शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 22:07 IST

'पहिल्या चार टप्प्यातील 380 जागांपैकी 270 जागा मिळवून PM मोदींनी पूर्ण बहुमत मिळवले आहे. आता पुढील लढाई 400 पार करण्यची आहे.'

Amit Shah On CAA : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी(दि.14) पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मतुआ समाजाचा बालेकिल्ला असलेल्या बनगाव येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी मतुआ समाजाच्या नागरिकत्वावरील चिंता दूर करण्याच्या प्रयत्न केला. शाहंनी त्यांना आश्वासन दिले की, या समाजाच्या सदस्यांना नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) अंतर्गत भारतीय नागरिकत्व दिले जाईल. 

जगातील कोणतीही शक्ती CAA रोखू शकत नाहीशाह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर CAA बद्दल खोटा प्रचार आणि अफवा पसरवल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, सीएए केंद्राचा कायदा आहे, त्यामुळे ममता बॅनर्जी याची  अंमलबजावणी कधीच थांबवू शकत नाहीत. आमच्या निर्वासित बांधवांना भारताचे नागरिक होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, हीच मोदींचे गॅरंटी आहे. ममता बॅनर्जी यांनी लक्षात ठेवावं की, नागरिकत्व केंद्र सरकारच्या अधिकारात आहे, राज्य सरकारच्या नाही. काँग्रेस म्हणते की, ते सत्तेत आल्यावर सीएए रद्द करणार, पण याला जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, असे शाह यांनी स्पष्टपणे सांगितले

ममता बॅनर्जी खोटं बोलत आहेतशाह पुढे म्हणाले की, ममता व्होट बँकेच्या राजकारणासाठी घुसखोरीला परवानगी देतात आणि सीएएला विरोध करतात. ममतांची व्होट बँक बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर आहेत. ममता व्होट बँक खूश करण्यासाठी हिंदू निर्वासितांना नागरिकत्व देण्यास विरोध करत आहेत आणि घुसखोरांच्या समर्थनार्थ CAA विरोधात रॅली काढत आहेत. ममता बॅनर्जी सीएएबाबत खोटी माहिती पसरवत आहेत. माटुआ समाजातील लोकांना मी हमी देतो की, सीएएमुळए कोणालाही कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला नागरिकत्व मिळेल आणि देशात सन्मानाने जगता येईल. 

30 जागा मिळताच ममतांचा काळ संपणार हावडा येथील एका जाहीर सभेत शाह यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला आणि बंगालमधील तृणमूल काँग्रेसची भ्रष्टाचाराची राजवट फक्त भाजपच संपवू शकते असे सांगितले. शाह म्हणाले की, टीएमसी राजवटीत घुसखोरी, बॉम्बस्फोट, सिंडिकेट राजवट आणि अराजकतेमुळे बंगालमधील परिस्थिती वाईट आहे. बंगालला या परिस्थितीतून नरेंद्र मोदी आणि भाजपच वाचवू शकते. लोकसभा निवडणुकीत बंगालला 30 जागा मिळताच ममतांचा काळ संपेल. चिटफंड घोटाळा, शिक्षक भरती घोटाळा, पालिका भरती घोटाळा, रेशन घोटाळा, गुरे आणि कोळसा तस्करीत गुंतलेल्यांनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा. एकाही भ्रष्टाचाऱ्याला सोडले जाणार नाही, असा इशाराही शाहंनी टीएमसीला दिला.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेस