शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

नशीबवान! कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याचं टोमॅटोमुळे बदललं आयुष्य; 45 दिवसांत कमावले 4 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 15:13 IST

मुरली य़ांनी अवघ्या दीड महिन्यात 4 कोटी रुपयांची कमाई केली आहे, ज्यामुळे त्यांचे आयुष्य बदलले आहे.

देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत, तर दुसरीकडे अनेक शेतकरी ते विकून श्रीमंत होत आहेत. अनेक शेतकरी करोडपती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असाच एक प्रकार आता आंध्र प्रदेशातून समोर आला आहे. 48 वर्षीय मुरली हा आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. टोमॅटोच्या शेतीमुळे आपलं नशीब फळफळेल असा विचारही त्यांनी केला नसेल.

TOI नुसार, मुरली य़ांनी अवघ्या दीड महिन्यात 4 कोटी रुपयांची कमाई केली आहे, ज्यामुळे त्यांचे आयुष्य बदलले आहे. ते कोलारमध्ये टोमॅटो विकण्यासाठी 130 किमी पेक्षा जास्त प्रवास करत आहे कारण येथील एपीएमसी चांगली किंमत देते. गेल्या आठ वर्षांपासून टोमॅटोची लागवड करत असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र टोमॅटोपासून एवढे मोठे उत्पन्न मिळेल, असे कधीच वाटले नव्हते.

मुरली यांच्या कुटुंबाला करकमंडला गावात वारसाहक्काने 12 एकर जमीन मिळाली, तर त्यांनी काही वर्षांपूर्वी आणखी 10 एकर जमीन खरेदी केली होती. किंबहुना, गेल्या वर्षी जुलैमध्ये किमती घसरल्याने त्यांच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले होते. त्याच्यावर दीड कोटी रुपयांचे कर्ज होते, जे त्यांनी बियाणे, खते, मजूर, वाहतूक आणि इतर लॉजिस्टिकवर गुंतवले. त्यांच्या गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने समस्यांचा सामना करावा लागतो. 

मुरारी यांनी 45 दिवसांत 4 कोटी रुपये कमावले असल्याचे सांगितले. आता जमिनीमध्ये पैसे गुंतवून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर बागायती व्यवसायात उतरण्याचा त्यांचा विचार आहे. आपल्या कार्याचा विस्तार करण्यासाठी गावात सुमारे 20 एकर जमीन खरेदी करण्याची त्याची योजना आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीAndhra Pradeshआंध्र प्रदेश