शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

छे छे, राम मंदिराचा विषय अजेंड्यावर नव्हताच; भाजपाने झटकले हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 14:23 IST

राम मंदिराबाबत भाजपा इतका सावध पवित्रा का घेतेय, असा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

नवी दिल्लीः राम मंदिर उभारणीचं काम २०१९ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू होईल, अशी कुठलीही घोषणा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केली नसल्याचा दावा पक्षातर्फे करण्यात आलाय. हैदराबादमध्ये झालेल्या भाजपा नेत्यांच्या बैठकीत राम मंदिराचा विषय अजेंड्यावरही नव्हता, असं ट्विट पक्षाने केलंय. त्यामुळे राम मंदिराबाबत भाजपा इतका सावध पवित्रा का घेतोय, असा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.  

अयोध्येत राम मंदिराची उभारणी, हा गेल्या अनेक निवडणुकांमधील प्रचाराचा मुद्दा राहिला आहे. २०१४च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'अच्छे दिन' आणि विकासाचा मुद्दा प्रमुख होता, पण 'मंदिर वही बनाएंगे' हे आश्वासनही भाजपाने दिलं होतंच. अर्थात, त्यावर गेल्या चार वर्षांत ठोस असं काहीच झालेलं नाही. त्यामुळे आता निवडणुकीच्या आधी त्यादृष्टीने हालचाली होतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

या पार्श्वभूमीवरच, अमित शहा यांनी राम मंदिराच्या उभारणीबाबत केलेलं विधान आज चर्चेत आलं. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिराचं काम सुरू करण्याचं सूतोवाच शहा यांनी केल्याचं एका स्थानिक नेत्यानंच पत्रकारांना सांगितलं होतं. स्वाभाविकच, बातमी देशभरात पसरली आणि राजकारण सुरू झालं. त्यानंतर भाजपा एकदम बॅकफूटवर गेली आहे. अमित शहा राम मंदिराबाबत काहीच बोलले नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तरीही, यावरून सुरू झालेली चर्चा काही इतक्यात थांबेल असं दिसत नाही.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAmit Shahअमित शाहBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९