शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

नापास नेत्यांची विदेशात लेक्चरबाजी - अमित शाहंची राहुल गांधींवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 12:43 IST

राहूल गांधीचे थेट नाव न घेता अयशस्वी नेत्यांनी काही सांगितलं तरी भारतात त्यांची कुणी दखलही घेत नाही अशी टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे. भारतात नापास झालेले नेते अमेरिकेत जातात आणि लेक्चर झोडतात, त्यांचं इथं भारतात कुणी ऐकत नाही, असं ते म्हणाले

ठळक मुद्देकोलकातामध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या शाह यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हे उद्गार काढलेनरेंद्र मोदींच्या नोटाबंदीमुळे भारताची अर्थव्यवस्था 2 टक्क्यांनी आकुंचली असल्याचा आरोपही गांधी यांनी केला

नवी दिल्ली, दि. 13 - राहूल गांधीचे थेट नाव न घेता अयशस्वी नेत्यांनी काही सांगितलं तरी भारतात त्यांची कुणी दखलही घेत नाही अशी टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे. भारतात नापास झालेले नेते अमेरिकेत जातात आणि लेक्चर झोडतात, त्यांचं इथं भारतात कुणी ऐकत नाही, असं ते म्हणाले आणि हा राहुल गांधींचा संदर्भ असल्याचे स्पष्ट झाले. कोलकातामध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या शाह यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हे उद्गार काढले आहेत.राहुल गांधींनी कॅलिफोर्नियातील बर्कले या विद्यापीठात काल भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तसेच भाजपावर चांगलीच टीका केली होती. त्यानंतर भाजपा व काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. देशामध्ये हिंसा, चीड आणि ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू असून असं वातावरण भारतात तयार करण्यासाठी केंद्र सरकारला राहुल गांधींनी जबाबदार धरले. भाजपाप्रणीत केंद्र सरकारवर या नव्या बदलासाठी राहुल गांधींनी ठपका ठेवला आहे. नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीमुळे भारताची अर्थव्यवस्था 2 टक्क्यांनी आकुंचली असल्याचा आरोपही गांधी यांनी केला आहे.राहुल गांधींच्या मताशी असहमती दर्शवताना अमित शाह यांनी काँग्रेसप्रणीत युपीए पेक्षा विद्यमान सरकारची कामगिरी सरस असल्याचा दावा केला आहे. कार्यक्षमता हा या सरकारचा मुख्य पाया असल्याचे शाह म्हणाले. काँग्रेसच्या काळात असलेले घराणेशाहीचे राजकारण भाजपाने संपवल्याचा दावाही शाह यांनी केला. तसेच एकगठ्ठा मतांसाठी लांगुलचालन करण्याच्या धोरणाचा भाजपा स्वीकार करत नसल्याचेही शाह म्हणाले. राजकीय कार्यक्षमतेवर आमचा विश्वास असून घराणेशाही मान्य नसल्याचे शाह यांनी सांगितले.

वाचा राहुल गांधींच्या अमेरिकेतील भाषणाचे 10 मुद्देः

1. हिंसेमुळे कुणाचंही भलं होणार नाही2. नोटाबंदीसंदर्भात संसदेचा सल्ला घेतला नाही3. सत्तेत असताना अहंकार नसावा 4. मोदी सरकारनं RTI चे केले नुकसान5. भारतात आजही रोजगाराचा प्रश्न कायम आहे. देशाला आता रोजगार निर्माण करायला हवा. 6. BJPची लोकं माझ्याविरोधात अजेंडा चालवत आहेत7. सगळी पॉवर आहे पीएमओकडे8. भाजपाचा होता कम्प्युटरला विरोध 9. काश्मीरमधील दहशतवाद आम्ही कमी केला, मात्र भाषणं नाही केलीत10. भाजपाप्रमाणे काँग्रेसला वरिष्ठांचा विसर नाही

टॅग्स :BJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शाह