शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाह म्हणतात, 2019 साली भाजपाला मिळणार 50 टक्क्यांहून अधिक मते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 08:01 IST

एकापाठोपाठ एक राज्ये जिंकत चाललेल्या भाजपाला उत्तर प्रदेशमधील फुलपूर आणि गोरखपूर येथे झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला होता. मात्र या पराभवातून सावरून भारतीय जनता पक्ष 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दमदार कामगिरी करेल.

 नवी दिल्ली - एकापाठोपाठ एक राज्ये जिंकत चाललेल्या भाजपाला उत्तर प्रदेशमधील फुलपूर आणि गोरखपूर येथे झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला होता. मात्र या पराभवातून सावरून भारतीय जनता पक्ष 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दमदार कामगिरी करेल, असा भाजपाध्यक्ष अमित शाह यांना विश्वास आहे. निवडणुकीच्या तोंडावर सपा आणि बसपामध्ये ऐनवेळी झालेली आघाडी हे भाजपाच्या पराभवाचे मुख्य कारण होते. मात्र पक्ष पराभवाचे विश्लेषण करत असून, 2019 साली भाजपा 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवून विजयी होईल, असा दावा त्यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी या निवडणुकीत झालेल्या भाजपाच्या पराभवाचे नेमके कारण सांगितले. "सपा आणि बसपामध्ये अखेरच्या क्षणी झालेल्या आघाडीमुळे फुलपूर आणि गोरखपूरमधील पोटनिवडणुकीत आम्हाला पराभव पत्करावा लागला. मात्र 2019 च्या निवडणुकीत सपा आणि बसपाची ही खेळी यशस्वी ठरणार नाही. भाजपाला दोन जागांवर पराभव पत्करावा लागल्याने काँग्रेसने  संसद भवन परिसरात मिठाई वाटल्याची चर्चा आहे. मात्र काँग्रेसकडून आम्ही 11 राज्यांमधील सत्ता खेचून घेतली याची चर्चा कुणीच करत नाही. त्रिपुराबाबतही कुणी बोलत नाही."असे ते म्हणाले. "पोटनिवडणुकांमध्ये स्थानिक मुद्दे अधिक प्रभावी असतात. पण सार्वत्रिक निवडणुका ह्या ज्येष्ठ नेते आणि मोठ्या मुद्द्यांवर लक्ष्य केंद्रित करून लढवल्या जातात याकडेही अमित शाह यांनी लक्ष वेधले. तसेच तेलगू देसम पक्षाने एनडीएला दिलेल्या सोडचिठ्ठीमुळे काहीही परिणाम होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. "2014 साली 11 पक्ष एकत्र आले होते. त्यातील केवळ एका पक्षाने साथ सोडल्याने काहीही फरक पडणार नाही." असे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाElectionनिवडणूक