शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
2
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
3
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
4
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
5
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
6
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
7
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
8
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
9
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
10
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
11
दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान
12
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
13
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
14
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!
15
'पुण्याला जातो' सांगून गेलेल्या अंडर-१६ खेळाडूचा जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलमुळे पटली ओळख!
16
सौदी अरेबियात ३१ हजार जागांसह तब्बल ९१ हजार नोकऱ्या; मुख्य नोकरीसोबत सेवा करण्याची संधी
17
हार्दिक पांड्याने खरंच माहिका शर्मासोबत साखरपुडा केला? पूजाविधी करणारे पंडितजी म्हणाले...
18
आलिशान कार, गर्लफ्रेंड, चोरी, नाकाबंदी... नर्सिंगची विद्यार्थिनी बनली बॉयफ्रेंडची क्राइम पार्टनर
19
Pune Video: "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा
20
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहांच्या दौऱ्यामुळे प. बंगालमध्ये तणाव?; वाद पेटण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 02:59 IST

आसाममध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझनमधून ४० लाख लोकांची नावे वगळल्याने तृणमूल काँग्रेस व भाजपा यांच्यात टीकायुद्ध सुरू असून, आसामपेक्षा पश्चिम बंगालमध्ये अधिक तणाव दिसत आहे.

नवी दिल्ली/कोलकाता : आसाममध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझनमधून ४० लाख लोकांची नावे वगळल्याने तृणमूल काँग्रेस व भाजपा यांच्यात टीकायुद्ध सुरू असून, आसामपेक्षापश्चिम बंगालमध्ये अधिक तणाव दिसत आहे. त्यातच भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या ११ आॅगस्ट रोजी कोलकात्याच्या सभेला जाणार असल्याने हा वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे.शहा यांच्या सभेला परवानगी देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. आधी ती नाकारल्याचे वृत्त होते. भाजपाने सभेची परवानगी मागितलीच नव्हती, असे पोलीस सांगत होते. आसाममध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझनमधून ४० लाख लोकांची नावे वगळताच पश्चिम बंगालमध्ये खरे नागरिक शोधण्याची गरज असल्याचे मत तेथील भाजपा नेत्यांनी व्यक्त केले होते. बंगालमध्ये बांग्लादेशींना आश्रय मिळत असल्याचा आरोपही केला होता. त्या पार्श्वभूमीवर शहा यांच्या सभेने तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. एनआरसी प्रसिद्ध झाल्यानंतरचा शहा यांचा पहिलाच दौरा आहे. जूनमधील दौºयात त्यांनी तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपाविरोधात हिंसक कारवाया करीत असल्याचा आरोप केला होता.माजी राष्ट्रपतींचे कुटुंबीयही वगळलेमाजी राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांचा पुतण्या झियाउद्दिन अली अहमद व त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांची नावेही एनआरसीमध्ये नाहीत. माझ्या वडिलांचे नाव एनआरसीमध्ये नसल्याने आमच्याही नावांचा त्यात उल्लेख नाही. फक्रुद्दिन अली अहमद यांच्या कुटुंबीयांशीही आपण संपर्क साधला असल्याचे झियाउद्दिन यांनी सांगितले.भारत-बांग्लादेशसंबंध बिघडतीलभाजपा एनआरसीद्वारे मतपेटीचे राजकारण करत असून, त्यामुळे भारताचे बांग्लादेशशी संबंध बिघडतील असा दावा करून ममता बॅनर्जी म्हणाल्या की, १९७१ सालापासून मी व माझे कुटुंबीय भारतात राहत असल्याचे पुरावे माझ्याकडेही नाहीत. मला माझ्या पालकांची जन्मतारीख माहीत नाही, तिथे मी मी त्यांचे वास्तव्य कसे काय सिद्ध करणार?रेल रोको : एनआरसीच्या विरोधात आॅल इंडिया मातुआ महासंघ या मागासवर्गीयांच्या संघटनेने पूर्व रेल्वेच्या अनेक स्थानकांवर बुधवारी सकाळी साडेआठ वाजता रेल रोको आंदोलन केले. एनआरसीमुळे असंख्य लोकांचे देशातून उच्चाटन करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप या संघटनेने केला. या आंदोलनामुळे पूर्व रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.

टॅग्स :Amit Shahअमित शाहAssamआसामwest bengalपश्चिम बंगाल