शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 14:47 IST

आजच्या बैठकीत रोहतास, बक्सर, भोजपूर, कैमूर, गया, नवादा, अरवल, जहानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सहभागा घेतला होता.

पटणा - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएची तयारी सुरू आहे. त्यातच गृहमंत्री अमित शहा बिहारच्या दौऱ्यावर आहेत. रोहतासमध्ये १० जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांना अमित शाह यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शाह यांनी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र देत राहुल गांधी, लालू प्रसाद यादव यांच्यावर हल्लाबोल केला. 

शाह म्हणाले की, आज १० जिल्ह्यांतील निवडक कार्यकर्त्यांची बैठक होती. सकाळी मला एका पत्रकाराचा फोन आला, निवडणुकीचा हंगाम आहे. तुम्ही रॅली काढण्याऐवजी कार्यकर्त्यांना का भेटत आहात? असं त्यांनी विचारले. त्यावर मी त्यांना सांगितले, इतर पक्ष निवडणूक नेत्याच्या नावावर जिंकतात. माझ्या पक्षात निवडणुका माझ्या कार्यकर्त्यांनी जिंकल्या आहेत आणि म्हणूनच आमच्यात कोणताही राष्ट्रीय नेता असा आहे ज्याने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बूथ कार्यकर्ता म्हणून केली आहे असं त्यांनी सांगितले. 

आजच्या बैठकीत रोहतास, बक्सर, भोजपूर, कैमूर, गया, नवादा, अरवल, जहानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सहभागा घेतला होता. यावेळी शाह यांनी त्यांच्या शैलीत लालू प्रसाद यादव आणि राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला. नितीश कुमार यांच्या सरकारने बिहारसाठी जे काही केले आहे ते ते घराघरात पोहोचवा. तुमचा आवाज राहुल गांधींपर्यंत पोहोचला पाहिजे असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.  घुसखोरांना मतदानाचा अधिकार आहे का? घुसखोरांना रेशन मिळावे का? त्यांना आयुष्मान कार्ड मिळावे का? त्यांना मतदानाचा अधिकार आहे का? असा सवाल त्यांनी लोकांना विचारत राहुल गांधींवर निशाणा साधला. 

दरम्यान, एनडीए सरकारने जे काम केले, ते लालू प्रसाद यादव त्यांच्या संपूर्ण आयुष्यात काम केले तरीही पूर्ण करू शकले नाहीत. त्यांनी चारा घोटाळा, नोकरीसाठी जमीन घोटाळा आणि जेलमध्येही घोटाळा केला. इतके भ्रष्टाचाराचे आरोप असलेले यूपीए सरकार बिहारचे काही भले करू शकेल का? एकीकडे भ्रष्ट सरकार आहे आणि दुसरीकडे मोदींचे सरकार आहे, ज्याच्याकडे भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही असंही अमित शाह यांनी म्हटलं.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBiharबिहार