शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

'पूर्वोत्तरमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ, दूर्बिणीतूनही दिसणार नाहीत...', अमित शहांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 14:55 IST

'जिथे भाजपचा प्रवेश होऊ शकत नाही, असे बोलले जायचे, तिथेच भाजप दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करत आहे.'

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी कर्नाटक दौऱ्यावर होते. त्यांनी बिदर जिल्ह्यात एका निवडणूक सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या लोकांचे आभार मानले. तसेच, आपल्या भाषणादरम्यान, काँग्रेसवरही जोरदार हल्लाबोल केला. 'ईशान्येत काय घडलं, हे तुम्हा सर्वांना माहित आहे. त्रिपुरा, नागालँड, मेघालयचे निकाल जाहीर झाले अन् या तिन्ही राज्यांतून काँग्रेसचा सुपडा साफ झाला. नागालँडमध्ये काँग्रेसला 0, मेघालयात 3 आणि त्रिपुरामध्ये फक्त 4 जागा मिळाल्या. आता दुर्बिणीतून पाहिलं तरी ते कुठे दिसत नाहीत,' अशी टीका त्यांनी केली. 

'ते म्हणायचे की, ईशान्येत भाजपचा प्रवेश होऊ शकत नाही. पण, तिथे एनडीएचे दुसऱ्यांदा  सरकार स्थापन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू ईशान्येपासून गुजरातपर्यंत, उत्तर प्रदेशपासून कर्नाटकपर्यंत आहे,' असंही शहा म्हणाले. विशेष म्हणजे, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपने आपल्या सहयोगींसह पुन्हा सत्ता मिळवली आहे. यावेळी भाजप मेघालयात एकट्याने लढले आणि 2 जागा जिंकण्यात यशस्वी झाले. एनपीपीचे अध्यक्ष कोनराड संगमा यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. भाजपने त्यांचा पक्ष एनपीपीला पाठिंबा दिल्याचेही त्यांनी सांगितले.

अमित शहा पुढे म्हणाले की, 'लवकरच विजय संकल्प रथयात्रा सुरू होणार असून ही यात्रा भाजपच्या विजय संकल्पाचे प्रतीक नसून गरीब जनतेच्या विजयासाठी, गरिबांच्या कल्याणासाठी आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची पातळी दिवसेंदिवस घसरत आहे. ते 'मोदी तेरी कबर खुदेगी'च्या घोषणा देत आहेत, आम आदमी पार्टीचे लोक 'मोदी तू मर' म्हणत आहेत. असे बोलून देव तुमचे ऐकणार नाही, कारण देशातील 130 कोटी जनता पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहेत,' असंही शहा म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहcongressकाँग्रेसBJPभाजपाTripuraत्रिपुराnagaland-pcनागालँडElectionनिवडणूक