शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
2
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
3
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
4
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
5
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!
6
दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी!
7
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
8
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे
9
ग्रीन टी, ब्लॅक टी सोडा... आता 'बनाना टी' एकदा प्या; स्ट्रेसला कराल बाय-बाय, हाडं होतील मजबूत
10
Stock Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; Sensex १७० अंकांची घसरण, FMCG Stocks मध्ये मोठी खरेदी
11
ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र...
12
ऑनलाईन गेममध्ये पैसे जिंकले, पार्टीसाठी बाहेर पडले अन्...; ५ तरुणांसोबत घडलं आक्रित
13
"तिने आमचं घर तोडलं असं लोक म्हणाले, पण...", RJ महावशसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला युजवेंद्र चहल
14
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
15
धुळ्याची लेक मृणाल ठाकूरचा पहिलाच मराठी सिनेमा, 'या' अभिनेत्यासोबत केलेला रोमान्स
16
पती पत्नीसाठी बेस्ट आहे Post Office ची 'ही' स्कीम; ५ वर्षांत जमवू शकता १३ लाख रुपये, जाणून घ्या
17
नवऱ्याला सोडून पुतण्यासोबत लग्न, आता पुन्हा गावात येऊन पहिल्या पतीला दिलं थेट आव्हान! म्हणाली...
18
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
19
खुर्चीवरुन कोसळला अन्...; ३० वर्षीय डिलिव्हरी बॉयचा हार्ट अटॅकने मृत्यू, २ मुली झाल्या पोरक्या
20
मृत मुलाला जिवंत करण्यासाठी आईची धडपड; कधी CPR तर कधी ऑक्सिजन दिला, हृदयद्रावक Video व्हायरल

पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 14:24 IST

थार परिसरातील वाळवंटात पहिल्यांदाच पुरातत्वीय ठिकाण सापडले आहे. हा शोध इंडियन जर्नल ऑफ सायन्समध्ये प्रकाशित झाला आहे.

जोधपूर - बांगड्या, मणी अन् मातीची भांडी...अशा गोष्टी पाकिस्तानी सीमेजवळील जोधपूरमध्ये सापडल्या आहेत. अलीकडेच भारतीय पुरातत्व विभागाने एक नवीन रिसर्च सुरू केला आहे. त्यात हडप्पा संस्कृतीशी मिळत्या जुळत्या काही गोष्टी हाताशी लागल्या आहेत. 

भारतीय पुरातत्व शास्त्रज्ञांना राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यातील रताडिया री डेरी येथे ४५०० वर्षे जुन्या हडप्पा ठिकाणाचे पुरावे सापडले आहेत. हे ठिकाण रामगड तहसीलपासून ६० किमी अंतरावर आहे तर पाकिस्तान सीमेजवळील साडेवाला गावापासून अवघ्या १७ किमी अंतरावर आहे. राजस्थान विद्यापीठातील इतिहास आणि भारतीय संस्कृती विभागातील संशोधक दिलीप कुमार सैनी, इतिहासकार पार्थ जगानी, राजस्थान विद्यापीठ, उदयपूरचे प्राध्यापक जीवन सिंग खरवाल आणि राजस्थान विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. तमेघ पनवार, डॉ. रवींद्र सिंग जाम आणि रामगढचे प्रदीप कुमार गर्ग यांनी हा शोध लावला आहे.

थार परिसरातील वाळवंटात पहिल्यांदाच पुरातत्वीय ठिकाण सापडले आहे. हा शोध इंडियन जर्नल ऑफ सायन्समध्ये प्रकाशित झाला आहे. येथे काही जुन्या गोष्टी सापडल्या आहेत. या गोष्टी लाल आणि गव्हाच्या रंगाच्या मातीच्या भांड्या आहेत. यामध्ये वाट्या, घागर, कप आणि छिद्रे असलेले भांडे समाविष्ट आहेत. ही मातीची भांडी हाताने बनवण्यात आली असून तिला वेगवेगळे आकार दिले आहेत. काही दगडी पाती देखील सापडल्या आहेत, ज्या ८-१० सेमी लांबीच्या आहेत. विशेष म्हणजे रताडिया री डेरी येथे सापडलेल्या गोष्टी आहेत त्या पाकिस्तान मिळणाऱ्या एका दगडापासून बनवण्यात आल्या आहेत. माती आणि शंखांपासून बनवलेल्या बांगड्या देखील सापडल्या आहेत. काही त्रिकोणी, गोल आणि इडलीच्या आकाराचे टेराकोटा केक देखील सापडले आहेत. टेराकोटा केक म्हणजे मातीपासून बनवलेल्या बेक केलेल्या वस्तू असतात. 

दरम्यान, हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वात विकसित संस्कृती मानली जाते. याआधी सिंधू नदीवर आधारित सिंधू संस्कृती असे नाव देण्यात आले होते. नंतर हडप्पा ठिकाणांच्या नावावरून तिला हडप्पा संस्कृती असे नाव देण्यात आले. ही संस्कृती पूर्णपणे शहरी संस्कृती होती. ज्यामध्ये रुंद रस्ते एकमेकांना काटकोनात कापत असत. घरे आणि रस्त्यांच्या कडेला पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था असायची. ही खासियत त्या काळात जगातील कोणत्याही संस्कृतीला वारशाने मिळाली नव्हती. 

टॅग्स :Indiaभारत