शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

नापास नेत्यांची विदेशात लेक्चरबाजी - अमित शाहंची राहुल गांधींवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 12:43 IST

राहूल गांधीचे थेट नाव न घेता अयशस्वी नेत्यांनी काही सांगितलं तरी भारतात त्यांची कुणी दखलही घेत नाही अशी टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे. भारतात नापास झालेले नेते अमेरिकेत जातात आणि लेक्चर झोडतात, त्यांचं इथं भारतात कुणी ऐकत नाही, असं ते म्हणाले

ठळक मुद्देकोलकातामध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या शाह यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हे उद्गार काढलेनरेंद्र मोदींच्या नोटाबंदीमुळे भारताची अर्थव्यवस्था 2 टक्क्यांनी आकुंचली असल्याचा आरोपही गांधी यांनी केला

नवी दिल्ली, दि. 13 - राहूल गांधीचे थेट नाव न घेता अयशस्वी नेत्यांनी काही सांगितलं तरी भारतात त्यांची कुणी दखलही घेत नाही अशी टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे. भारतात नापास झालेले नेते अमेरिकेत जातात आणि लेक्चर झोडतात, त्यांचं इथं भारतात कुणी ऐकत नाही, असं ते म्हणाले आणि हा राहुल गांधींचा संदर्भ असल्याचे स्पष्ट झाले. कोलकातामध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या शाह यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हे उद्गार काढले आहेत.राहुल गांधींनी कॅलिफोर्नियातील बर्कले या विद्यापीठात काल भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तसेच भाजपावर चांगलीच टीका केली होती. त्यानंतर भाजपा व काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. देशामध्ये हिंसा, चीड आणि ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू असून असं वातावरण भारतात तयार करण्यासाठी केंद्र सरकारला राहुल गांधींनी जबाबदार धरले. भाजपाप्रणीत केंद्र सरकारवर या नव्या बदलासाठी राहुल गांधींनी ठपका ठेवला आहे. नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीमुळे भारताची अर्थव्यवस्था 2 टक्क्यांनी आकुंचली असल्याचा आरोपही गांधी यांनी केला आहे.राहुल गांधींच्या मताशी असहमती दर्शवताना अमित शाह यांनी काँग्रेसप्रणीत युपीए पेक्षा विद्यमान सरकारची कामगिरी सरस असल्याचा दावा केला आहे. कार्यक्षमता हा या सरकारचा मुख्य पाया असल्याचे शाह म्हणाले. काँग्रेसच्या काळात असलेले घराणेशाहीचे राजकारण भाजपाने संपवल्याचा दावाही शाह यांनी केला. तसेच एकगठ्ठा मतांसाठी लांगुलचालन करण्याच्या धोरणाचा भाजपा स्वीकार करत नसल्याचेही शाह म्हणाले. राजकीय कार्यक्षमतेवर आमचा विश्वास असून घराणेशाही मान्य नसल्याचे शाह यांनी सांगितले.

वाचा राहुल गांधींच्या अमेरिकेतील भाषणाचे 10 मुद्देः

1. हिंसेमुळे कुणाचंही भलं होणार नाही2. नोटाबंदीसंदर्भात संसदेचा सल्ला घेतला नाही3. सत्तेत असताना अहंकार नसावा 4. मोदी सरकारनं RTI चे केले नुकसान5. भारतात आजही रोजगाराचा प्रश्न कायम आहे. देशाला आता रोजगार निर्माण करायला हवा. 6. BJPची लोकं माझ्याविरोधात अजेंडा चालवत आहेत7. सगळी पॉवर आहे पीएमओकडे8. भाजपाचा होता कम्प्युटरला विरोध 9. काश्मीरमधील दहशतवाद आम्ही कमी केला, मात्र भाषणं नाही केलीत10. भाजपाप्रमाणे काँग्रेसला वरिष्ठांचा विसर नाही

टॅग्स :BJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शाह