शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

जगन मोहन सरकार आपल्या राज्यातील प्रत्येक गावात मंदिर बांधणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 17:08 IST

मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम हिंदू धर्माचे संरक्षण आणि प्रचार करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे, असे उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण यांनी सांगितले. 

आंध्र प्रदेश सरकार राज्यातील प्रत्येक गावात मंदिर बांधणार आहे. प्रत्येक गावात एक मंदिर असावे, हे विचारात घेऊन राज्यात मोठ्या प्रमाणावर मंदिरांची उभारणी सुरू असल्याचे सरकारने म्हटले आहे. मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम हिंदू धर्माचे संरक्षण आणि प्रचार करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे, असे उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण यांनी सांगितले. 

"हिंदू धर्माचे मोठ्या प्रमाणावर संरक्षण आणि प्रचार करण्यासाठी दुर्बल घटकांच्या भागात हिंदू मंदिरांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे," असे उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण यांनी मंगळवारी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या श्री वाणी ट्रस्टने मंदिरांच्या बांधकामासाठी प्रत्येकी 10 लाख रुपये दिले आहेत. 1,330 मंदिरांचे बांधकाम सुरू झाल्यानंतर, यादीत आणखी 1,465 मंदिरांची योजना आखली आहे. तसेच, काही आमदारांच्या विनंतीवरून आणखी 200 मंदिरे बांधली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण म्हणाले की, उर्वरित मंदिरे इतर स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने बांधली जातील.

उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, एंडोमेंट विभागांतर्गत  (Endowments Department) 978 मंदिरांचे बांधकाम वेगाने सुरू आहे, तर प्रत्येक 25 मंदिरांचे काम एका सहाय्यक अभियंत्याकडे सोपविण्यात आले आहे. ते म्हणाले की, काही मंदिरांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि मंदिरांमध्ये धार्मिक विधी करण्यासाठी वाटप केलेल्या 270 कोटी रुपयांच्या सीजीएफ निधीपैकी 238 कोटी रुपये आधीच जारी करण्यात आले आहेत. तसेच, या आर्थिक वर्षात 5000 रुपये प्रति मंदिर दराने धार्मिक विधी (धूप-दीप नैवेद्यम) निधीसाठी राखून ठेवलेल्या 28 कोटींपैकी 15 कोटी रुपये संपले आहेत. 2019 पर्यंत धूप-दीप योजनेअंतर्गत केवळ 1561 मंदिरांची नोंदणी होती, जी आता 5000 झाली आहे, असे कोट्टू सत्यनारायण यांनी सांगितले.

याचबरोबर, मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसी सरकारने राज्यभरातील मंदिरांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असे उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण म्हणाले. तसेच, एंडोमेंट्स विभाग प्रत्येक मंदिरासाठी 10 लाख रुपये देऊन 3,000 मंदिरे विकसित आणि नूतनीकरण करण्याची योजना आखत आहे. यापूर्वीच जगन मोहन सरकारने 26 जिल्ह्यांमध्ये 1400 मंदिरे बांधण्याची घोषणा केली आहे. त्यापैकी 1030 बांधकामे सरकार स्वत: तर 330 समरसथ सेवा फाऊंडेशन बांधत आहेत. विशेष म्हणजे, हे फाउंडेशन आरएसएसशी संलग्न एनजीओ आहे. प्रत्येक मंदिरासाठी 8-8 लाख आणि मूर्तीसाठी 2-2 लाख रुपयांची तरतूद आहे, असेही उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण यांनी सांगितले.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशTempleमंदिर