शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 16:14 IST

काँग्रेस खासदाराने केलेल्या आरोपांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिले.

Amit Shah VS K.C.Venugopal: गंभीर गुन्हेगारी आरोपांखाली अटक झाल्यास किंवा ताब्यात घेतल्यास पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री किंवा मंत्री यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याची तरतूद करण्यासाठी सरकारने बुधवारी संसदेत तीन विधेयके सादर केली. गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत ही विधेयके सादर केली. यादरम्यान बराच गोंधळ पाहायला मिळाला. विरोधकांनी या विधेयकाला विरोध करत ते फाडून सभागृहात फेकून दिले. यावेळी काँग्रेस खासदार केसी वेणुगोपल आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. केसी वेणुगोपाल यांनी केलेल्या आरोपांना अमित शहा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

लोकसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी संविधान दुरुस्ती विधेयकासह तीन विधेयके सादर केली. ही तीन विधेयके सादर होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी 'संविधान मोडू नका' अशा घोषणा दिल्या. या विधेयकानुसार, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसह कोणत्याही मंत्र्यांना कोणत्याही गुन्ह्यात सहभागी असल्यास ३० दिवसांच्या आत राजीनामा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. विरोधकांच्या गोंधळादरम्यान, काही खासदारांनी अमित शहांवर कागद फेकले. खासदार ओवेसी यांनी या विधेयकाला विरोध केला आणि इतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांच्या प्रचंड गोंधळादरम्यान, लोकसभेचे कामकाज दुपारी ३:०० वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. 

यावेळी काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल संविधान दुरुस्ती विधेयक १३० च्या विरोधात बोलत होते. यावेळी त्यांनी आरोप केला की अमित शहा गुजरातचे गृहमंत्री असताना त्यांनी नीतिमत्ता पाळली नाही. या मुद्द्यावर अमित शहा यांनी वेणुगोपाल यांना प्रत्युत्तर दिलं. मी गृहमंत्र्यांना एक प्रश्न विचारू शकतो का? जेव्हा ते गुजरातचे गृहमंत्री होते तेव्हा त्यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता का?, असा सवाल वेणुगोपाल यांनी केला.

त्यानंतर वेणुगोपाल यांना थांबवत अमित शहा त्यांच्या जागेवरून उठले आणि म्हणाले, "माझे ऐका, आधी खाली बसा. माझ्यावर खोटे आरोप लावण्यात आले होते हे मला स्पष्ट करायचे आहे. मी नैतिक मूल्यांचा आधार घेत राजीनामा दिला. मला अटक होण्यापूर्वी मी माझ्या पदाचा राजीनामा दिला. जोपर्यंत मी न्यायालयाकडून निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत मी कोणतेही पद भूषवले नाही. आपण एवढे निर्लज्ज होऊ शकत नाही की आरोप लागल्यावरही पदावर राहू."

टॅग्स :Amit Shahअमित शाहParliamentसंसदcongressकाँग्रेस