शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

नापास नेत्यांची विदेशात लेक्चरबाजी - अमित शाहंची राहुल गांधींवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 12:43 IST

राहूल गांधीचे थेट नाव न घेता अयशस्वी नेत्यांनी काही सांगितलं तरी भारतात त्यांची कुणी दखलही घेत नाही अशी टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे. भारतात नापास झालेले नेते अमेरिकेत जातात आणि लेक्चर झोडतात, त्यांचं इथं भारतात कुणी ऐकत नाही, असं ते म्हणाले

ठळक मुद्देकोलकातामध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या शाह यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हे उद्गार काढलेनरेंद्र मोदींच्या नोटाबंदीमुळे भारताची अर्थव्यवस्था 2 टक्क्यांनी आकुंचली असल्याचा आरोपही गांधी यांनी केला

नवी दिल्ली, दि. 13 - राहूल गांधीचे थेट नाव न घेता अयशस्वी नेत्यांनी काही सांगितलं तरी भारतात त्यांची कुणी दखलही घेत नाही अशी टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे. भारतात नापास झालेले नेते अमेरिकेत जातात आणि लेक्चर झोडतात, त्यांचं इथं भारतात कुणी ऐकत नाही, असं ते म्हणाले आणि हा राहुल गांधींचा संदर्भ असल्याचे स्पष्ट झाले. कोलकातामध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या शाह यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हे उद्गार काढले आहेत.राहुल गांधींनी कॅलिफोर्नियातील बर्कले या विद्यापीठात काल भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तसेच भाजपावर चांगलीच टीका केली होती. त्यानंतर भाजपा व काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. देशामध्ये हिंसा, चीड आणि ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू असून असं वातावरण भारतात तयार करण्यासाठी केंद्र सरकारला राहुल गांधींनी जबाबदार धरले. भाजपाप्रणीत केंद्र सरकारवर या नव्या बदलासाठी राहुल गांधींनी ठपका ठेवला आहे. नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीमुळे भारताची अर्थव्यवस्था 2 टक्क्यांनी आकुंचली असल्याचा आरोपही गांधी यांनी केला आहे.राहुल गांधींच्या मताशी असहमती दर्शवताना अमित शाह यांनी काँग्रेसप्रणीत युपीए पेक्षा विद्यमान सरकारची कामगिरी सरस असल्याचा दावा केला आहे. कार्यक्षमता हा या सरकारचा मुख्य पाया असल्याचे शाह म्हणाले. काँग्रेसच्या काळात असलेले घराणेशाहीचे राजकारण भाजपाने संपवल्याचा दावाही शाह यांनी केला. तसेच एकगठ्ठा मतांसाठी लांगुलचालन करण्याच्या धोरणाचा भाजपा स्वीकार करत नसल्याचेही शाह म्हणाले. राजकीय कार्यक्षमतेवर आमचा विश्वास असून घराणेशाही मान्य नसल्याचे शाह यांनी सांगितले.

वाचा राहुल गांधींच्या अमेरिकेतील भाषणाचे 10 मुद्देः

1. हिंसेमुळे कुणाचंही भलं होणार नाही2. नोटाबंदीसंदर्भात संसदेचा सल्ला घेतला नाही3. सत्तेत असताना अहंकार नसावा 4. मोदी सरकारनं RTI चे केले नुकसान5. भारतात आजही रोजगाराचा प्रश्न कायम आहे. देशाला आता रोजगार निर्माण करायला हवा. 6. BJPची लोकं माझ्याविरोधात अजेंडा चालवत आहेत7. सगळी पॉवर आहे पीएमओकडे8. भाजपाचा होता कम्प्युटरला विरोध 9. काश्मीरमधील दहशतवाद आम्ही कमी केला, मात्र भाषणं नाही केलीत10. भाजपाप्रमाणे काँग्रेसला वरिष्ठांचा विसर नाही

टॅग्स :BJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शाह