शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

देशात फूट पाडणाऱ्यांसोबत काँग्रेसची आघाडी, आसाममधील जाहीर सभेत अमित शहंचा जोरदार हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 07:06 IST

“आसाममध्ये १५ वर्षे सत्ता राबवून आणि याच राज्याचे प्रतिनिधित्व करणारे पंतप्रधान असूनही शेजारच्या देशांतून बेकायदा होणाऱ्या स्थलांतरितांचा प्रश्न सोडविण्यासाठी सगळ्यात जुन्या काँग्रेस पक्षाने काहीही केले गेलेले नाही,” असा आरोपही अमित शहा यांनी केला.

मर्गेऱ्हिता (आसाम) : काँग्रेस आणि त्याचे नेते राहुल गांधी यांच्यावर देशात फूट पाडण्यासाठीच असलेल्या राजकीय पक्षांसोबत आघाडी केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी जोरदार हल्ला केला. शहा म्हणाले, “मतपेट्यांचे राजकारण भाजप करीत नाही.” (Amit Shah's strong attack on a public meeting in Assam, the Congress front with those who divide the country)

“आसाममध्ये १५ वर्षे सत्ता राबवून आणि याच राज्याचे प्रतिनिधित्व करणारे पंतप्रधान असूनही शेजारच्या देशांतून बेकायदा होणाऱ्या स्थलांतरितांचा प्रश्न सोडविण्यासाठी सगळ्यात जुन्या काँग्रेस पक्षाने काहीही केले गेलेले नाही,” असा आरोपही अमित शहा यांनी केला. राज्यसभेत आसाममधून डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रतिनिधित्व केले होते. अप्पर आसाममधील मर्गेऱ्हितात २७ मार्च रोजी मतदान होणार आहे. काँग्रेसने आसाममध्ये ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे बद्रुद्दीन अजमल यांच्याशी, केरळमध्ये मुस्लीम लीगशी तर पश्चिम बंगालमध्ये इंडियन सेक्युलरशी हातमिळवणी केली आहे, असे सांगून आसाम अजमल यांच्या हातात सुरक्षित नाही, असे ते म्हणाले. आसामच्या कल्याणाची जास्त काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना की बद्रुद्दीन अजमल यांना आहे याचा निर्णय जनता घेऊ शकते, असे शहा येथील प्रचार सभेत म्हणाले. 

पाच वर्षांपूर्वी मी भाजपचा अध्यक्ष असताना आसामला ‘आंदोलन मुक्त’ आणि ‘आतंक मुक्त’ करण्याचे आश्वासन दिले होते. आम्ही आमचे आश्वासन पाळले आणि राज्यात आता कोणतेही आंदाेलन नाही किंवा संघर्षही, असेही अमित शहा म्हणाले. 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Amit Shahअमित शहाBJPभाजपाElectionनिवडणूक