शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

"यूपीएनं १० वर्षात ६० हजार कोटी, तर मोदी सरकारनं आतापर्यंत ९५ हजार कोटींचं शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं"

By मोरेश्वर येरम | Updated: December 25, 2020 13:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान योजनेचा सातवा हप्ता जमा केला. यात एकूण १८ हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर साधला निशाणाकृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच असल्याचं मांडलं मतयूपीए सरकारपेक्षा मोदी सरकारने शेतकऱ्यांना जास्त मदत केल्याचा शहा यांचा दावा

नवी दिल्ली"यूपीए सरकराने १० वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचं ६० हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं, तर मोदी सरकारने आतापर्यंत ९५ हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं आहे", असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान योजनेचा सातवा हप्ता जमा केला. यात एकूण १८ हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना करण्यात आली आहे. मोदींच्या या कार्यक्रमाआधी अमित शहा यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर हल्लाबोल केला. 

"यूपीएच्या काळात शरद पवार कृषीमंत्री असताना कृषी क्षेत्राचं बजेट हे फक्त २१ हजार ९०० कोटी रुपयांचं होतं. मोदी सरकारच्या काळात कृषी क्षेत्राचं बजेट हे तब्बल ३४ हजार ३९९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे", असं अमित शहा यांनी राहुल गांधी यांना उद्देशून म्हटलं. 

अमित शहा यांनी यावेळी यूपीए सरकार आणि मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांची थेट तुलनाच करत विरोधकांवर निशाणा साधला. "२००९ ते २०१४ पर्यंत यूपीए सरकारने फक्त ३ लाख ७४ हजार कोटी रुपयांचे धान आणि गहू खरेदी केली होती. आम्ही मोदी सरकारच्या काळात ८ लाख २२ हजार कोटी रुपयांचा गहू आणि धान खरेदी केलं. सध्या देशात युरियाची कुठेच कमतरता नाही. एनडीए सरकारने १० हजार शेतकऱ्यांची संघटना बनवून शहर उत्पादनासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली", असं अमित शहा म्हणाले

कृषी कायद्यांचं समर्थनकृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असून कुणीही शेतकऱ्याची जमीन हिरावून घेऊ शकत नाही. शेतमाल बाजार देखील सुरु राहतील. देशातील जनतेने नाकारल्यामुळे काँग्रेस गोंधळलेल्या अवस्थेत आहे, असा टोला अमित शहा यांनी लगावला. 

शेतकरी संघटनांना कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे वाटत नसतील तर सरकार त्यावर सविस्तर चर्चेसाठी नेहमीच तयार आहे. शेतकऱ्यांनी तर मोदींना पूर्ण बहुमत दिलं आहे. त्यामुळे सर्व स्तरावर शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत, असंही शहा म्हणाले.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप