शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

देशात फूट पाडणाऱ्यांसोबत काँग्रेसची आघाडी, आसाममधील जाहीर सभेत अमित शहंचा जोरदार हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 07:06 IST

“आसाममध्ये १५ वर्षे सत्ता राबवून आणि याच राज्याचे प्रतिनिधित्व करणारे पंतप्रधान असूनही शेजारच्या देशांतून बेकायदा होणाऱ्या स्थलांतरितांचा प्रश्न सोडविण्यासाठी सगळ्यात जुन्या काँग्रेस पक्षाने काहीही केले गेलेले नाही,” असा आरोपही अमित शहा यांनी केला.

मर्गेऱ्हिता (आसाम) : काँग्रेस आणि त्याचे नेते राहुल गांधी यांच्यावर देशात फूट पाडण्यासाठीच असलेल्या राजकीय पक्षांसोबत आघाडी केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी जोरदार हल्ला केला. शहा म्हणाले, “मतपेट्यांचे राजकारण भाजप करीत नाही.” (Amit Shah's strong attack on a public meeting in Assam, the Congress front with those who divide the country)

“आसाममध्ये १५ वर्षे सत्ता राबवून आणि याच राज्याचे प्रतिनिधित्व करणारे पंतप्रधान असूनही शेजारच्या देशांतून बेकायदा होणाऱ्या स्थलांतरितांचा प्रश्न सोडविण्यासाठी सगळ्यात जुन्या काँग्रेस पक्षाने काहीही केले गेलेले नाही,” असा आरोपही अमित शहा यांनी केला. राज्यसभेत आसाममधून डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रतिनिधित्व केले होते. अप्पर आसाममधील मर्गेऱ्हितात २७ मार्च रोजी मतदान होणार आहे. काँग्रेसने आसाममध्ये ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे बद्रुद्दीन अजमल यांच्याशी, केरळमध्ये मुस्लीम लीगशी तर पश्चिम बंगालमध्ये इंडियन सेक्युलरशी हातमिळवणी केली आहे, असे सांगून आसाम अजमल यांच्या हातात सुरक्षित नाही, असे ते म्हणाले. आसामच्या कल्याणाची जास्त काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना की बद्रुद्दीन अजमल यांना आहे याचा निर्णय जनता घेऊ शकते, असे शहा येथील प्रचार सभेत म्हणाले. 

पाच वर्षांपूर्वी मी भाजपचा अध्यक्ष असताना आसामला ‘आंदोलन मुक्त’ आणि ‘आतंक मुक्त’ करण्याचे आश्वासन दिले होते. आम्ही आमचे आश्वासन पाळले आणि राज्यात आता कोणतेही आंदाेलन नाही किंवा संघर्षही, असेही अमित शहा म्हणाले. 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Amit Shahअमित शहाBJPभाजपाElectionनिवडणूक