शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

... अन् राजनाथसिंहांनी पुष्पहारातून स्वत:चं डोकं बाहेर काढलं; व्हिडिओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 13:22 IST

राजधानी दिल्लीत भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनातून मोदींनी अब की बार ४०० पार असा नारा देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवार (१८ फेब्रुवारी २०२४) रोजी राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय अधिवेशनात कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या नेत्यांना संबोधित केले. त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा दिली, तसेच पुढील १०० दिवस उत्साहाने काम करण्याचे आवाहनही केले. यावेळी, भाजपाच्या प्रमुख नेत्यांकडून मोदींचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. त्यावेळी, अगोदर मोदींसह पुष्पहारात स्वत:ही आलेल्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हळूच आपलं डोकं हारातून बाहेर काढलं.  

राजधानी दिल्लीत भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनातून मोदींनी अब की बार ४०० पार असा नारा देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, 'मी येथे उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. भाजप कार्यकर्ते वर्षातील प्रत्येक दिवशी, 24 तास देशाची सेवा करण्यासाठी काहीतरी करत राहतात. पण आता पुढचे 100 दिवस नव्या ऊर्जेने, नव्या उमेदीने, नव्या आत्मविश्वासाने काम करायचे आहे. प्रत्येक नवीन मतदार, प्रत्येक लाभार्थी, प्रत्येक वर्ग, समाज, पंथ, परंपरा या सर्वांपर्यंत पोहोचावे आणि सर्वांचा विश्वास संपादन करावा. सर्वांनी प्रयत्न केल्यावर भाजपला जास्तीत जास्त जागा मिळून आणखी देशसेवा करता येईल.' दरम्यान, तत्पूर्वी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून मोदींचा सत्कार करण्यात आला. भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोदींना पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केला. यावेळी, मोदींनी हात जोडून सर्वांना अभिवादन केले. दरम्यान, यावेळी मोदींसमवेतचा पुष्पहार देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही आपल्या गळ्यात घातला होता. मात्र, केवळ पंतप्रधानांच्याच गळ्यात हा हार असल्याचे लक्षात येताच, त्यांनी आपलं डोकं अलगदपणे हारातून बाहेर काढलं. राजनाथ सिंह यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओत हे दिसून येते. त्यानंतर, केवळ मोदींनाच तो पुष्हार घालून भाजपाचे हे दिग्गज नेते आणि मंत्री हात हाती घेऊन बाजुला उभे असल्याचे दिसून येते. व्हिडिओत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हेही दिसून येतात.

'मोदी म्हणाले एनडीए ४०० पार'

गेल्या १० वर्षात भारताने जी गती गाठली, मोठी उद्दिष्टे साध्य करण्याचे धाडस दाखवले, ते अभूतपूर्व आहेत. भारताने प्रत्येक क्षेत्रात जी उंची गाठली, त्याे प्रत्येक देशवासीयाला एकत्र केले. आता देश ना छोटी स्वप्ने पाहतो ना छोटे संकल्प करतो. आता देशाची स्वप्नेही मोठी असतील आणि संकल्पही प्रचंड असतील. हाच विकसित भारताचा संकल्प आहे. आज विरोधी पक्षाचे नेतेही एनडीए सरकार ४०० पारच्या घोषणा देत आहेत. एनडीएला ४०० चा टप्पा पार करण्यासाठी भाजपला ३७० चा टप्पा पार करावा लागेल,' असेही मोदी यावेळी म्हणाले.  

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीRajnath Singhराजनाथ सिंहAmit Shahअमित शाह