शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

Amit Shah vs Lalu Prasad Yadav: "लालू प्रसाद यांचं संपूर्ण आयुष्यात भांडणं लावण्यातच गेलंय.."; अमित शाह यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 16:29 IST

Bihar Politics, Nitish Kumar:"पंतप्रधानपदाच्या हव्यासापोटी नितीश यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला"

Amit Shah vs Nitish Kumar Lalu Prasad Yadav, Bihar Politics: नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारने बिहार विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी फ्लोअर टेस्टवर बहिष्कार टाकला आणि सभागृहातून घोषणाबाजी करत बाहेर पडले होते. नितीश यांना २०२० मध्ये मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, पण भाजपाने त्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला असा दावा त्यांनी स्वत:च त्यावेळी केला होता. त्यानंतर आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नितीश कुमारांवर सडकून टीका केली. पंतप्रधान बनण्याच्या हव्यासापोटी नितीश यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि लालू प्रसाद यांनी भांडणं लावली असा घणाघाती आरोप शाह यांनी केला.

अमित शहा यांनी बिहारमधील पूर्णिया येथे जनभावना रॅलीत संबोधित करताना राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "पंतप्रधान होण्यासाठी नितीश कुमार यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसले आणि ते आज राजद आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. पण नितीश बाबू, भारतातील जनता आता जागरूक झाली आहे. स्वार्थाने आणि सत्तेच्या कुटील राजकारणाने कोणीही पंतप्रधान होऊ शकत नाही. विकासाची कामे करून, विचारधारेशी एकनिष्ठ राहून आणि देशाची सुरक्षा सुनिश्चित करून देशातील जनता एखाद्याला पंतप्रधान बनवते", असे अमित शाह म्हणाले.

"बिहारची भूमी नेहमीच परिवर्तन घडवून आणण्यात अग्रेसर राहिली आहे. भाजपशी गद्दारी करून नितीशजींनी स्वार्थ आणि सत्तेचे राजकारण दाखवून दिले. त्यांना सत्तेपासून दूर करण्याची सुरुवातही बिहारच्या भूमीतूनच होईल. आज मी सीमावर्ती जिल्ह्यात आलो आहे, त्यामुळे लालूजी आणि नितीशजींच्या पोटात दुखत आहे. मी बिहारमध्ये भांडणं लावण्यासाठी आलोय आणि जाताना काही तरी करूनच जाईन असा आरोप ते लोक करत आहेत. मला लालूजींना सांगावेसे वाटते की भांडणं लावण्यासाठी माझी गरज नाही. तुम्ही त्यासाठी पुरेसे आहात, कारण तुम्ही आयुष्यभर लोकांमध्ये भांडणं लावण्याचंच काम केलं आहे", अशा शब्दांत शाह यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावरही टीकास्त्र सोडले.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारAmit Shahअमित शाहLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव