शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

'हिंदू धर्माला दहशतवादाशी जोडण्याचं पाप काँग्रेसचं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 15:33 IST

हिंदूंना बदनाम केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली.

बिजनौर - हिंदू धर्माला दहशतवादाशी जोडून काँग्रेसनेहिंदूंना बदनाम केले. हिंदू दहशतवादी असू शकत नाही. राहुल गांधी आणि काँग्रेसने राजकीय स्वार्थासाठी घाणेरडे राजकारण केले. हिंदूंना बदनाम केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली. उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 

यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले की, काँग्रेस नेहमी मतविभाजन करण्याचं राजकारण करत असतं. देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचं काँग्रेसने काम केलं. त्याचमुळे राहुल गांधी यांना अमेठी लोकसभा मतदारसंघ सोडून दुसरीकडे उभं रहावं लागलं. त्यांना ठाऊक आहे यंदा अमेठीतून त्यांचा हिशोब चुकता केला जाणार आहे. अमेठीच्या पराभवाला घाबरुन राहुल गांधी वायनाड येथे पळाले असा आरोप अमित शहा यांनी केला. 

 

हिंदू दहशतवाद्यावर बोलताना अमित शहा यांनी भाष्य केलं की, हिंदू कधीही दहशतवादी असू शकत नाही. हिंदू मुंगीला घास भरवतो तो लोकांना कसं मारेल ? हिंदूंना दहशतवादाशी जोडण्याचे पाप काँग्रेसने केले. राजकीय फायद्यासाठी संपूर्ण देशात गौरवशाली असणाऱ्या या हिंदू समुदायाला बदनाम काँग्रेसने केले असं शहा यांनी सांगितले. सूर्य हा तेजस्वी असतो त्याची चमक तुम्ही लपवू शकत नाही असा टोला त्यांनी लगावला.

विरोधी पक्ष घाणेरडे राजकारण करतो. काही दिवसांपूर्वी पंचकुला येथील कोर्टाने समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल दिला. तेव्हा काँग्रेसने समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटाला हिंदू दहशतवादाचा उदाहरण असल्याचं सांगितले. त्यावेळी गृहमंत्री पी.चिंदबरम, सुशीलकुमार शिंदे आणि राहुल गांधी यांनी देशाला लष्कर ए तोएबापासून धोका नसून हिंदू दहशतवादापासून धोका असल्याचं सांगितलं होतं. हिंदूंना बदनाम केल्याबद्दल राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने देशाची माफी मागायला हवी. काँग्रेसने हिंदूंवर दहशतवादी असल्याचा ठपका ठेवला मात्र सत्य अखेर बाहेर पडलं असं अमित शहा यांनी सांगितले.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Amit Shahअमित शहाHinduहिंदूcongressकाँग्रेसbijnor-pcबिजनोर