शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

स्थलांतरित मजुरांसाठी आंध्र सरकारच पॅकेज, जगनमोहन यांचं विशेष लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 05:42 IST

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अडकून पडल्याने सध्या शिबिरात राहात असलेल्या प्रत्येक स्थलांतरित मजुरात ‘लॉकडाऊन’ ३ मे रोजी संपल्यावर घरी परत जाताना रोख दोन हजार रुपये देण्याचा विचार मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी मांडला आहे

हैदराबाद : अन्य राज्यांतून आलेल्या स्थलांतरित मजुरांनी धोका पत्करून घरी परत जाण्याचा आटापिटा न करता ‘लॉकडाऊन’ संपेपर्यंत त्यांना सध्या ज्या शिबिरांमध्ये ठेवले आहे तेथेच राहण्यास त्यांनी उद्युक्त व्हावे यासाठी आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्याशी एक आकर्षक ‘पॅकेज’ देऊ केले आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अडकून पडल्याने सध्या शिबिरात राहात असलेल्या प्रत्येक स्थलांतरित मजुरात ‘लॉकडाऊन’ ३ मे रोजी संपल्यावर घरी परत जाताना रोख दोन हजार रुपये देण्याचा विचार मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी मांडला आहे. हे पैसे त्यांना सुरक्षित वाहनाने घरी परत जायला व तेथे गेल्यानंतर पुढे काही दिवस जेवणाखाण्यासाठी उपयोगी पडतील, असा सरकारचा विचार आहे. आता या स्थलांतरितांना डाळ किंवा सांबार भाताखेरीज दूध, अंडे, फळे, सुकामेवा, संत्रावर्गीय फळ व केळेही देण्यात येत आहे. असा प्रत्येक स्थलांतरित मजुरावर राज्य सरकार जेवण, निवास व्यवस्था, प्रवास व स्वच्छतागृहे यासाठी दिवसाला प्रत्येकी ८५० रुपये खर्च करीत आहे, असेही हा अधिकारी म्हणाला. (वृत्तसंस्था)उद्धव ठाकरे यांना ममता बॅनर्जींचा फोनच्कोलकाता : महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आदी राज्यांत लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या बंगाली मजुरांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून त्यांना स्थानिक यंत्रणा व लोकांशी समन्वय साधून पश्चिम बंगाल सरकारतर्फे आर्थिक मदत पोहोचविण्यात येईल, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी जाहीर केले.च्महाराष्ट्र सरकार स्थलांतरित मजुरांच्या देखभालीसाठी योग्य प्रकारे काम करत असल्याबद्दल ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करून त्यांचे आभार मानले.च्मुंबईत अडकून पडलेले हजारो स्थलांतरित मजूर वांद्रे रेल्वे टर्मिनसच्या बाहेर बुधवारी जमा झाले. आम्हाला गावी परतायचे असून त्यासाठी विशेष ट्रेन चालवाव्यात अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली होती. या मागणीचे राजकीय भांडवल करण्याचा काही जणांकडून प्रयत्न होत असल्याची टीका ममता बॅनर्जी यांनी केली. महाराष्ट्र सरकार स्थलांतरित मजुरांसाठी करत असलेल्या कार्यात पश्चिम बंगाल सरकार सहकार्य करण्यास तयार आहे असे ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दूरध्वनीवरून सांगितले.च् मुंबईप्रमाणेच गुजरातमधील सूरत येथेही अडकून पडलेले स्थलांतरित मजूर आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले होते. या आठवड्यात दुसऱ्यांदा असा प्रकार तिथे घडला आहे.प. बंगालमध्ये अडकले दोन लाख मजूरच्देशातील १८ राज्यांमध्ये हजारो बंगाली मजूर अडकून पडले आहेत. पश्चिम बंगालमध्ये अन्य राज्यातून आलेले २ लाख स्थलांतरित मजूर अडकून पडले आहेत. त्या सर्वांच्या राहाण्याची व जेवणाची सोय राज्य सरकारने ७११ निवारा छावण्यांत केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMigrationस्थलांतरणhyderabad-pcहैदराबादAndhra Pradeshआंध्र प्रदेश