शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

अमित शहांनाही कळून चुकलं; लोकसभा निवडणूक नसेल सोपी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 09:14 IST

येणाऱ्या लोकसभा निवडणुका भाजपासाठी युद्धच आहेत, ही अटीतटीची लढाई आहे. पण, भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल आणि पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, असा दावा भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी केला.

नवी दिल्ली : येणाऱ्या लोकसभा निवडणुका भाजपासाठी युद्धच आहेत, ही अटीतटीची लढाई आहे. पण, भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल आणि पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, असा दावा भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी केला.

शहा म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारने साडेचार वर्षांमध्ये देशाचा विकास केल्याने भारताचा जगभर गौरव झाला. त्यामुळे जनता भाजपाच्या पाठी उभी आहे. काँग्रेसकडे नेतृत्व नाही आणि स्पष्ट वैचारिक भूमिकाही नाही. अशा पक्षाला लोकांनी मते दिली, तर देश १00 वर्षे मागे जाईल. पानिपतची लढाई मराठे हरले आणि त्यामुळे देश २00 वर्षे मागे गेला होता, आता तसे होता कामा नये, ही सर्व नेते व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे.

दिल्लीच्या रामलीला मैदानावर सुरू झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपा सत्तेत असलेल्या सर्व राज्यांचे मंत्री, नेते व पदाधिकारी उपस्थित होते. शहा यांनी आपल्या प्रदीर्घ भाषणात मोदी सरकारच्या साडेचार वर्षांतील कार्य, योजना व प्रकल्प यांचा सविस्तर आढावा घेतला. पंतप्रधान मोदी ‘अजेय योद्धा’ असून, त्यांच्या नेतृत्वाखाली लढाई लढायची आहे. विजयी व्हायचे आहे, असे सांगून शहा यांनी काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर कडाडून टीका केली. राफेलवरून सरकारवर खोटे आरोप करणारे गांधी कुटुंबीयांनी प्राप्तिकर चुकवल्याचे उघड झाले आहे. पण मोदी सरकारवर निष्कलंक आहे, सरकारचे भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण नाही. त्यामुळे जनतेच्या भल्यासाठी हेच सरकार पुन्हा येणे गरजेचे आहे.

उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडी झाल्याचा परिणाम होणार नाही. गेल्या वेळी ७३ जागा जिंकलो. यंदा आम्ही त्याहून किमान एक जास्त म्हणजे ७४ जागा जिंकू. राम मंदिर लवकर व्हावे, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी न्यायालयात प्रयत्न सुरू आहेत. पण काँग्रेस अडथळे आणत आहे, असेही ते म्हणाले.एरवी एकमेकांचे चेहरेही न पाहणा-यांनी केली महाआघाडीयेणा-या लोकसभा निवडणुकांत मोदी यांना पराभूत करण्यासाठी एकमेकांचे एरवी चेहरे न पाहणारे पक्ष व नेते यांनी महाआघाडी केली. पण यांना आपण २0१४ साली पराभूत केले होते, हे लक्षात ठेवा. गरिबांचे कल्याण, सांस्कृतिक राष्ट्रवाद विरुद्ध काहींचा राजकीय स्वार्थ असा सामना होणार असून, स्वार्थी लोकांना जागा दाखवून देणे गरजेचे आहे, असे अमित शहा यांनी सांगितले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपा