शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

अमित शहांच्या दौऱ्यामुळे प. बंगालमध्ये तणाव?; वाद पेटण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 02:59 IST

आसाममध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझनमधून ४० लाख लोकांची नावे वगळल्याने तृणमूल काँग्रेस व भाजपा यांच्यात टीकायुद्ध सुरू असून, आसामपेक्षा पश्चिम बंगालमध्ये अधिक तणाव दिसत आहे.

नवी दिल्ली/कोलकाता : आसाममध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझनमधून ४० लाख लोकांची नावे वगळल्याने तृणमूल काँग्रेस व भाजपा यांच्यात टीकायुद्ध सुरू असून, आसामपेक्षापश्चिम बंगालमध्ये अधिक तणाव दिसत आहे. त्यातच भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या ११ आॅगस्ट रोजी कोलकात्याच्या सभेला जाणार असल्याने हा वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे.शहा यांच्या सभेला परवानगी देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. आधी ती नाकारल्याचे वृत्त होते. भाजपाने सभेची परवानगी मागितलीच नव्हती, असे पोलीस सांगत होते. आसाममध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझनमधून ४० लाख लोकांची नावे वगळताच पश्चिम बंगालमध्ये खरे नागरिक शोधण्याची गरज असल्याचे मत तेथील भाजपा नेत्यांनी व्यक्त केले होते. बंगालमध्ये बांग्लादेशींना आश्रय मिळत असल्याचा आरोपही केला होता. त्या पार्श्वभूमीवर शहा यांच्या सभेने तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. एनआरसी प्रसिद्ध झाल्यानंतरचा शहा यांचा पहिलाच दौरा आहे. जूनमधील दौºयात त्यांनी तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपाविरोधात हिंसक कारवाया करीत असल्याचा आरोप केला होता.माजी राष्ट्रपतींचे कुटुंबीयही वगळलेमाजी राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांचा पुतण्या झियाउद्दिन अली अहमद व त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांची नावेही एनआरसीमध्ये नाहीत. माझ्या वडिलांचे नाव एनआरसीमध्ये नसल्याने आमच्याही नावांचा त्यात उल्लेख नाही. फक्रुद्दिन अली अहमद यांच्या कुटुंबीयांशीही आपण संपर्क साधला असल्याचे झियाउद्दिन यांनी सांगितले.भारत-बांग्लादेशसंबंध बिघडतीलभाजपा एनआरसीद्वारे मतपेटीचे राजकारण करत असून, त्यामुळे भारताचे बांग्लादेशशी संबंध बिघडतील असा दावा करून ममता बॅनर्जी म्हणाल्या की, १९७१ सालापासून मी व माझे कुटुंबीय भारतात राहत असल्याचे पुरावे माझ्याकडेही नाहीत. मला माझ्या पालकांची जन्मतारीख माहीत नाही, तिथे मी मी त्यांचे वास्तव्य कसे काय सिद्ध करणार?रेल रोको : एनआरसीच्या विरोधात आॅल इंडिया मातुआ महासंघ या मागासवर्गीयांच्या संघटनेने पूर्व रेल्वेच्या अनेक स्थानकांवर बुधवारी सकाळी साडेआठ वाजता रेल रोको आंदोलन केले. एनआरसीमुळे असंख्य लोकांचे देशातून उच्चाटन करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप या संघटनेने केला. या आंदोलनामुळे पूर्व रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.

टॅग्स :Amit Shahअमित शाहAssamआसामwest bengalपश्चिम बंगाल