शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

अमित शहांच्या दौऱ्यामुळे प. बंगालमध्ये तणाव?; वाद पेटण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 02:59 IST

आसाममध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझनमधून ४० लाख लोकांची नावे वगळल्याने तृणमूल काँग्रेस व भाजपा यांच्यात टीकायुद्ध सुरू असून, आसामपेक्षा पश्चिम बंगालमध्ये अधिक तणाव दिसत आहे.

नवी दिल्ली/कोलकाता : आसाममध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझनमधून ४० लाख लोकांची नावे वगळल्याने तृणमूल काँग्रेस व भाजपा यांच्यात टीकायुद्ध सुरू असून, आसामपेक्षापश्चिम बंगालमध्ये अधिक तणाव दिसत आहे. त्यातच भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या ११ आॅगस्ट रोजी कोलकात्याच्या सभेला जाणार असल्याने हा वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे.शहा यांच्या सभेला परवानगी देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. आधी ती नाकारल्याचे वृत्त होते. भाजपाने सभेची परवानगी मागितलीच नव्हती, असे पोलीस सांगत होते. आसाममध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझनमधून ४० लाख लोकांची नावे वगळताच पश्चिम बंगालमध्ये खरे नागरिक शोधण्याची गरज असल्याचे मत तेथील भाजपा नेत्यांनी व्यक्त केले होते. बंगालमध्ये बांग्लादेशींना आश्रय मिळत असल्याचा आरोपही केला होता. त्या पार्श्वभूमीवर शहा यांच्या सभेने तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. एनआरसी प्रसिद्ध झाल्यानंतरचा शहा यांचा पहिलाच दौरा आहे. जूनमधील दौºयात त्यांनी तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपाविरोधात हिंसक कारवाया करीत असल्याचा आरोप केला होता.माजी राष्ट्रपतींचे कुटुंबीयही वगळलेमाजी राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांचा पुतण्या झियाउद्दिन अली अहमद व त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांची नावेही एनआरसीमध्ये नाहीत. माझ्या वडिलांचे नाव एनआरसीमध्ये नसल्याने आमच्याही नावांचा त्यात उल्लेख नाही. फक्रुद्दिन अली अहमद यांच्या कुटुंबीयांशीही आपण संपर्क साधला असल्याचे झियाउद्दिन यांनी सांगितले.भारत-बांग्लादेशसंबंध बिघडतीलभाजपा एनआरसीद्वारे मतपेटीचे राजकारण करत असून, त्यामुळे भारताचे बांग्लादेशशी संबंध बिघडतील असा दावा करून ममता बॅनर्जी म्हणाल्या की, १९७१ सालापासून मी व माझे कुटुंबीय भारतात राहत असल्याचे पुरावे माझ्याकडेही नाहीत. मला माझ्या पालकांची जन्मतारीख माहीत नाही, तिथे मी मी त्यांचे वास्तव्य कसे काय सिद्ध करणार?रेल रोको : एनआरसीच्या विरोधात आॅल इंडिया मातुआ महासंघ या मागासवर्गीयांच्या संघटनेने पूर्व रेल्वेच्या अनेक स्थानकांवर बुधवारी सकाळी साडेआठ वाजता रेल रोको आंदोलन केले. एनआरसीमुळे असंख्य लोकांचे देशातून उच्चाटन करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप या संघटनेने केला. या आंदोलनामुळे पूर्व रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.

टॅग्स :Amit Shahअमित शाहAssamआसामwest bengalपश्चिम बंगाल