शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शेतकऱ्यांना बिग बींनी दिला मदतीचा हात, 4 कोटींचं फेडलं कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 13:44 IST

बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी हजारो शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेलं कर्ज कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.

ठळक मुद्देबॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी हजारो शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेलं कर्ज कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. बिग बींनी विदर्भातील 350 शेतकऱ्यांचे कर्ज फेडल्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील 1398 शेतकऱ्यांचे तब्बल 4.05 कोटी रुपयांचे कर्ज फेडणार आहेत. शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट (ओटीएस) प्रमाणपत्र मिळाले आहे.

लखनौ - बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी हजारो शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेलं कर्ज कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. बिग बींनी विदर्भातील 350 शेतकऱ्यांचे कर्ज फेडल्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील 1398 शेतकऱ्यांचे तब्बल 4.05 कोटी रुपयांचे कर्ज फेडले आहे. अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवर याबाबतची माहिती दिली आहे. 

'शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट (ओटीएस) प्रमाणपत्र मिळाले आहे. सर्व शेतकऱ्यांना मुंबईला आणणे शक्य नाही. त्यासाठी 70 शेतकऱ्यांना मुंबईला आणण्यासाठी 25 नोव्हेंबर रोजी रेल्वेची एक बोगी बुक केली आहे. 26 नोव्हेंबरला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल' असं बिग बींनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमधील ज्या 1398 शेतकऱ्यांचे बँक कर्ज फेडण्याचा विचार केला होता. तो पूर्ण केला आहे. बँकांनी त्यांच्या नावाने ओटीएस प्रमाणपत्र जारी केले आहे. याचा खूप आनंद झाल्याचंही त्यांनी सांगितलं. अमिताभ बच्चन यांनी याआधी 350 शेतकऱ्यांचे कर्ज फेडले आहे.  

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनFarmerशेतकरीUttar Pradeshउत्तर प्रदेश