शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अमित शहा यांच्यासह 'या' नेत्यांनी दिला खासदारकीचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 16:53 IST

लोकसभा निवडणुकीत अमित शहा गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून निवडून आले आहेत.

नवी दिल्ली : भाजपा अध्यक्ष अमित शहा, भाजपा नेते रविशंकर प्रसाद आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) नेत्या कनिमोळी यांनी आपल्या राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा दिला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या तिन्ही नेत्यांनी विजय मिळवला आहे. या विजयानंतर त्यांनी राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा दिला आहे.  

लोकसभा निवडणुकीत अमित शहा गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून निवडून आले आहेत. तर रविशंकर प्रसाद बिहारमधील पटना साहिब मतदारसंघातून आणि कनिमोळी या तामिळनाडूतील थूथुकोडी मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. 

 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या ऐतिहासिक विजयानंतर केंद्रात सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची नरेंद्र मोदी सरकारमध्ये वर्णी लागल्यास त्यांच्याकडे कोणत्या पदाची जबाबदारी दिली जाईल. तसेच, अमित शहा यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला तर पार्टीचे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे. यानंतर पार्टीची धुरा कोणाकडे सोपविली जाणार, याबाबत चर्चांना ऊत आला आहे.

येत्या गुरुवारी (30 मे) राष्ट्रपती भवनात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी अमित शहा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नवीन कॅबिनेट मंत्रिमंडळातील स्थान मिळणार की नाही, याबाबत कळून येणार आहे. तसेच, मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नवीन चेहरे दिसून येणार आहेत. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९