शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

Amit Shah Interview : पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकूमशाहीवर विश्वास ठेवतात? अमित शाहंनी स्पष्ट शब्दात दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 14:10 IST

Amit Shah Sansad TV Interview : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मिलाखत दिली. यावेळी अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींच्या लीडरशिप क्वालिटीपासून ते त्यांच्यावर होणाऱ्या टीकांपर्यंत अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.

नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी सरकारी न्यूज चॅनल संसद टीव्हीला एक विशेष मुलाखत दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मिलाखत दिली. यावेळी अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींच्या लीडरशिप क्वालिटीपासून ते त्यांच्यावर होणाऱ्या टीकांपर्यंत अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. (Home minister Amit Shah interview)

अमित शाह म्हणाले, पंतप्रधान मोदींनी प्रशासनातील बारकावे अगदी बारकाईने समजून घेतले आहेत. गुजरातमध्ये भाजपची स्थिती खराब असताना, पंतप्रधान मोदींनीच तेथे पक्ष उभा केला. मोदींवर होणाऱ्या डिक्टेटरशीपच्या आरोपांवर बोलताना शाह म्हणाले, ते सर्वांचे म्हणणे ऐकूण घेतात, छोट्यातल्या छोट्या व्यक्तीचा सल्ला घेतात आणि त्यावर निर्णयही घेतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकूमशाहीवर विश्वास ठेवतात? - पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकूमशाहीवर विश्वास ठेवतात? या प्रश्नावर अमित शहा म्हणाले, 'मी त्यांना अगदी जवळून काम करताना पाहिले आहे. हे सर्व लोक जे आरोप करतात, ते पूर्णपणे निराधार आरोप आहेत. मी मोदींसारखा श्रोता पाहिला नाही. कुठलीही बैठक असो, ते किमीत कमी बोलतात, अतिशय संयमाने ऐकतात आणि नंतर योग्य तो निर्णय घेतात. कधी-कधी तर आम्हालाही वाटते, की एवढा विचार सुरू आहे. पण ते प्रत्येकाचे ऐकतात आणि गुणवत्तेच्या आधारावर लहानातल्या लहान व्यक्तीच्या सूचनेलाही महत्त्व देतात. त्यामुळे, ते निर्णय लादणारे नेते आहेत, असे म्हणणे, यात काहीही तथ्य नाही.

यावर अमित शाह यांना विचारण्यात आले, की मग असा समज कशामुळे निर्माण झाला? यावर शाह म्हणाले, 'हा समज जाणूनबुजून निर्माण केला जातो. आता फोरममध्ये जी चर्चा होते, ती बाहेर येत नाही. त्यामुळे लोकांना वाटते, की मोदीजींनीच निर्णय घेतला आहे. जनतेला आणि पत्रकारांनाही माहित होत नाही, की तो निर्णय सामूहिक चिंतनातून घेण्यात आला आहे. एवढेच नाही, तर तेच निर्णय घेणार हे स्वाभाविकच आहे. जनतेने त्यांना अधिकार दिले आहेत. मात्र, सर्वांसोबत चर्चा करून, सर्वांना बोलण्याची संधी देऊन, सर्वांचे प्लस-मायनस पॉइंट्स समजून घेऊनच हे निर्णय घेतले जातात.

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा