शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

तीन राज्यांनी नाकारलेल्या ६ हजारांवर आदिवासी कुटुंबांनी जायचे तरी कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 07:20 IST

१६ वर्षांपूर्वी विस्थापित झालेल्यांना आंध्र-तेलंगणाच्या जंगलातून हुसकावणे सुरू

मनोज ताजनेगडचिरोली : जवळपास १६ वर्षांपूर्वी नक्षली हिंसाचाराला कंटाळून छत्तीसगडमधून विस्थापित होऊन तत्कालीन आंध्र प्रदेशच्या (आत्ताचे तेलंगणा) हद्दीतील जंगलात आश्रय घेतलेल्या सहा हजारांवर आदिवासी कुटुंबांसमोर आता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आंध्र-तेलंगणा सरकारने त्यांना आपल्या वनजमिनीवरून हुसकावून लावणे सुरू केले आहे, तर छत्तीसगड सरकार त्यांना आपले मानायला तयार नाही. अशा स्थितीत त्यांनी जायचे तरी कुठे? असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

१६-१७ वर्षांपूर्वी नक्षल्यांनी छत्तीसगडच्या बस्तर, सुकमा, जगदलपूर जिल्ह्यांमधील जंगलाच्या भागात आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांच्या हिंसक कारवायांनी त्रस्त आदिवासी नागरिकांना त्या भागात राहणे अशक्य झाले. त्यामुळे त्यांनी आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागातील जंगलात आश्रय घेतला. तेथील जंगल तोडून आपल्या वस्त्या वसविल्या आणि त्याच जमिनीवर शेती करून गुजराण करणे सुरू केले; पण इतकी वर्षे शांत असलेल्या तेलंगणा सरकारकडून आता आमच्या शेतजमिनीवर वृक्षलागवड करीत निघून जाण्यास प्रवृत्त केले जात आहे. 

दुसरीकडे, छत्तीसगड सरकार आमच्या राज्यातून कोणीही तिकडे विस्थापित झाले नसल्याचे सांगत आश्रय देत नसल्याची व्यथा मूळच्या बिजापूर जिल्ह्यातील, पण आता तेलंगणाच्या कोथागुडम परिसरात राहणाऱ्या सोडी गंगा या युवकाने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

‘केंद्र सरकारने मध्यस्थी करावी’मिझोरममध्ये अंतर्गत हिंसाचारामुळे तेथील ब्रू आदिवासींनी विस्थापित होऊन त्रिपुरात आश्रय घेतला होता. २०१९-२० मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने ब्रू पुनर्वसन योजना बनवून त्यांचे त्रिपुरा आणि मिझोरममध्ये पुनर्वसन केले होते. त्याच धर्तीवर छत्तीसगडमधील विस्थापित आदिवासी कुटुंबांचे पुनर्वसन केंद्र सरकारने करावे, अशी मागणी नवीन शांती प्रक्रिया या संघटनेच्या वतीने करण्यात आली.

 आदिवासी कुटुंबे विस्थापित झाल्यानंतर त्यांनी तेलंगणा-आंध्रच्या जंगलावर अतिक्रमण केले हे खरे आहे. पण आता त्यांना अशा पद्धतीने हुसकावण्याऐवजी मानवीय दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने मध्यस्थी करून या कुटुंबांना दिलासा द्यावा.- सुभ्रांशू चौधरी, समन्वयक, नवीन शांती प्रक्रिया

जीवन-मरणाचा प्रश्नछत्तीसगडमधून विस्थापित झालेल्या अशा ६७२१ कुटुंबांच्या २६० छोट्या वस्त्या असून त्यात ३५ हजारांवर लोक वास्तव्यास आहेत. राहण्यासाठी घर नाही, उदरनिर्वाहाचे साधन नाही, कोणत्याही शासकीय सवलतींचा लाभ नाही, अशा स्थितीत जगायचे तरी कसे? असा प्रश्न या आदिवासी कुटुंबांपुढे निर्माण झाला आहे.