शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
2
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
3
घरातून मांजरीची पिल्ले गायब झाली, संतापलेली पुतणी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली; काका-काकूंवर दाखल केला FIR! 
4
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
5
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
6
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
7
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न
8
"सलमान खानसोबत चित्रपट करणार नाही"; महेश मांजरेकरांचं मोठं विधान, म्हणाले- "मी त्याला शिवी..."
9
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
11
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
12
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
13
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
14
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
15
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
16
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
17
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
18
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
19
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
20
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह

स्थलांतरित मजुरांसाठी आंध्र सरकारच पॅकेज, जगनमोहन यांचं विशेष लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 05:42 IST

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अडकून पडल्याने सध्या शिबिरात राहात असलेल्या प्रत्येक स्थलांतरित मजुरात ‘लॉकडाऊन’ ३ मे रोजी संपल्यावर घरी परत जाताना रोख दोन हजार रुपये देण्याचा विचार मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी मांडला आहे

हैदराबाद : अन्य राज्यांतून आलेल्या स्थलांतरित मजुरांनी धोका पत्करून घरी परत जाण्याचा आटापिटा न करता ‘लॉकडाऊन’ संपेपर्यंत त्यांना सध्या ज्या शिबिरांमध्ये ठेवले आहे तेथेच राहण्यास त्यांनी उद्युक्त व्हावे यासाठी आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्याशी एक आकर्षक ‘पॅकेज’ देऊ केले आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अडकून पडल्याने सध्या शिबिरात राहात असलेल्या प्रत्येक स्थलांतरित मजुरात ‘लॉकडाऊन’ ३ मे रोजी संपल्यावर घरी परत जाताना रोख दोन हजार रुपये देण्याचा विचार मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी मांडला आहे. हे पैसे त्यांना सुरक्षित वाहनाने घरी परत जायला व तेथे गेल्यानंतर पुढे काही दिवस जेवणाखाण्यासाठी उपयोगी पडतील, असा सरकारचा विचार आहे. आता या स्थलांतरितांना डाळ किंवा सांबार भाताखेरीज दूध, अंडे, फळे, सुकामेवा, संत्रावर्गीय फळ व केळेही देण्यात येत आहे. असा प्रत्येक स्थलांतरित मजुरावर राज्य सरकार जेवण, निवास व्यवस्था, प्रवास व स्वच्छतागृहे यासाठी दिवसाला प्रत्येकी ८५० रुपये खर्च करीत आहे, असेही हा अधिकारी म्हणाला. (वृत्तसंस्था)उद्धव ठाकरे यांना ममता बॅनर्जींचा फोनच्कोलकाता : महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आदी राज्यांत लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या बंगाली मजुरांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून त्यांना स्थानिक यंत्रणा व लोकांशी समन्वय साधून पश्चिम बंगाल सरकारतर्फे आर्थिक मदत पोहोचविण्यात येईल, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी जाहीर केले.च्महाराष्ट्र सरकार स्थलांतरित मजुरांच्या देखभालीसाठी योग्य प्रकारे काम करत असल्याबद्दल ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करून त्यांचे आभार मानले.च्मुंबईत अडकून पडलेले हजारो स्थलांतरित मजूर वांद्रे रेल्वे टर्मिनसच्या बाहेर बुधवारी जमा झाले. आम्हाला गावी परतायचे असून त्यासाठी विशेष ट्रेन चालवाव्यात अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली होती. या मागणीचे राजकीय भांडवल करण्याचा काही जणांकडून प्रयत्न होत असल्याची टीका ममता बॅनर्जी यांनी केली. महाराष्ट्र सरकार स्थलांतरित मजुरांसाठी करत असलेल्या कार्यात पश्चिम बंगाल सरकार सहकार्य करण्यास तयार आहे असे ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दूरध्वनीवरून सांगितले.च् मुंबईप्रमाणेच गुजरातमधील सूरत येथेही अडकून पडलेले स्थलांतरित मजूर आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले होते. या आठवड्यात दुसऱ्यांदा असा प्रकार तिथे घडला आहे.प. बंगालमध्ये अडकले दोन लाख मजूरच्देशातील १८ राज्यांमध्ये हजारो बंगाली मजूर अडकून पडले आहेत. पश्चिम बंगालमध्ये अन्य राज्यातून आलेले २ लाख स्थलांतरित मजूर अडकून पडले आहेत. त्या सर्वांच्या राहाण्याची व जेवणाची सोय राज्य सरकारने ७११ निवारा छावण्यांत केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMigrationस्थलांतरणhyderabad-pcहैदराबादAndhra Pradeshआंध्र प्रदेश