शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

अमित शहांनाही कळून चुकलं; लोकसभा निवडणूक नसेल सोपी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 09:14 IST

येणाऱ्या लोकसभा निवडणुका भाजपासाठी युद्धच आहेत, ही अटीतटीची लढाई आहे. पण, भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल आणि पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, असा दावा भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी केला.

नवी दिल्ली : येणाऱ्या लोकसभा निवडणुका भाजपासाठी युद्धच आहेत, ही अटीतटीची लढाई आहे. पण, भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल आणि पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, असा दावा भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी केला.

शहा म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारने साडेचार वर्षांमध्ये देशाचा विकास केल्याने भारताचा जगभर गौरव झाला. त्यामुळे जनता भाजपाच्या पाठी उभी आहे. काँग्रेसकडे नेतृत्व नाही आणि स्पष्ट वैचारिक भूमिकाही नाही. अशा पक्षाला लोकांनी मते दिली, तर देश १00 वर्षे मागे जाईल. पानिपतची लढाई मराठे हरले आणि त्यामुळे देश २00 वर्षे मागे गेला होता, आता तसे होता कामा नये, ही सर्व नेते व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे.

दिल्लीच्या रामलीला मैदानावर सुरू झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपा सत्तेत असलेल्या सर्व राज्यांचे मंत्री, नेते व पदाधिकारी उपस्थित होते. शहा यांनी आपल्या प्रदीर्घ भाषणात मोदी सरकारच्या साडेचार वर्षांतील कार्य, योजना व प्रकल्प यांचा सविस्तर आढावा घेतला. पंतप्रधान मोदी ‘अजेय योद्धा’ असून, त्यांच्या नेतृत्वाखाली लढाई लढायची आहे. विजयी व्हायचे आहे, असे सांगून शहा यांनी काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर कडाडून टीका केली. राफेलवरून सरकारवर खोटे आरोप करणारे गांधी कुटुंबीयांनी प्राप्तिकर चुकवल्याचे उघड झाले आहे. पण मोदी सरकारवर निष्कलंक आहे, सरकारचे भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण नाही. त्यामुळे जनतेच्या भल्यासाठी हेच सरकार पुन्हा येणे गरजेचे आहे.

उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडी झाल्याचा परिणाम होणार नाही. गेल्या वेळी ७३ जागा जिंकलो. यंदा आम्ही त्याहून किमान एक जास्त म्हणजे ७४ जागा जिंकू. राम मंदिर लवकर व्हावे, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी न्यायालयात प्रयत्न सुरू आहेत. पण काँग्रेस अडथळे आणत आहे, असेही ते म्हणाले.एरवी एकमेकांचे चेहरेही न पाहणा-यांनी केली महाआघाडीयेणा-या लोकसभा निवडणुकांत मोदी यांना पराभूत करण्यासाठी एकमेकांचे एरवी चेहरे न पाहणारे पक्ष व नेते यांनी महाआघाडी केली. पण यांना आपण २0१४ साली पराभूत केले होते, हे लक्षात ठेवा. गरिबांचे कल्याण, सांस्कृतिक राष्ट्रवाद विरुद्ध काहींचा राजकीय स्वार्थ असा सामना होणार असून, स्वार्थी लोकांना जागा दाखवून देणे गरजेचे आहे, असे अमित शहा यांनी सांगितले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपा