शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 20:49 IST

Rajasthan News: एका वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून जीवन संपवल्याची घटना राजस्थानमध्ये घडली आहे.

एका वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून जीवन संपवल्याची घटना राजस्थानमध्ये घडली आहे. राजस्थानमधील नाागौर येथील करणी कॉलनीमध्ये राहणाऱ्या हजारीराम (७०) आणि त्यांची पत्नी चावली (६८) यांनी पाण्याच्या टाकीत उडी मारून जीवन संपवलं. हे दाम्पत्य घरात एकटंच राहायचं. प्राथमिक तपासामध्ये त्यांनी संपत्तीवरून सुरू असलेला वाद आणि कौटुंबिक कलहामुळे त्रस्त होऊन टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

हे वृद्ध दाम्पत्य दोन दिवस घराबाहेर दिसलं नाही. तेव्हा शेजाऱ्यांनी याबाबत त्यांच्या मुलाला माहिती दिली. त्यानंतर मुलाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटानस्थळी येथून तपास सुरू केला तेव्हा घरातील पाण्याच्या टाकीचं झाकण उघडं असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी या टाकीमध्ये डोकावून पाहिले असता आत या वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह सापडले.

दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे मृत हजारीराम यांनी घराच्या भिंतीवर ठिकठिकाणी सुसाईड नोटच्या प्रती चिकटवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी या प्रती ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. हजारीराम यांनी त्यांचे मुलगे, सुना आणि काही नातेवाईकांवर त्रास दिल्याचा आरोप केला आहे. तसेच कौटुंबिक संपत्तीचा वाद आणि नातेवाईकांमुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागत होता, असा आरोपही त्यांनी सुसाईड नोटमधून केला आहे. दरम्यान, घटनेचं गांभीर्य पाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवागारात पाठवले.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार