शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 22:07 IST

'पहिल्या चार टप्प्यातील 380 जागांपैकी 270 जागा मिळवून PM मोदींनी पूर्ण बहुमत मिळवले आहे. आता पुढील लढाई 400 पार करण्यची आहे.'

Amit Shah On CAA : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी(दि.14) पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मतुआ समाजाचा बालेकिल्ला असलेल्या बनगाव येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी मतुआ समाजाच्या नागरिकत्वावरील चिंता दूर करण्याच्या प्रयत्न केला. शाहंनी त्यांना आश्वासन दिले की, या समाजाच्या सदस्यांना नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) अंतर्गत भारतीय नागरिकत्व दिले जाईल. 

जगातील कोणतीही शक्ती CAA रोखू शकत नाहीशाह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर CAA बद्दल खोटा प्रचार आणि अफवा पसरवल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, सीएए केंद्राचा कायदा आहे, त्यामुळे ममता बॅनर्जी याची  अंमलबजावणी कधीच थांबवू शकत नाहीत. आमच्या निर्वासित बांधवांना भारताचे नागरिक होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, हीच मोदींचे गॅरंटी आहे. ममता बॅनर्जी यांनी लक्षात ठेवावं की, नागरिकत्व केंद्र सरकारच्या अधिकारात आहे, राज्य सरकारच्या नाही. काँग्रेस म्हणते की, ते सत्तेत आल्यावर सीएए रद्द करणार, पण याला जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, असे शाह यांनी स्पष्टपणे सांगितले

ममता बॅनर्जी खोटं बोलत आहेतशाह पुढे म्हणाले की, ममता व्होट बँकेच्या राजकारणासाठी घुसखोरीला परवानगी देतात आणि सीएएला विरोध करतात. ममतांची व्होट बँक बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर आहेत. ममता व्होट बँक खूश करण्यासाठी हिंदू निर्वासितांना नागरिकत्व देण्यास विरोध करत आहेत आणि घुसखोरांच्या समर्थनार्थ CAA विरोधात रॅली काढत आहेत. ममता बॅनर्जी सीएएबाबत खोटी माहिती पसरवत आहेत. माटुआ समाजातील लोकांना मी हमी देतो की, सीएएमुळए कोणालाही कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला नागरिकत्व मिळेल आणि देशात सन्मानाने जगता येईल. 

30 जागा मिळताच ममतांचा काळ संपणार हावडा येथील एका जाहीर सभेत शाह यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला आणि बंगालमधील तृणमूल काँग्रेसची भ्रष्टाचाराची राजवट फक्त भाजपच संपवू शकते असे सांगितले. शाह म्हणाले की, टीएमसी राजवटीत घुसखोरी, बॉम्बस्फोट, सिंडिकेट राजवट आणि अराजकतेमुळे बंगालमधील परिस्थिती वाईट आहे. बंगालला या परिस्थितीतून नरेंद्र मोदी आणि भाजपच वाचवू शकते. लोकसभा निवडणुकीत बंगालला 30 जागा मिळताच ममतांचा काळ संपेल. चिटफंड घोटाळा, शिक्षक भरती घोटाळा, पालिका भरती घोटाळा, रेशन घोटाळा, गुरे आणि कोळसा तस्करीत गुंतलेल्यांनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा. एकाही भ्रष्टाचाऱ्याला सोडले जाणार नाही, असा इशाराही शाहंनी टीएमसीला दिला.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेस