शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 22:07 IST

'पहिल्या चार टप्प्यातील 380 जागांपैकी 270 जागा मिळवून PM मोदींनी पूर्ण बहुमत मिळवले आहे. आता पुढील लढाई 400 पार करण्यची आहे.'

Amit Shah On CAA : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी(दि.14) पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मतुआ समाजाचा बालेकिल्ला असलेल्या बनगाव येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी मतुआ समाजाच्या नागरिकत्वावरील चिंता दूर करण्याच्या प्रयत्न केला. शाहंनी त्यांना आश्वासन दिले की, या समाजाच्या सदस्यांना नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) अंतर्गत भारतीय नागरिकत्व दिले जाईल. 

जगातील कोणतीही शक्ती CAA रोखू शकत नाहीशाह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर CAA बद्दल खोटा प्रचार आणि अफवा पसरवल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, सीएए केंद्राचा कायदा आहे, त्यामुळे ममता बॅनर्जी याची  अंमलबजावणी कधीच थांबवू शकत नाहीत. आमच्या निर्वासित बांधवांना भारताचे नागरिक होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, हीच मोदींचे गॅरंटी आहे. ममता बॅनर्जी यांनी लक्षात ठेवावं की, नागरिकत्व केंद्र सरकारच्या अधिकारात आहे, राज्य सरकारच्या नाही. काँग्रेस म्हणते की, ते सत्तेत आल्यावर सीएए रद्द करणार, पण याला जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, असे शाह यांनी स्पष्टपणे सांगितले

ममता बॅनर्जी खोटं बोलत आहेतशाह पुढे म्हणाले की, ममता व्होट बँकेच्या राजकारणासाठी घुसखोरीला परवानगी देतात आणि सीएएला विरोध करतात. ममतांची व्होट बँक बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर आहेत. ममता व्होट बँक खूश करण्यासाठी हिंदू निर्वासितांना नागरिकत्व देण्यास विरोध करत आहेत आणि घुसखोरांच्या समर्थनार्थ CAA विरोधात रॅली काढत आहेत. ममता बॅनर्जी सीएएबाबत खोटी माहिती पसरवत आहेत. माटुआ समाजातील लोकांना मी हमी देतो की, सीएएमुळए कोणालाही कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला नागरिकत्व मिळेल आणि देशात सन्मानाने जगता येईल. 

30 जागा मिळताच ममतांचा काळ संपणार हावडा येथील एका जाहीर सभेत शाह यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला आणि बंगालमधील तृणमूल काँग्रेसची भ्रष्टाचाराची राजवट फक्त भाजपच संपवू शकते असे सांगितले. शाह म्हणाले की, टीएमसी राजवटीत घुसखोरी, बॉम्बस्फोट, सिंडिकेट राजवट आणि अराजकतेमुळे बंगालमधील परिस्थिती वाईट आहे. बंगालला या परिस्थितीतून नरेंद्र मोदी आणि भाजपच वाचवू शकते. लोकसभा निवडणुकीत बंगालला 30 जागा मिळताच ममतांचा काळ संपेल. चिटफंड घोटाळा, शिक्षक भरती घोटाळा, पालिका भरती घोटाळा, रेशन घोटाळा, गुरे आणि कोळसा तस्करीत गुंतलेल्यांनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा. एकाही भ्रष्टाचाऱ्याला सोडले जाणार नाही, असा इशाराही शाहंनी टीएमसीला दिला.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेस