शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

Amit Shah Interview : पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकूमशाहीवर विश्वास ठेवतात? अमित शाहंनी स्पष्ट शब्दात दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 14:10 IST

Amit Shah Sansad TV Interview : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मिलाखत दिली. यावेळी अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींच्या लीडरशिप क्वालिटीपासून ते त्यांच्यावर होणाऱ्या टीकांपर्यंत अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.

नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी सरकारी न्यूज चॅनल संसद टीव्हीला एक विशेष मुलाखत दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मिलाखत दिली. यावेळी अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींच्या लीडरशिप क्वालिटीपासून ते त्यांच्यावर होणाऱ्या टीकांपर्यंत अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. (Home minister Amit Shah interview)

अमित शाह म्हणाले, पंतप्रधान मोदींनी प्रशासनातील बारकावे अगदी बारकाईने समजून घेतले आहेत. गुजरातमध्ये भाजपची स्थिती खराब असताना, पंतप्रधान मोदींनीच तेथे पक्ष उभा केला. मोदींवर होणाऱ्या डिक्टेटरशीपच्या आरोपांवर बोलताना शाह म्हणाले, ते सर्वांचे म्हणणे ऐकूण घेतात, छोट्यातल्या छोट्या व्यक्तीचा सल्ला घेतात आणि त्यावर निर्णयही घेतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकूमशाहीवर विश्वास ठेवतात? - पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकूमशाहीवर विश्वास ठेवतात? या प्रश्नावर अमित शहा म्हणाले, 'मी त्यांना अगदी जवळून काम करताना पाहिले आहे. हे सर्व लोक जे आरोप करतात, ते पूर्णपणे निराधार आरोप आहेत. मी मोदींसारखा श्रोता पाहिला नाही. कुठलीही बैठक असो, ते किमीत कमी बोलतात, अतिशय संयमाने ऐकतात आणि नंतर योग्य तो निर्णय घेतात. कधी-कधी तर आम्हालाही वाटते, की एवढा विचार सुरू आहे. पण ते प्रत्येकाचे ऐकतात आणि गुणवत्तेच्या आधारावर लहानातल्या लहान व्यक्तीच्या सूचनेलाही महत्त्व देतात. त्यामुळे, ते निर्णय लादणारे नेते आहेत, असे म्हणणे, यात काहीही तथ्य नाही.

यावर अमित शाह यांना विचारण्यात आले, की मग असा समज कशामुळे निर्माण झाला? यावर शाह म्हणाले, 'हा समज जाणूनबुजून निर्माण केला जातो. आता फोरममध्ये जी चर्चा होते, ती बाहेर येत नाही. त्यामुळे लोकांना वाटते, की मोदीजींनीच निर्णय घेतला आहे. जनतेला आणि पत्रकारांनाही माहित होत नाही, की तो निर्णय सामूहिक चिंतनातून घेण्यात आला आहे. एवढेच नाही, तर तेच निर्णय घेणार हे स्वाभाविकच आहे. जनतेने त्यांना अधिकार दिले आहेत. मात्र, सर्वांसोबत चर्चा करून, सर्वांना बोलण्याची संधी देऊन, सर्वांचे प्लस-मायनस पॉइंट्स समजून घेऊनच हे निर्णय घेतले जातात.

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा