शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अमित शाह म्हणतात, 2019 साली भाजपाला मिळणार 50 टक्क्यांहून अधिक मते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 08:01 IST

एकापाठोपाठ एक राज्ये जिंकत चाललेल्या भाजपाला उत्तर प्रदेशमधील फुलपूर आणि गोरखपूर येथे झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला होता. मात्र या पराभवातून सावरून भारतीय जनता पक्ष 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दमदार कामगिरी करेल.

 नवी दिल्ली - एकापाठोपाठ एक राज्ये जिंकत चाललेल्या भाजपाला उत्तर प्रदेशमधील फुलपूर आणि गोरखपूर येथे झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला होता. मात्र या पराभवातून सावरून भारतीय जनता पक्ष 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दमदार कामगिरी करेल, असा भाजपाध्यक्ष अमित शाह यांना विश्वास आहे. निवडणुकीच्या तोंडावर सपा आणि बसपामध्ये ऐनवेळी झालेली आघाडी हे भाजपाच्या पराभवाचे मुख्य कारण होते. मात्र पक्ष पराभवाचे विश्लेषण करत असून, 2019 साली भाजपा 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवून विजयी होईल, असा दावा त्यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी या निवडणुकीत झालेल्या भाजपाच्या पराभवाचे नेमके कारण सांगितले. "सपा आणि बसपामध्ये अखेरच्या क्षणी झालेल्या आघाडीमुळे फुलपूर आणि गोरखपूरमधील पोटनिवडणुकीत आम्हाला पराभव पत्करावा लागला. मात्र 2019 च्या निवडणुकीत सपा आणि बसपाची ही खेळी यशस्वी ठरणार नाही. भाजपाला दोन जागांवर पराभव पत्करावा लागल्याने काँग्रेसने  संसद भवन परिसरात मिठाई वाटल्याची चर्चा आहे. मात्र काँग्रेसकडून आम्ही 11 राज्यांमधील सत्ता खेचून घेतली याची चर्चा कुणीच करत नाही. त्रिपुराबाबतही कुणी बोलत नाही."असे ते म्हणाले. "पोटनिवडणुकांमध्ये स्थानिक मुद्दे अधिक प्रभावी असतात. पण सार्वत्रिक निवडणुका ह्या ज्येष्ठ नेते आणि मोठ्या मुद्द्यांवर लक्ष्य केंद्रित करून लढवल्या जातात याकडेही अमित शाह यांनी लक्ष वेधले. तसेच तेलगू देसम पक्षाने एनडीएला दिलेल्या सोडचिठ्ठीमुळे काहीही परिणाम होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. "2014 साली 11 पक्ष एकत्र आले होते. त्यातील केवळ एका पक्षाने साथ सोडल्याने काहीही फरक पडणार नाही." असे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाElectionनिवडणूक