शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
3
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
4
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
5
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
6
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
7
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
8
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
9
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
10
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
11
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
12
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
13
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
14
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
15
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
16
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
17
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
18
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
19
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
20
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी

तीन राज्यांनी नाकारलेल्या ६ हजारांवर आदिवासी कुटुंबांनी जायचे तरी कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 07:20 IST

१६ वर्षांपूर्वी विस्थापित झालेल्यांना आंध्र-तेलंगणाच्या जंगलातून हुसकावणे सुरू

मनोज ताजनेगडचिरोली : जवळपास १६ वर्षांपूर्वी नक्षली हिंसाचाराला कंटाळून छत्तीसगडमधून विस्थापित होऊन तत्कालीन आंध्र प्रदेशच्या (आत्ताचे तेलंगणा) हद्दीतील जंगलात आश्रय घेतलेल्या सहा हजारांवर आदिवासी कुटुंबांसमोर आता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आंध्र-तेलंगणा सरकारने त्यांना आपल्या वनजमिनीवरून हुसकावून लावणे सुरू केले आहे, तर छत्तीसगड सरकार त्यांना आपले मानायला तयार नाही. अशा स्थितीत त्यांनी जायचे तरी कुठे? असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

१६-१७ वर्षांपूर्वी नक्षल्यांनी छत्तीसगडच्या बस्तर, सुकमा, जगदलपूर जिल्ह्यांमधील जंगलाच्या भागात आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांच्या हिंसक कारवायांनी त्रस्त आदिवासी नागरिकांना त्या भागात राहणे अशक्य झाले. त्यामुळे त्यांनी आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागातील जंगलात आश्रय घेतला. तेथील जंगल तोडून आपल्या वस्त्या वसविल्या आणि त्याच जमिनीवर शेती करून गुजराण करणे सुरू केले; पण इतकी वर्षे शांत असलेल्या तेलंगणा सरकारकडून आता आमच्या शेतजमिनीवर वृक्षलागवड करीत निघून जाण्यास प्रवृत्त केले जात आहे. 

दुसरीकडे, छत्तीसगड सरकार आमच्या राज्यातून कोणीही तिकडे विस्थापित झाले नसल्याचे सांगत आश्रय देत नसल्याची व्यथा मूळच्या बिजापूर जिल्ह्यातील, पण आता तेलंगणाच्या कोथागुडम परिसरात राहणाऱ्या सोडी गंगा या युवकाने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

‘केंद्र सरकारने मध्यस्थी करावी’मिझोरममध्ये अंतर्गत हिंसाचारामुळे तेथील ब्रू आदिवासींनी विस्थापित होऊन त्रिपुरात आश्रय घेतला होता. २०१९-२० मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने ब्रू पुनर्वसन योजना बनवून त्यांचे त्रिपुरा आणि मिझोरममध्ये पुनर्वसन केले होते. त्याच धर्तीवर छत्तीसगडमधील विस्थापित आदिवासी कुटुंबांचे पुनर्वसन केंद्र सरकारने करावे, अशी मागणी नवीन शांती प्रक्रिया या संघटनेच्या वतीने करण्यात आली.

 आदिवासी कुटुंबे विस्थापित झाल्यानंतर त्यांनी तेलंगणा-आंध्रच्या जंगलावर अतिक्रमण केले हे खरे आहे. पण आता त्यांना अशा पद्धतीने हुसकावण्याऐवजी मानवीय दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने मध्यस्थी करून या कुटुंबांना दिलासा द्यावा.- सुभ्रांशू चौधरी, समन्वयक, नवीन शांती प्रक्रिया

जीवन-मरणाचा प्रश्नछत्तीसगडमधून विस्थापित झालेल्या अशा ६७२१ कुटुंबांच्या २६० छोट्या वस्त्या असून त्यात ३५ हजारांवर लोक वास्तव्यास आहेत. राहण्यासाठी घर नाही, उदरनिर्वाहाचे साधन नाही, कोणत्याही शासकीय सवलतींचा लाभ नाही, अशा स्थितीत जगायचे तरी कसे? असा प्रश्न या आदिवासी कुटुंबांपुढे निर्माण झाला आहे.