शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

पंतप्रधान मोदींनी टॅलेंटेड खेळाडू शोधले, त्यामुळे भारताने विक्रमी १०७ पदकं जिंकली - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 17:26 IST

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ ने तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली.

रोहतक : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ ने तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली. कधीच न करता आलेली कामगिरी भारतीय शिलेदारांनी केली अन् पदकांचे शतक झळकावले. २०१८ मध्ये भारताला सर्वाधिक ७० पदकं जिंकता आली होती. मात्र, यंदाच्या पर्वात भारतीय खेळाडूंनी मुसंडी मारताना पदकांची संख्या १०७ वर पोहचवली. प्रथमच एवढी पदकं भारताच्या वाट्याला आल्याने क्रीडा विश्वासह जगात तिरंग्याची शान वाढली. चीनच्या धरतीवर रंगलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या थरारानंतर भारतीय खेळाडू मायदेशी परतले आहेत. त्यांचे भारतात जोरदार स्वागत करण्यात आलं. विविध क्षेत्रातील दिग्गजांसह राजकीय नेतेमंडळी देखील या ऐतिहासिक क्षणाचा दाखला देत त्यांचे अभिनंदन करत आहेत. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारताच्या या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्याचे दिसते. 

हरयाणातील रोहतक येथे बोलताना अमित शहा यांनी भारतीय खेळाडूचं अभिनंदन केलं. तसेच २०१४ नंतर भारत प्रत्येक खेळात पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "भारतानं आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच १०० हून अधिक पदकं जिंकली. २०१४ नंतर भारत प्रत्येक खेळात खूप चांगला खेळला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पंतप्रधान मोदी. कारण त्यांनी टॅलेंटेड खेळाडू शोधले, ज्यामुळे भारताला हे यश मिळालं. खेळाडूंच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली आणि त्यांच्या आहाराची तसेच आरोग्याची काळजी घेतली. यादरम्यान 'खेलो इंडिया' गेम चेंजर ठरला." 

 

दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ७२ वर्षांच्या इतिहासात बहुतांश वेळा भारताने १५ ते २५ पदकांची कमाई केली. मात्र, मागील चार आशियाई खेळांमध्ये भारत सातत्याने ५०+ पदके जिंकत आहे. गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (२०१८) भारताने प्रथमच ७० पदकं जिंकली होती. मात्र, यावेळी भारत मागील आकड्यांपेक्षा पुढे गेला असून विक्रमी १०७ पदके जिंकण्यात भारतीय शिलेदारांना यश आले. 

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत