शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

Amit Shah : "विजयानंतर अहंकार येतो असं ऐकलेलं, पण पराभवानंतर अहंकार आल्याचं पहिल्यांदाच पाहिलं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 17:51 IST

Amit Shah : गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी (२० जुलै) रांचीला पोहोचले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे.

झारखंडसह देशातील अनेक राज्यांमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. भारतीय जनता पक्षाने यासाठी जोरदार तयारी सुरू केली असून पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेतेही राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. याच दरम्यान गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी (२० जुलै) रांचीला पोहोचले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे.

"एक आदिवासी मुख्यमंत्री आदिवासींची चिंता न करता लव्ह जिहादला प्रोत्साहन देत आहेत. येणाऱ्या काळात आदिवासींची लोकसंख्या कमी होत आहे. सत्तेत आल्यानंतर आमचे सरकार लोकसंख्येच्या मुद्द्यावर श्वेतपत्रिका आणणार" असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

"पराभवानंतर अहंकार येण्याची ही पहिलीच वेळ"

"लोकशाहीत विजयानंतर अहंकार येतो असं ऐकलेलं, पण पराभवानंतर अहंकार आल्याचं पहिल्यांदाच पाहिलं. काँग्रेस अहंकारी झाली आहे. एवढा अहंकार दोन तृतीयांश बहुमताने जिंकूनही येत नाही. या निवडणुकीत एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले आणि भाजपाला २४० जागा मिळाल्या" असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. 

"बुथ कार्यकर्तेच भाजपाच्या विजयाचं कारण"

"भाजपाच्या विजयाचं कारण मंचावर बसलेले नेते नसून बूथवर उपस्थित असलेले कार्यकर्ते आहेत. काँग्रेसवर पराभव स्वीकारायला तयार नाही, कोणत्या गोष्टीचा एवढा अहंकार आहे? या देशात तुष्टीकरण करून अन्याय करण्याचा अहंकार आहे, घराणेशाहीचा अहंकार आहे, १२ लाख कोटींचा भ्रष्टाचार करण्याचा अहंकार आहे."

"मोदींनी झारखंडला नक्षलमुक्त राज्य बनवलं"

"नरेंद्र मोदींनी झारखंडला नक्षलमुक्त राज्य बनवलं आहे. हेमंत सोरेनजी, केंद्रात काँग्रेसची सत्ता, भाजपाने १० वर्षे राज्य केलं. हिशोब करून या. झारखंडच्या विकासासाठी काँग्रेसने ८४ हजार कोटी रुपये दिले होते. नरेंद्र मोदीजींनी १० वर्षात ३ लाख ८४ हजार कोटी रुपये दिले. असा झारखंड कोणी केला असेल तर तो भाजपाने केला आहे."

"काँग्रेस पक्ष भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेतो"

"देशात सर्वात जास्त भ्रष्ट सरकार असेल तर ते झारखंड मुक्ती मोर्चा आहे. एका खासदाराच्या घरातून ३०० कोटी रुपये मिळतात. काँग्रेस पक्ष भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेतो. ज्या व्यक्तीच्या घरातून ३०० कोटी रुपये सापडले, त्याला ते तिकीट देणार आहेत. हे घोटाळे करणारे सरकार आहे, आश्वासने मोडणारे सरकार आहे" असं म्हणत अमित शाह यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहcongressकाँग्रेसBJPभाजपाJharkhandझारखंड