शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

चंद्राबाबू नायडूंच्या पक्षाच्या नेत्यावर कुऱ्हाडीने हल्ला; मृत्यूनंतर मुख्यमंत्र्यांच्या मुलाने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 19:13 IST

आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाच्या नेत्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आलीय.

TDP Leader Attacked: आंध्र प्रदेशातचंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्षाच्या नेत्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आलीय. चाकू आणि कुऱ्हाडीने हल्ला करुन टीडीपी नेत्याची हत्या करण्यात आली. आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यात चाकू आणि कुऱ्हाडीने टीडीपी नेते गौरीनाथ चौधरी हल्ला यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात नेते गौरीनाथ चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर या हल्ल्याचा आरोप आहे.

ही घटना बोम्मिरेड्डीपल्ले गावात घडली. या गावातील वायएसआरसीपीच्या कार्यकर्त्यांवर चाकू आणि कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. गौरीनाथ चौधरी हे या भागातील टीडीपीचे प्रमुख नेते होते. चौधरी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचे नेतृत्व वायएसआरसीपी कार्यकर्ते पमय्या, रामकृष्ण आणि इतर करत होते. हत्येमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सुरक्षा दल तैनात करण्यात आलं आहे.

कर्नूलचे पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळाला भेट दिली असून स्थानिक लोकांना सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात पोलीस चौकीही उभारण्यात आली आहे. टीडीपी प्रमुख आणि मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे.

"वायएस जगन मोहन रेड्डी हरले तरीही त्यांनी रक्तरंजित इतिहास लिहिणे सुरूच ठेवले आहे. कुरनूल जिल्ह्यातील वेलदुर्थी मंडलातील बोम्मिरेड्डीपल्ले येथील टीडीपी नेते गौरीनाथ चौधरी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. जगन रेड्डी लोकांची हत्या करत आहेत. जर जगन रेड्डी यांनी हत्येचे राजकारण थांबवले नाही तर , परिणाम गंभीर होतील. गौरीनाथ चौधरी यांच्या कुटुंबाला टीडीपीचा पाठिंबा आहे. आरोपींना सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वायएसआरसीपीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यांची आम्ही चौकशी करू," असे नारा लोकेश यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीडीपीने १७५ पैकी १३५ जागा जिंकल्या आहेत. जनसेना पक्ष आणि भाजपने अनुक्रमे २१ आणि ८ जागा मिळवल्या. गेल्या निवडणुकीत १५१ जागा जिंकणाऱ्या वायएसआरसीपीने केवळ ११ जागा मिळाल्या आहेत.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशCrime Newsगुन्हेगारीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू