शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

स्थलांतरित मजुरांसाठी 'खुशखबर', अमिताभ बच्चन यांनी केली चार्टर्ड फ्लाइट्सची व्यवस्था!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 17:31 IST

यापूर्वी अभिनेता सोनू सूद यांनीही अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना विशेष विमानाने त्यांच्या घरी सोडले आहे. 

ठळक मुद्देमुंबईत अडकलेल्या उत्‍तर प्रदेशातील कामगारांना त्यांच्या घरी जाता यावे, यासाठी त्यांनी 6 स्‍पेशल चार्टर्ड फ्लाइट्सची व्यवस्था केली आहे. 4 फ्लाइट्स आज 10 जून आणि 2 फ्लाइट्स 11 जूनला रवाणा होणार आहेत.29 मेरोजी 10 बसेसदेखील पाठवल्या होत्या

लखनौ/मुंबई : बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन स्थालांतरित मजुरांना सातत्याने मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. लॉकडाउन काळात आपल्या कुटुंबापासून दूर अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी बसेसची व्यवस्था करून बिग बींनी त्यांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घालून दिली. यानंतर आता, मुंबईत अडकलेल्या उत्‍तर प्रदेशातील कामगारांना त्यांच्या घरी जाता यावे, यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर, अलाहाबाद आणि वाराणसीसाठी 6 स्‍पेशल चार्टर्ड फ्लाइट्सची व्यवस्था केली आहे. 

यापूर्वी अभिनेता सोनू सूद यांनीही अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना विशेष विमानाने त्यांच्या घरी सोडले आहे. 

दिलासादायक : जगातल्या 'या' पहिल्या शहरात 'हर्ड इम्यूनिटी'नं होतोय कोरोनाचा खात्मा! पण...

दोन दिवसांत पोहोचणार सर्व विमाने - अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेडचे (ABCL) व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव यांनी सांगितले, की तांत्रिक कारणांमुळे रेल्वे रद्द झाल्यास स्थलांतरित कामगार आणि मजुरांनी आशा सोडू नये, अशी अमिताभ बच्चन यांची इच्छा आहे. यामुळेच त्यांनी 6 चार्टर्ड विमानांची व्यवस्था केली आहे. या प्रत्येक विमानात 180 लोक बसू शकतील. मिळालेल्या माहितीनुसार,  4 फ्लाइट्स आज 10 जून आणि 2 फ्लाइट्स 11 जूनला रवाणा होणार आहेत. सांगण्यात येते, की ही विमाने गोरखपूर, अलाहाबाद आणि वाराणसीसाठी आहेत.

दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही

29 मेरोजी 10 बसेसदेखील पाठवल्या होत्या - यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी उत्तर प्रदेशातील मजुरांसाठी बसेसची व्यवस्थाही केली होती. 29 मेरोजी त्यांनी माहीम दर्गाह ट्रस्ट आणि हाजी अली दर्गाह ट्रस्टच्या सोबतीने 10 बसेस हाजी अलीहून रवाना केल्या होत्या. या बसेसने उत्तर प्रदेशातील लखनौ, अलाहाबाद, गोरखपूर आणि भदोही आदी जिल्ह्यांशी संबंधित जवळपास 250 मजूरांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले होते. या बसेसमध्ये मजुरांच्या खाण्यापिण्यासह मेडिकल किटचीही व्यवस्था करण्यात आली होती. 

भारतात नेमका कसा आणि कुठून आला कोरोना? संशोधकांनी केला मोठा खुलासा, सांगितलं बरंच काही

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकAmitabh Bachchanअमिताभ बच्चनbollywoodबॉलिवूड