शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
4
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
5
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
6
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
8
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
12
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
13
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
14
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
15
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
16
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
17
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
18
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
19
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
20
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी

पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 14:24 IST

थार परिसरातील वाळवंटात पहिल्यांदाच पुरातत्वीय ठिकाण सापडले आहे. हा शोध इंडियन जर्नल ऑफ सायन्समध्ये प्रकाशित झाला आहे.

जोधपूर - बांगड्या, मणी अन् मातीची भांडी...अशा गोष्टी पाकिस्तानी सीमेजवळील जोधपूरमध्ये सापडल्या आहेत. अलीकडेच भारतीय पुरातत्व विभागाने एक नवीन रिसर्च सुरू केला आहे. त्यात हडप्पा संस्कृतीशी मिळत्या जुळत्या काही गोष्टी हाताशी लागल्या आहेत. 

भारतीय पुरातत्व शास्त्रज्ञांना राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यातील रताडिया री डेरी येथे ४५०० वर्षे जुन्या हडप्पा ठिकाणाचे पुरावे सापडले आहेत. हे ठिकाण रामगड तहसीलपासून ६० किमी अंतरावर आहे तर पाकिस्तान सीमेजवळील साडेवाला गावापासून अवघ्या १७ किमी अंतरावर आहे. राजस्थान विद्यापीठातील इतिहास आणि भारतीय संस्कृती विभागातील संशोधक दिलीप कुमार सैनी, इतिहासकार पार्थ जगानी, राजस्थान विद्यापीठ, उदयपूरचे प्राध्यापक जीवन सिंग खरवाल आणि राजस्थान विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. तमेघ पनवार, डॉ. रवींद्र सिंग जाम आणि रामगढचे प्रदीप कुमार गर्ग यांनी हा शोध लावला आहे.

थार परिसरातील वाळवंटात पहिल्यांदाच पुरातत्वीय ठिकाण सापडले आहे. हा शोध इंडियन जर्नल ऑफ सायन्समध्ये प्रकाशित झाला आहे. येथे काही जुन्या गोष्टी सापडल्या आहेत. या गोष्टी लाल आणि गव्हाच्या रंगाच्या मातीच्या भांड्या आहेत. यामध्ये वाट्या, घागर, कप आणि छिद्रे असलेले भांडे समाविष्ट आहेत. ही मातीची भांडी हाताने बनवण्यात आली असून तिला वेगवेगळे आकार दिले आहेत. काही दगडी पाती देखील सापडल्या आहेत, ज्या ८-१० सेमी लांबीच्या आहेत. विशेष म्हणजे रताडिया री डेरी येथे सापडलेल्या गोष्टी आहेत त्या पाकिस्तान मिळणाऱ्या एका दगडापासून बनवण्यात आल्या आहेत. माती आणि शंखांपासून बनवलेल्या बांगड्या देखील सापडल्या आहेत. काही त्रिकोणी, गोल आणि इडलीच्या आकाराचे टेराकोटा केक देखील सापडले आहेत. टेराकोटा केक म्हणजे मातीपासून बनवलेल्या बेक केलेल्या वस्तू असतात. 

दरम्यान, हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वात विकसित संस्कृती मानली जाते. याआधी सिंधू नदीवर आधारित सिंधू संस्कृती असे नाव देण्यात आले होते. नंतर हडप्पा ठिकाणांच्या नावावरून तिला हडप्पा संस्कृती असे नाव देण्यात आले. ही संस्कृती पूर्णपणे शहरी संस्कृती होती. ज्यामध्ये रुंद रस्ते एकमेकांना काटकोनात कापत असत. घरे आणि रस्त्यांच्या कडेला पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था असायची. ही खासियत त्या काळात जगातील कोणत्याही संस्कृतीला वारशाने मिळाली नव्हती. 

टॅग्स :Indiaभारत