शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

"यूपीएनं १० वर्षात ६० हजार कोटी, तर मोदी सरकारनं आतापर्यंत ९५ हजार कोटींचं शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं"

By मोरेश्वर येरम | Updated: December 25, 2020 13:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान योजनेचा सातवा हप्ता जमा केला. यात एकूण १८ हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर साधला निशाणाकृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच असल्याचं मांडलं मतयूपीए सरकारपेक्षा मोदी सरकारने शेतकऱ्यांना जास्त मदत केल्याचा शहा यांचा दावा

नवी दिल्ली"यूपीए सरकराने १० वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचं ६० हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं, तर मोदी सरकारने आतापर्यंत ९५ हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं आहे", असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान योजनेचा सातवा हप्ता जमा केला. यात एकूण १८ हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना करण्यात आली आहे. मोदींच्या या कार्यक्रमाआधी अमित शहा यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर हल्लाबोल केला. 

"यूपीएच्या काळात शरद पवार कृषीमंत्री असताना कृषी क्षेत्राचं बजेट हे फक्त २१ हजार ९०० कोटी रुपयांचं होतं. मोदी सरकारच्या काळात कृषी क्षेत्राचं बजेट हे तब्बल ३४ हजार ३९९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे", असं अमित शहा यांनी राहुल गांधी यांना उद्देशून म्हटलं. 

अमित शहा यांनी यावेळी यूपीए सरकार आणि मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांची थेट तुलनाच करत विरोधकांवर निशाणा साधला. "२००९ ते २०१४ पर्यंत यूपीए सरकारने फक्त ३ लाख ७४ हजार कोटी रुपयांचे धान आणि गहू खरेदी केली होती. आम्ही मोदी सरकारच्या काळात ८ लाख २२ हजार कोटी रुपयांचा गहू आणि धान खरेदी केलं. सध्या देशात युरियाची कुठेच कमतरता नाही. एनडीए सरकारने १० हजार शेतकऱ्यांची संघटना बनवून शहर उत्पादनासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली", असं अमित शहा म्हणाले

कृषी कायद्यांचं समर्थनकृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असून कुणीही शेतकऱ्याची जमीन हिरावून घेऊ शकत नाही. शेतमाल बाजार देखील सुरु राहतील. देशातील जनतेने नाकारल्यामुळे काँग्रेस गोंधळलेल्या अवस्थेत आहे, असा टोला अमित शहा यांनी लगावला. 

शेतकरी संघटनांना कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे वाटत नसतील तर सरकार त्यावर सविस्तर चर्चेसाठी नेहमीच तयार आहे. शेतकऱ्यांनी तर मोदींना पूर्ण बहुमत दिलं आहे. त्यामुळे सर्व स्तरावर शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत, असंही शहा म्हणाले.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप