकार दिला. त्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. तसेच रोहित रागाच्या भरात घरापासून दूर निघून गेला. तो गेल्यानंतर नाराज झालेल्या पत्नी पार्वतीने घरातच गळफास घेऊन जीवन संपवलं.

काही वेळाने रोहित घरी आला. तेव्हा त्याने पत्नीला गळफास घेतलेल्या स्थितीत पाहिलं. त्याने आरडाओरडा केला. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांना गोळा होत पार्वतीला खाली उतरवले आणि रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी पार्वतीला मृत घोषित केले. पत्नीचा मृत्यू झाल्याने धक्का बसलेला रोहितही नंतर घराबाहेर पडला आणि दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे मार्गावर पोहोचला. तिथे त्याने दिल्लीहून येत असलेल्या दिल्ली-कोटद्वार सिद्धबली एक्स्प्रेससमोर उडी घेत जीवन संपवलं.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, पती-पत्नीने अगदी किरकोळ कारणातून जीवन संपवल्याने दोन मुलं अनाथ झाली आहेत. त्यामध्ये ३ वर्षांचा मुलगा आणि दीड वर्षाच्या मुलीचा समावेश आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार