शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

अमित शहा यांचा केंद्रस्थानी प्रभाव; सरकार, पक्षकार्यासह संसदेतही त्यांची अधिकारवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 2:52 AM

अमित शहा हे पक्ष कार्यासोबत सरकार आणि आता संसदेचे कामकाज सुरळीत चालविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत.

हरिश गुप्ता 

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सरकारमध्ये क्रमानुसार तिसरे नेते असले तरी त्यांचा केंद्रस्थानी वाढता प्रभाव आहे. सरकार आणि पक्षसंघटनेसोबत संसदीय कामकाज मार्गी लावण्यातही त्यांनी आपली छाप पाडली आहे. वरिष्ठ नेते अरुण जेटली यांची अनुपस्थिती सर्वांना जाणवत असली तरी तत्पर निर्णय, व्यावहारिक समंजसपणा आणि स्पष्ट भूमिकेने अमित शहा हे प्रभावी ठरले आहेत. सरकारमध्ये पंतप्रधानांनंतर अधिकारवाणीने बोलणारे एकमेव केंद्रीय मंत्री नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

अमित शहा हे पक्ष कार्यासोबत सरकार आणि आता संसदेचे कामकाज सुरळीत चालविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. राज्यसभेत विरोधी पक्षांनी घातलेल्या गोंधळानंतर दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेऊन दिवसभरासाठी राज्यसभेचे कामकाज तहकूब होऊ नये, यासाठी विरोधकांशी सामंजस्याने संवाद साधून त्यांचे मन वळविण्यासाठी पुढाकार घेतात. त्यांच्या या पुढाकाराने ठरविण्यात आलेल्या रणनीतीमुळे तीन तहकुबीननंतर राज्यसभेचे कामकाज सुरळीत होईल. वृत्तांकनासाठी नियमितपणे येणाºया काही पत्रकारांनी नॉर्थ ब्लॉकमध्ये आम्हाला प्रवेशबंदी घालणार का? असा थेट सवाल केला असता अमित शहा म्हणाले की, ‘मी उदार मनाचा आहे. असले निर्बंध घालणार नाही,’ अशी जाहीर स्पष्टोक्ती कोणताही मंत्री देणार नाही; परंतु अमित शहा यांनी मोघम न बोलता असला प्रकार आपणास मान्य नसल्याचा स्पष्ट संदेश दिला.

संसदेच्या दोन्ही सभागृहांत विविध विधेयके सादर करण्यासाठी, तसेच त्यावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी त्यांनी आपल्या कनिष्ठ सहकारी मंत्र्यांना प्रोत्साहन दिले. अशावेळी सभागृहात हजर राहून त्यांनी गरज पडल्यास चर्चेत हस्तक्षेपही केला. त्यांची ही पद्धत पाहून अन्य वरिष्ठ मंत्र्यांनी त्यांचा हा कित्ता गिरवणे सुरू केले.

संसदेत प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी आपल्या कनिष्ठ मंत्र्यांना उत्तरे देण्याची संधी दिली. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय किंवा जी. कृष्णा रेड्डी यांनाही खासदारीकच्या पहिल्याच कारकीर्दीत आपल्यावर एवढी महत्त्वाची कामगिरी सोपविली जाईल, अशी कल्पनाच केली नसावी.जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटीला मुदतवाढ देण्याचा एकमेव प्रस्ताव त्यांनी संसदेत सादर केला. काश्मीर, एनआरसीचा मुद्दा सोडवून पश्चिम बंगाल जिंकण्याचा त्यांचा मानस आहे. सरकारच्या पहिल्या ५० दिवसांत गृहमंत्री म्हणून त्यांनी ठसा उमटविला. आक्रमक आणि स्पष्ट भूमिका घेणारे अमित शहा यांचे व्यक्तिमत्त्व असले तरी पत्रकारांनी संकेत पाळल्यास ते संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात गप्पागोष्टी आणि विनोदातही रमतात.

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाlok sabhaलोकसभा