शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पंतप्रधान मोदींनी टॅलेंटेड खेळाडू शोधले, त्यामुळे भारताने विक्रमी १०७ पदकं जिंकली - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 17:26 IST

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ ने तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली.

रोहतक : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ ने तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली. कधीच न करता आलेली कामगिरी भारतीय शिलेदारांनी केली अन् पदकांचे शतक झळकावले. २०१८ मध्ये भारताला सर्वाधिक ७० पदकं जिंकता आली होती. मात्र, यंदाच्या पर्वात भारतीय खेळाडूंनी मुसंडी मारताना पदकांची संख्या १०७ वर पोहचवली. प्रथमच एवढी पदकं भारताच्या वाट्याला आल्याने क्रीडा विश्वासह जगात तिरंग्याची शान वाढली. चीनच्या धरतीवर रंगलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या थरारानंतर भारतीय खेळाडू मायदेशी परतले आहेत. त्यांचे भारतात जोरदार स्वागत करण्यात आलं. विविध क्षेत्रातील दिग्गजांसह राजकीय नेतेमंडळी देखील या ऐतिहासिक क्षणाचा दाखला देत त्यांचे अभिनंदन करत आहेत. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारताच्या या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्याचे दिसते. 

हरयाणातील रोहतक येथे बोलताना अमित शहा यांनी भारतीय खेळाडूचं अभिनंदन केलं. तसेच २०१४ नंतर भारत प्रत्येक खेळात पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "भारतानं आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच १०० हून अधिक पदकं जिंकली. २०१४ नंतर भारत प्रत्येक खेळात खूप चांगला खेळला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पंतप्रधान मोदी. कारण त्यांनी टॅलेंटेड खेळाडू शोधले, ज्यामुळे भारताला हे यश मिळालं. खेळाडूंच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली आणि त्यांच्या आहाराची तसेच आरोग्याची काळजी घेतली. यादरम्यान 'खेलो इंडिया' गेम चेंजर ठरला." 

 

दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ७२ वर्षांच्या इतिहासात बहुतांश वेळा भारताने १५ ते २५ पदकांची कमाई केली. मात्र, मागील चार आशियाई खेळांमध्ये भारत सातत्याने ५०+ पदके जिंकत आहे. गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (२०१८) भारताने प्रथमच ७० पदकं जिंकली होती. मात्र, यावेळी भारत मागील आकड्यांपेक्षा पुढे गेला असून विक्रमी १०७ पदके जिंकण्यात भारतीय शिलेदारांना यश आले. 

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत